शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

'लाडकी बहीणचा आणखी एखादा हप्ता मिळेल पुढे काय?' राज ठाकरेंचा महायुती सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 22:25 IST

Raj Thackeray : यावेळी त्यांनी महायुती सरकारसह खासदार शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. 

Raj Thckeray ( Marathi News ) : राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहेत, या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर आहेत. दरम्यान, त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महायुती सरकारसह खासदार शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. 

राज ठाकरे यांनी 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरुन महायुती सरकारवर टीका करत सवाल उपस्थित केला. लाडकी बहीण योजनेवर बोलताना ठाकरे म्हणाले, लोकांना तुम्ही कामाला लावा. लोक काम मागत आहेत. फुकटचे पैसे मागत नाहीत, शेतकरी फुकटची वीज मागत नाहीत. तुम्ही पहिल्यांदा लोकांच्या मागण्या समजून तर घ्या. मला वाटतंय आता पहिला महिना जाईल, दुसरा महिनाही कदाचित जाईल. सरकारकडे पैसे कुठे आहेत, असा सवालही राज ठाकरे यांनी केला. "याच्यामध्ये अजितदादांनी सांगितले आहे का निवडून दिलं तरच पुढचं, तसं होणार नाही ते. सरकारकडे पैसे तर पाहिजेत?, असंही राज ठाकरे म्हणाले. 

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्राने युनिफाइड पेन्शन योजनेला दिली मंजुरी

'मी कायद्याचा धाक दाखवेन'

राज्यातील जनतेने ४८ तासांचा अवधी दिल्यास संपूर्ण महाराष्ट्राला गुन्हेगारमुक्त करू, असंही राज ठाकरे म्हणाले. 'राज ठाकरेंच्या हातात सत्ता दिली की दाखवेन सरकार कसं चालतं?' कायद्याचा धाक म्हणजे काय हे मी दाखवून देईन. यानंतर महाराष्ट्रात कोणीही स्त्रीकडे घाणेरड्या नजरेने पाहण्याची हिंमत करणार नाही, असंही ठाकरे म्हणाले.

महाविकास आघाडीवर निशाणा

यावेळी राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवरही टीका केली. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षांना विधानसभा निवडणुकीत सत्ताविरोधी मते मिळणार नाहीत, दलित आणि मुस्लिमांच्या मोठ्या वर्गाने भाजपच्या विरोधात मतदान केले. ही मते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसकडे गेली. ही मते महाविकास आघाडीची नव्हती. ही लाट आता संपली  आहे, असंही राज ठाकरे म्हणाले. 

खासदार शरद पवारांवर आरोप

आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मनसे २२५ जागा लढवणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत. यावेळी खासदार शरद पवार यांच्यावर आरोप केले. ठाकरे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट) अध्यक्षांनीच राज्यात जातीचे आणि पक्षांतराचे राजकारण आणले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर संतांमध्येही जातीच्या आधारावर फूट पडल्याचा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस