शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
4
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
5
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
6
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
7
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
8
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
9
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
10
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
11
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
12
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
13
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
14
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
15
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
16
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
17
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
18
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
19
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
20
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...

मोदी आले अन् एप्रिल फूल बनवून गेले : अशोक चव्हाण यांची बोचरी टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 22:47 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या निवडणुकीत जनतेला बँक खात्यात १५ लाख जमा करण्याचे, वर्षाला दोन कोटी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून ‘अच्छे दिन‘ आणण्याचे स्वप्न दाखविले होते. प्रत्यक्षात मोदींनी एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. आता पुन्हा मोदी आले अन् वर्धेत सभा घेत विदर्भातील लोकांना ‘एप्रिल फूल’ बनवून गेले, अशी बोचरी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली.

ठळक मुद्देकेंद्राचा कारभार संघाच्या अजेंडयानुसार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या निवडणुकीत जनतेला बँक खात्यात १५ लाख जमा करण्याचे, वर्षाला दोन कोटी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून ‘अच्छे दिन‘ आणण्याचे स्वप्न दाखविले होते. प्रत्यक्षात मोदींनी एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. आता पुन्हा मोदी आले अन् वर्धेत सभा घेत विदर्भातील लोकांना ‘एप्रिल फूल’ बनवून गेले, अशी बोचरी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली.काँग्रेसच्या प्रचारासाठी चव्हाण यांनी पूर्व नागपुरातील कुंभारटोली येथे जाहीर सभा घेतली. या वेळी उमेदवार नाना पटोले, माजी केंद्रीय राज्यमंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे, माजी मंत्री आरिफ नसीम खान, शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे, माजी खा. गेव्ह आवारी, अनंतराव घारड, प्राचार्य बबनराव तायवाडे,अ‍ॅड. अभिजित वंजारी, विरोधीपक्षनेते तानाजी वनवे, प्रवक्ते अतुल लोंढे, नगरसेवक दुनेश्वर पेठे, पुरुषोत्तम हजारे, माजी महापौर नरेश गावंडे,जयदीप कवाडे, उमाकांत अग्निहोत्री,शकूर नागानी आदी उपस्थित होते.या वेळी चव्हाण म्हणाले, भाजप देशपातळीवर ‘मैं भी चौकीदार’ अभियान चालवत आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केंद्रातील सरकार सर्वसामान्य लोकांसाठी नव्हे तर जवळच्या उद्योगपतीसाठी चालवत आहेत. ‘हवाका मामुली झोका आँधी नही हो सकता’,‘चरखा घुमानेसे कोई महात्मा गांधी नही बन सकता’, असे सांगत केंद्राचा कारभार संघाच्या अजेंडयानुसार सुरू आहे, असल्याची टीका त्यांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे मोदींच्या हस्ते भूमिपूजन झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचेही भूमिपूजन केले. मात्र गेल्या दोन वर्षात स्मारकांच्या कामाला सुरुवात झालेली नाही.काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी १२ हजाराहून कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांना वर्षाला ७२ हजार देण्याचे आश्वासन दिले आहे. मध्यप्रदेश व राजसथानातील विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. येथे काँग्रेसची सत्ता येताच शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली. केंद्रात काँग्रेस आघाडीची सत्ता असताना सोनिया गांधी यांनी गरीबांना दोन रुपये किलो दराने धान्य देण्याची योजना सुरू केली. भाजपच्या सत्ताकाळात ही योजना बंद करण्यात आली. देशातील लोकांना मत व्यक्त करण्याचा अधिकार राहीलेला नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आले असल्याचे चव्हाण म्हणाले.यावेळी नाना पटोले, विलास मुत्तेमवार, चंद्रकांत हांडोरे, आरिफ नसीम खान आदींनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाणNana Patoleनाना पटोले