शहरं
Join us  
Trending Stories
1
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
2
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
3
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
4
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
5
Air Pollution: राजधानी दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर, शाळा-महाविद्यालयांतील क्रीडा उपक्रम बंद ठेवण्याचे आदेश
6
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
7
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
8
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
9
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
10
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
11
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
12
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
13
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
14
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
15
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
16
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
17
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
18
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
19
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
20
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
Daily Top 2Weekly Top 5

... ही ओबीसींवर अन्याय करणारीच कृती, चंद्रशेखर बावनकुळेंची राज्य सरकारवर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2022 16:52 IST

ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर राज्य शासनाने रिकॉल अर्ज करून दोन दिवसांची मुदत मागितली आहे. राज्य शासनाचा हा वेळकाढूपणा आहे. शासन अगोदरपासूनच ओबीसी आरक्षणाविरोधात असल्याची टीका बावनकुळे यांनी केली.

ठळक मुद्देओबीसी आरक्षणावर मंत्र्यांची वकिलांशी चर्चादेखील नाहीराज्य शासनाचा हा वेळकाढूपणा

नागपूर :ओबीसी आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा असतानादेखील राज्यातील ओबीसी मंत्री मात्र त्याबाबत गंभीर नाहीत. मंत्री केवळ मोठमोठे दावे करतात. ते प्रत्यक्षात या मुद्द्यावर अभ्यास तसेच वकिलांशी चर्चा करत नाहीत, असा आरोप भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ. चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी लावला आहे. सोमवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार गंभीर असेल तर संबंधित मंत्र्यांनी सुनावणीच्या वेळी न्यायालयात उपस्थित राहायला हवे. सर्वोच्च न्यायालयाच्या १५ डिसेंबर २०२१च्या निकालावर राज्य शासनाने रिकॉल अर्ज करून दोन दिवसांची मुदत मागितली आहे. मुळात हा अर्ज अगोदरदेखील करता आला असता. परंतु ऐन सुनावणी सुरू असतानाच वेळ वाढवून मागणे ही ओबीसींवर अन्याय करणारीच कृती आहे. राज्य शासनाचा हा वेळकाढूपणा आहे. शासन अगोदरपासूनच ओबीसी आरक्षणाविरोधात असल्याची टीका बावनकुळे यांनी केली.

आगामी तीन महिन्यात राज्य शासनाने इम्पिरिकल डेटा तयार करणार असल्याचे सांगितल्याने न्यायालयाने शासनाला वेळ द्यावा. तसेच राज्यातील निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला द्यावेत, अशी विनंती बावनकुळे यांनी अगोदरच न्यायालयाला केली आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणOBC Reservationओबीसी आरक्षणMahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेOBCअन्य मागासवर्गीय जाती