शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

मान्सून वेळेआधी परतणार, थंडी लवकर येणार, परतीचा प्रवास संभ्रमात: पण एक-दाेनदा चांगल्या पावसाचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2022 07:40 IST

Monsoon : पावसाने आठवडाभरापासून दडी मारली आहे. त्यामुळे मान्सूनने परतीचा प्रवास तर सुरू केला नाही ना असा संभ्रम आहे. हवामान विभागाने मात्र यास नकार दिला

- निशांत वानखेडेनागपूर : पावसाने आठवडाभरापासून दडी मारली आहे. त्यामुळे मान्सूनने परतीचा प्रवास तर सुरू केला नाही ना असा संभ्रम आहे. हवामान विभागाने मात्र यास नकार दिला; पण दरवर्षीपेक्षा यावर्षी लवकर म्हणजे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू हाेईल आणि ३० सप्टेंबरपर्यंत ताे महाराष्ट्रातून निघून जाईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे ऑक्टाेबरच्या पहिल्याच आठवड्यात थंडीही सुरू हाेईल, असा अंदाज आहे.

तज्ज्ञांच्या मते, गेल्या पाच-सहा वर्षांपासून पर्यावरणाचे चक्र बदलले. मान्सूनचे आगमन उशिरा झाल्याने परतीचा काळही लांबणीवर गेला. गेल्या वर्षी ऑक्टाेबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पाऊस हाेता आणि शेवटच्या आठवड्यात थंडीची चाहूल लागली हाेती. दरवर्षी साधारणत: १८ ते २० सप्टेंबरदरम्यान परतीचा प्रवास सुरू हाेताे. मात्र, यावर्षी मान्सूनचे आगमन लवकर झाले. जूनमध्ये कमतरता असली तरी जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसाने जाेरदार हजेरी लावली. 

बदललेल्या हवामान चक्रानुसार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस परतीचा प्रवास सुरू करेल. ज्या वेगाने बरसला, त्या वेगाने निघून जाईल. ३० सप्टेंबरपर्यंत ताे गेलेला असेल. यावर्षी ज्याप्रमाणे उन्हाळ्यात उष्ण लहरी व पावसाने सतावले, त्याप्रमाणे थंडीही सतावेल. हिवाळ्याचा तडाखा तीव्रपणे जाणवेल.     - सुरेश चाेपणे, हवामानतज्ज्ञ

विदर्भासह महाराष्ट्रातील बहुतेकn विदर्भासह महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांत एकूण सरासरीपर्यंत पाऊस बरसला आहे. n यामुळे यावर्षी हवामानाचे चक्र बदलले असून, मान्सूनही लवकर परतणार आहे. n राजस्थानमधून देशाच्या वायव्य टाेकापासून पावसाचा परतीचा प्रवास सुरू हाेईल आणि ऑक्टाेबरच्या पहिल्याच आठवड्यात थंडीची चाहूल लागेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. n परतीच्या प्रवासादरम्यान विदर्भासह राज्यात एक-दाेनदा पाऊस हाेईल, असा अंदाज आहे. n विदर्भात हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस हाेईल, तर मुंबई, काेकण, गाेव्यासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

टॅग्स :Rainपाऊसweatherहवामान