शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

... ही ओबीसींवर अन्याय करणारीच कृती, चंद्रशेखर बावनकुळेंची राज्य सरकारवर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2022 16:52 IST

ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर राज्य शासनाने रिकॉल अर्ज करून दोन दिवसांची मुदत मागितली आहे. राज्य शासनाचा हा वेळकाढूपणा आहे. शासन अगोदरपासूनच ओबीसी आरक्षणाविरोधात असल्याची टीका बावनकुळे यांनी केली.

ठळक मुद्देओबीसी आरक्षणावर मंत्र्यांची वकिलांशी चर्चादेखील नाहीराज्य शासनाचा हा वेळकाढूपणा

नागपूर :ओबीसी आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा असतानादेखील राज्यातील ओबीसी मंत्री मात्र त्याबाबत गंभीर नाहीत. मंत्री केवळ मोठमोठे दावे करतात. ते प्रत्यक्षात या मुद्द्यावर अभ्यास तसेच वकिलांशी चर्चा करत नाहीत, असा आरोप भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ. चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी लावला आहे. सोमवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार गंभीर असेल तर संबंधित मंत्र्यांनी सुनावणीच्या वेळी न्यायालयात उपस्थित राहायला हवे. सर्वोच्च न्यायालयाच्या १५ डिसेंबर २०२१च्या निकालावर राज्य शासनाने रिकॉल अर्ज करून दोन दिवसांची मुदत मागितली आहे. मुळात हा अर्ज अगोदरदेखील करता आला असता. परंतु ऐन सुनावणी सुरू असतानाच वेळ वाढवून मागणे ही ओबीसींवर अन्याय करणारीच कृती आहे. राज्य शासनाचा हा वेळकाढूपणा आहे. शासन अगोदरपासूनच ओबीसी आरक्षणाविरोधात असल्याची टीका बावनकुळे यांनी केली.

आगामी तीन महिन्यात राज्य शासनाने इम्पिरिकल डेटा तयार करणार असल्याचे सांगितल्याने न्यायालयाने शासनाला वेळ द्यावा. तसेच राज्यातील निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला द्यावेत, अशी विनंती बावनकुळे यांनी अगोदरच न्यायालयाला केली आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणOBC Reservationओबीसी आरक्षणMahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेOBCअन्य मागासवर्गीय जाती