शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मोदी आले अन् एप्रिल फूल बनवून गेले : अशोक चव्हाण यांची बोचरी टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 22:47 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या निवडणुकीत जनतेला बँक खात्यात १५ लाख जमा करण्याचे, वर्षाला दोन कोटी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून ‘अच्छे दिन‘ आणण्याचे स्वप्न दाखविले होते. प्रत्यक्षात मोदींनी एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. आता पुन्हा मोदी आले अन् वर्धेत सभा घेत विदर्भातील लोकांना ‘एप्रिल फूल’ बनवून गेले, अशी बोचरी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली.

ठळक मुद्देकेंद्राचा कारभार संघाच्या अजेंडयानुसार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या निवडणुकीत जनतेला बँक खात्यात १५ लाख जमा करण्याचे, वर्षाला दोन कोटी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून ‘अच्छे दिन‘ आणण्याचे स्वप्न दाखविले होते. प्रत्यक्षात मोदींनी एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. आता पुन्हा मोदी आले अन् वर्धेत सभा घेत विदर्भातील लोकांना ‘एप्रिल फूल’ बनवून गेले, अशी बोचरी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली.काँग्रेसच्या प्रचारासाठी चव्हाण यांनी पूर्व नागपुरातील कुंभारटोली येथे जाहीर सभा घेतली. या वेळी उमेदवार नाना पटोले, माजी केंद्रीय राज्यमंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे, माजी मंत्री आरिफ नसीम खान, शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे, माजी खा. गेव्ह आवारी, अनंतराव घारड, प्राचार्य बबनराव तायवाडे,अ‍ॅड. अभिजित वंजारी, विरोधीपक्षनेते तानाजी वनवे, प्रवक्ते अतुल लोंढे, नगरसेवक दुनेश्वर पेठे, पुरुषोत्तम हजारे, माजी महापौर नरेश गावंडे,जयदीप कवाडे, उमाकांत अग्निहोत्री,शकूर नागानी आदी उपस्थित होते.या वेळी चव्हाण म्हणाले, भाजप देशपातळीवर ‘मैं भी चौकीदार’ अभियान चालवत आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केंद्रातील सरकार सर्वसामान्य लोकांसाठी नव्हे तर जवळच्या उद्योगपतीसाठी चालवत आहेत. ‘हवाका मामुली झोका आँधी नही हो सकता’,‘चरखा घुमानेसे कोई महात्मा गांधी नही बन सकता’, असे सांगत केंद्राचा कारभार संघाच्या अजेंडयानुसार सुरू आहे, असल्याची टीका त्यांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे मोदींच्या हस्ते भूमिपूजन झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचेही भूमिपूजन केले. मात्र गेल्या दोन वर्षात स्मारकांच्या कामाला सुरुवात झालेली नाही.काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी १२ हजाराहून कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांना वर्षाला ७२ हजार देण्याचे आश्वासन दिले आहे. मध्यप्रदेश व राजसथानातील विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. येथे काँग्रेसची सत्ता येताच शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली. केंद्रात काँग्रेस आघाडीची सत्ता असताना सोनिया गांधी यांनी गरीबांना दोन रुपये किलो दराने धान्य देण्याची योजना सुरू केली. भाजपच्या सत्ताकाळात ही योजना बंद करण्यात आली. देशातील लोकांना मत व्यक्त करण्याचा अधिकार राहीलेला नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आले असल्याचे चव्हाण म्हणाले.यावेळी नाना पटोले, विलास मुत्तेमवार, चंद्रकांत हांडोरे, आरिफ नसीम खान आदींनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाणNana Patoleनाना पटोले