शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
3
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
4
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
5
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
6
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
7
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
8
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
9
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
11
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
12
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
13
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
14
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
15
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
16
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
17
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
18
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
19
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
20
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला

मतदार ओळखपत्रात चुका; युवकांत नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 10:51 PM

१८ वर्षावरील युवकांना निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी मतदार नोंदणी करून त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याची मोहीम निवडणूक विभागातर्फे राबविण्यात आली. शहरातील हजारो युवकांनी अर्ज भरून आपली नावे नोंदविली. मात्र अर्जात अचूक माहिती भरलेली असतानाही अनेकांच्या मतदार ओळखपत्रात चुकीची माहिती नोंदविण्यात आली. यामुळे ओळखपत्र असूनही त्यांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागणार आहे. ओळखपत्रावरील नावातील चुकामुळे युवकात नाराजी आहे.

ठळक मुद्देमतदानाच्या हक्कापासून वंचित राहण्याचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १८ वर्षावरील युवकांना निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी मतदार नोंदणी करून त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याची मोहीम निवडणूक विभागातर्फे राबविण्यात आली. शहरातील हजारो युवकांनी अर्ज भरून आपली नावे नोंदविली. मात्र अर्जात अचूक माहिती भरलेली असतानाही अनेकांच्या मतदार ओळखपत्रात चुकीची माहिती नोंदविण्यात आली. यामुळे ओळखपत्र असूनही त्यांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागणार आहे. ओळखपत्रावरील नावातील चुकामुळे युवकात नाराजी आहे.विद्यार्थ्यांनी मतदार यादीत नाव नोंदवावे यासाठी महाविद्यालयात मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात आली. सोबतच जनजागृतीही करण्यात आली. याला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र अर्जात विद्यार्थ्याने आपले नाव श्रेयश राजेश कुंभलकर असे नमूद केले असताना श्रेयश या नावांमध्ये घोळ केला. तसेच वडिलांचे नाव राजेश कुंभारे असे नमूद करण्यात आले आहे, अशा तक्रारी इतरही युवकांनी केलेल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी नागपूर शहरातील २५ हजारांहून अधिक युवकांनी प्रथमच अर्ज भरले. मात्र निवडणूक विभागात नवीन अर्जधारकांची माहिती नोंदविताना चुकीची नोंदविण्यात आली आहे. नावात, वडिलांच्या नावात वा आडनावात चुका आहेत. मतदान करताना मतदार कार्डासोबतच ओळखपत्राची गरज असते. अशावेळी आधार कार्ड, पॅन कार्ड यावरील नाव व मतदार ओळखपत्रातील नावात साम्य नसल्याने अनेकांना मतदानाचा हक्क बजावता येणार नाही.नावात दुरुस्ती करण्याची प्रक्रिया सुरू असते. परंतु मतदार यादीतील चुकीची दुुरुस्ती १५ मार्चपूर्वी झाली असती तर त्यांची नावे मतदार यादीत आली असती. त्यांना लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हकक बजावता आला असता. परंतु आता ही वेळ संपत आहे. तसेच चुकीची दुरुस्ती करण्याचे अनेक जण टाळतात. अशा मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागणार आहे.ओळखपत्र बनविण्यापूर्वी पडताळणी व्हावीमतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी आलेल्या अर्जातील मजकूर व बनविण्यात येणाऱ्या ओळखपत्रावरील मजकुराची पडताळणी होण्याची गरज आहे. परंतु पडताळणी होत नसल्याने मतदार ओळखपत्रात चुका राहत असल्याची माहिती युवकांनी दिली.फोटो व मतदार क्रमांकावर मतदान करता येईलमतदार ओळखपत्रात काही चुका असल्या तर त्या दुरुस्तीसाठी बीएलओकडे अर्ज करता येतो. तसेच किरकोळ चुका असल्या तरी ओळखपत्रावर मतदाराचा फोटो आणि मतदान क्रमांक योग्य असला तरी मतदान करता येईल. त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागणार नाही. अशा प्रकारच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात येतील.अश्विन मुदगल, जिल्हाधिकारी

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpurनागपूर