शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

संतोषला २०० फटके मारले, पाणी मागताच नराधमांनी...; सुरेश धसांनी सभागृहात मांडलं हादरवणारं वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 20:29 IST

"आरोपींनी संतोषला मारहाण करत असताना एका व्यक्तीला व्हिडिओ कॉल करून सगळा प्रकार दाखवला होता. हा कॉल नक्की कोणाला केला होता, याचीही चौकशी व्हावी," अशी मागणी धस यांनी केली आहे.

Suresh Dhas On Sarpanch Murder ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची चर्चा आज राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात झाली. या चर्चेवेळी बोलताना भाजप आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणातील हादरवून टाकणारे तपशील सभागृहासमोर मांडले आणि उपस्थित सर्व आमदारही स्तब्ध झाले. "संतोष देशमुख यांना सात आरोपींनी दीडशे ते दोनशे फटके मारले. त्यामुळे त्यांच्या शरीरात रक्तस्त्राव होऊन दोन लीटर रक्त साचलं होतं. वेदना झाल्यानंतर संतोषने पाणी मागितलं. मात्र आरोपींना त्याला पाणी देण्याऐवजी दुसरंच काहीतरी दिलं. अत्यंत क्रूरपणे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली," असं धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून देत कठोर कारवाईची मागणी केली आहे.

सरपंच हत्या प्रकरणात पुढे बोलताना सुरेश धस म्हणाले की, "गावातील दलित समाजातील वॉचमनला मारल्यामुळे सरपंच संतोष देशमुख हे मध्यस्थीसाठी गेले होते. तेव्हा त्यांची सुदर्शन घुले आणि त्याच्यासोबतच्या इतर तरुणांसोबत बाचाबाची झाली होती. यावेळी झालेल्या वादातून सरपंचाने घुलेच्या एखादी कानशिलात लगावली असेल. पण याचा राग मनात ठेवून दोन दिवसांनी संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं. त्यांना एका ठिकाणी नेऊन रिंगण करून मारहाण करण्यात आली. अपहरण होत असताना तिथं संतोषचा आत्येभाऊ होता. तो धावत पोलीस ठाण्यात पोहोचला. पण पोलिसांनी तीन तास साधी फिर्यादही लिहून घेतली नाही. त्यामुळे हत्या प्रकरणात पोलिसांनाही सहआरोपी केलं पाहिजे. तसंच या सगळ्या आरोपींचा आका शोधला पाहिजे," अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे. तसंच या आरोपींनी संतोषला मारहाण करत असताना एका व्यक्तीला व्हिडिओ कॉल करून सगळा प्रकार दाखवला होता. हा कॉल नक्की कोणाला केला होता, याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी धस यांनी केली आहे.

"नराधमांची परिसरातील लहान मुलींवरही वक्रदृष्टी"

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या आरोपींनी यापूर्वी परिसरातील लहान मुलींचीही छेड काढल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला आहे. आरोपींच्या दहशतीमुळे या प्रकरणांबाबत गुन्हा नोंद झालेला नाही. मात्र तो आपण करून घ्यावा, असं आवाहनही धस यांनी मुख्यमंत्र्यांना केलं आहे.

दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले हे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे अत्यंत निकटवर्तीय व खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी असलेल्या वाल्मिक कराड याच्या जवळचे असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे वाल्मिक कराड याच्यावही हत्या प्रकरणात गुन्हा नोंदवला जावा, अशी मागणी बीड जिल्ह्यातील विविध राजकीय नेत्यांकडून केली जात आहे.

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणSuresh Dhasसुरेश धसDhananjay Mundeधनंजय मुंडेCrime Newsगुन्हेगारीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४