शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

'लाडकी बहीणचा आणखी एखादा हप्ता मिळेल पुढे काय?' राज ठाकरेंचा महायुती सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 22:25 IST

Raj Thackeray : यावेळी त्यांनी महायुती सरकारसह खासदार शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. 

Raj Thckeray ( Marathi News ) : राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहेत, या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर आहेत. दरम्यान, त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महायुती सरकारसह खासदार शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. 

राज ठाकरे यांनी 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरुन महायुती सरकारवर टीका करत सवाल उपस्थित केला. लाडकी बहीण योजनेवर बोलताना ठाकरे म्हणाले, लोकांना तुम्ही कामाला लावा. लोक काम मागत आहेत. फुकटचे पैसे मागत नाहीत, शेतकरी फुकटची वीज मागत नाहीत. तुम्ही पहिल्यांदा लोकांच्या मागण्या समजून तर घ्या. मला वाटतंय आता पहिला महिना जाईल, दुसरा महिनाही कदाचित जाईल. सरकारकडे पैसे कुठे आहेत, असा सवालही राज ठाकरे यांनी केला. "याच्यामध्ये अजितदादांनी सांगितले आहे का निवडून दिलं तरच पुढचं, तसं होणार नाही ते. सरकारकडे पैसे तर पाहिजेत?, असंही राज ठाकरे म्हणाले. 

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्राने युनिफाइड पेन्शन योजनेला दिली मंजुरी

'मी कायद्याचा धाक दाखवेन'

राज्यातील जनतेने ४८ तासांचा अवधी दिल्यास संपूर्ण महाराष्ट्राला गुन्हेगारमुक्त करू, असंही राज ठाकरे म्हणाले. 'राज ठाकरेंच्या हातात सत्ता दिली की दाखवेन सरकार कसं चालतं?' कायद्याचा धाक म्हणजे काय हे मी दाखवून देईन. यानंतर महाराष्ट्रात कोणीही स्त्रीकडे घाणेरड्या नजरेने पाहण्याची हिंमत करणार नाही, असंही ठाकरे म्हणाले.

महाविकास आघाडीवर निशाणा

यावेळी राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवरही टीका केली. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षांना विधानसभा निवडणुकीत सत्ताविरोधी मते मिळणार नाहीत, दलित आणि मुस्लिमांच्या मोठ्या वर्गाने भाजपच्या विरोधात मतदान केले. ही मते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसकडे गेली. ही मते महाविकास आघाडीची नव्हती. ही लाट आता संपली  आहे, असंही राज ठाकरे म्हणाले. 

खासदार शरद पवारांवर आरोप

आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मनसे २२५ जागा लढवणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत. यावेळी खासदार शरद पवार यांच्यावर आरोप केले. ठाकरे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट) अध्यक्षांनीच राज्यात जातीचे आणि पक्षांतराचे राजकारण आणले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर संतांमध्येही जातीच्या आधारावर फूट पडल्याचा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस