शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
5
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
6
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
7
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
8
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
9
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
10
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
11
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
12
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
13
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
14
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
15
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
16
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
17
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
18
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
19
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
20
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Monsoon Return : धो धो बरसूनही उकाडा कायम ! विदर्भात 'या' तारखेपासून परतीच्या पावसाला होईल सुरवात

By निशांत वानखेडे | Updated: September 23, 2025 20:29 IST

अमरावती, चंद्रपूरला बरसले मेघ : परतीच्या प्रवासाला करा प्रतीक्षा : दाेन दिवसाच्या उघडिपीने पारा चढला

नागपूर/अमरावती : सतत काेसळणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांसह नागरिकांनाही हैराण केले आहे. अशात हवामान विभागाने पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवला आहे. येत्या २४ ते २७ सप्टेंबर यादरम्यान विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने पावसाळी वातावरण तयार झाले आहे. या काळात जाेरदार पावसासह गारपीट हाेण्याचीही शक्यता आहे.

नैऋत्य मान्सून गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या काही भागांतून पुन्हा माघार घेत आहे, आणि येत्या काही दिवसांत उत्तर प्रदेश, दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरच्या काही भागांतून माघार घेण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. विदर्भात मात्र परतीच्या प्रवासाला ५ ते १० ऑक्टाेबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान साेमवार १५ सप्टेंबर ते २० सप्टेंबरपर्यंत चार दिवस पावसाने विदर्भात जाेरदार हजेरी लावली हाेती. विशेषत: नागपुरात धाे-धाे पाऊस बरसला. दाेन दिवसांपासून आकाश निरभ्र झाले आहे. त्यामुळे आर्द्रता घटली असून पारासुद्धा वाढला आहे आणि नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. कमाल तापमान ३५ अंशावर गेले आहे. चंद्रपूर व वर्धासुद्धा ३५ अंशावर गेले आहेत.

दरम्यान मंगळवारी चंद्रपूर व अमरावती जिल्ह्यात मध्यम तीव्रतेच्या पावसाने हजेरी लावली. अमरावतीला सकाळपर्यंत २३.८ मिमी व चंद्रपूरला दिवसा १७ मि.मी. पाऊस झाला. नागपूरला दिवसभर निरभ्र असलेले आकाश सायंकाळी ढगांनी व्यापले हाेते. किरकाेळ थेंबही पडले. त्यामुळे बुधवारपासून अंदाजानुसार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.

२४ ते २७ सप्टेंबर : राज्यातील कमी दाब प्रभावामुळे संपूर्ण विदर्भात अतिजोरदार मेघगर्जनेसह पाऊस.उत्तर महाराष्ट्र २६ सप्टेंबर : १ ऑक्टोबरदरम्यान जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार या भागात मध्यम ते जोरदार पाऊस होईल.२४ ते २५ : मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपात गडगडाटी पाऊस२६-१ ऑक्टोबर : कमी दाबाच्या प्रभावामुळे मुसळधार, पूरपरिस्थिती, शेतीचे प्रचंड नुकसान होणारा पाऊस.कोकण : संपूर्ण कोकणात या आठवड्यात हलका ते मध्यम पाऊस

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

२२ सप्टेंबर रोजी ईशान्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. २४ तासांच्या आत ते पश्चिम-वायव्येकडे वायव्य बंगालच्या उपसागराकडे सरकण्याची अपेक्षा आहे. म्यानमारकडे रगासा चक्रीवादळ येत असताना त्याचे अंश बळकटी देतील. त्याचे रूपांतर २५ सप्टेंबरच्या सुमारास कमी दाबात होईल. २६ सप्टेंबरच्या सुमारास दक्षिण ओडिशा-उत्तर आंध्र प्रदेश किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे.

"राज्यात या आठवड्यात संपूर्ण विभागात जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याच काळात उत्तरेकडे मान्सून माघारी फिरत असल्यामुळे सौम्य गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही."- अभिषेक खेरडे, हवामान अभ्यासक, धोतरखेडा, अचलपूर

टॅग्स :Vidarbhaविदर्भmonsoonमोसमी पाऊसRainपाऊसnagpurनागपूरAmravatiअमरावती