शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

घरातील कचऱ्यासाठी मोजावे लागणार पैसे :मनपा सभागृहात लवकरच प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 00:07 IST

केंद्र सरकारच्या पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने २०१६ मध्ये घनकचरा व्यवस्थापन नियम जारी केले आहेत. याची अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्य शासनाने उपविधी तयार केले आहेत. सदर उपविधी महापालिकांसाठी घनकचरा (व्यवस्थापन व हाताळणी),‘स्वच्छता व आरोग्य नियम’ म्हणून ओळखले जाणार आहेत. यातील तरतुदीनुसार घरे व आस्थापनातून कचरा संकलनासाठी शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

ठळक मुद्देशासन निर्णयाची होणार अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारच्या पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने २०१६ मध्ये घनकचरा व्यवस्थापन नियम जारी केले आहेत. याची अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्य शासनाने उपविधी तयार केले आहेत. सदर उपविधी महापालिकांसाठी घनकचरा (व्यवस्थापन व हाताळणी),‘स्वच्छता व आरोग्य नियम’ म्हणून ओळखले जाणार आहेत. यातील तरतुदीनुसार घरे व आस्थापनातून कचरा संकलनासाठी शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव लवकरच महापालिका सभागृहापुढे मंजुरीसाठी आणण्याचा प्रशासनाचा विचार आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास नागरिकांना घरातील कचऱ्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत.तरतुदीनुसार १०० किलोपेक्षा कमी घनकचरा निर्मितीसाठी महापालिका (‘अ’ आणि ‘ब’ वर्ग) क्षेत्रातील घरांसाठी दरमहा ६० रुपये तर दुकानासाठी दरमहा ९० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. शोरुम, उपाहारगृहे व हॉटेलसाठी १२० ते १५० रुपये, ५० खाटापर्यंतच्या रुणालयासाठी १२० तर त्याहून अधिक खाटांच्या रुग्णालयांसाठी १८० रुपये, शैक्षणिक व धार्मिक संस्थासाठी ९० रुपये तर मंगल कार्यालये ३०० रुपये तर फेरीवाल्यासाठी १८० आकारले जाणार आहेत. गेल्या दोन वर्षात शासकीय अनुदानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. परंतु अजूनही महापालिका बिकट आर्थिक स्थितीतून सावरलेली नाही. मुख्य आर्थिक स्त्रोत असलेल्या मालमत्ता कर, पाणीपट्टी व नगररचना विभागाच्या उत्पन्नात वाढ झालेली नाही. पुढील आर्थिक वर्षातही यात बदल होण्याची शक्यता दिसत नाही. कचरा संकलन व वाहतुकीवर महापालिकेला दर वर्षाला ५५ ते ६० कोटींचा खर्च करावा लागते. यात दरवर्षी वाढ होत आहे. याचा विचार करता शासन निर्णयानुसार कचरा शुल्क आकारण्याचा महापालिका प्रशासनाचा विचार आहे. पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रशासन याबाबतचा प्रस्ताव सभागृहात मंजुरीसाठी ठेवणार आहे. मात्र आगामी विधानसभा निवडणुका विचारात घेता कचरा शुल्क आकारण्याबाबत पदाधिकाऱ्यांत मतभेद आहेत. निवडणुका संपल्यानंतर शुल्क आकारणी व्हावी, अशी भूमिका काहींनी घेतली तर काहींच्या मते शुल्क आकारणी जाचक नसल्याने याचा निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे या निर्णयाची तातडीने अंमलबजवाणी करावी. यातून काही प्रमाणात महापालिकेच्या तिजोरीत महसूल जमा होईल. मात्र यावर प्रतिक्रिया देण्याचे पदाधिकाऱ्यांनी टाळले.सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास वा अस्वच्छता निर्माण केल्यास यासाठी ६० ते १८० रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. तर मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण केल्यास ५ हजार ते १५ हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न