शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

मिशनरीजकडून होत आहे, पोपच्या आदेशाचे उल्लंघन! फादर फ्रान्सिस दिब्रिटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 9:56 PM

४०० वर्षापूर्वी भारतात आलेल्या ख्रिश्नच मिशरीजपैकी काहींनी पोपच्या आदेशाला धुडकावून लावत, धर्मप्रसाराचे काम केल्याचा आरोप प्रख्यात साहित्यिक व समाजसेवक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी आज येथे केला.

ठळक मुद्देसाहित्य व्यासपीठावरून दिली कबुलीसंस्कृतीने सर्व भारतीय हिंदूच, उपासनेचा मार्ग वेगळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ४०० वर्षापूर्वी भारतात आलेल्या ख्रिश्नच मिशरीजपैकी काहींनी पोपच्या आदेशाला धुडकावून लावत, धर्मप्रसाराचे काम केल्याचा आरोप प्रख्यात साहित्यिक व समाजसेवक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी आज येथे केला.उस्मानाबाद येथे होऊ घातलेल्या ९३ व्या अ.भा. मराठीसाहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याच्या निमित्ताने विदर्भ साहित्य संघातर्फे प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांच्या हस्ते दिब्रिटो यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी, ते बोलत होते.४०० वर्षापूर्वी इंग्लंडहून ख्रिश्चन मिशनरी भारतात उतरले. तेव्हा, पोपने मिशनरीच्या सदस्यांना भारताला असलेल्या सर्वोच्च सांस्कृतिक वारसाची माहिती दिली होती. भारतात जाताना तेथील संस्कृतिक समृद्धीला धक्का लावू नका, धर्मप्रसार करू नका, त्या संस्कृतिक स्वत:ला सामावून घ्या आणि येसू ख्रिस्ताच्या संदेशाचा प्रसार करा, असे आदेश पोपने केले होते. पोपच्या त्या आदेशाला धुडकावून लावत धर्मप्रसार झाला. येथील संस्कृतीवर पाश्चिमात्य संस्कृती थोपण्याचे प्रयत्नही झाले. मात्र, त्यामुळे धार्मिक हानी झाली नाही, हेही खरे असल्याचे दिब्रिटो यावेळी म्हणाले.मी जेव्हा ‘फादर‘ होण्यासाठीचा अभ्यास करण्यास हाती घेतला. तेव्हा, चर्चच्या लायब्ररीमध्ये महाराष्ट्रातील संतांचेच साहित्य दिसले. तुकारामांचे अभंग वाचल्यावर लक्षात आले की बायबल आणि अभंगामधील उपदेशात कोणताच फरक नाही. ही जाणीव दूर करण्याची भूमिका साहित्यिकांनी करणे गरजेचे आहे. भारतीय संस्कृतीचा समाजधर्म हा हिंदूच आहे आणि आम्ही सुद्धा भारतीय हिंदूच आहोत. परदेशात आम्हालाही हिंदू म्हणूनच संबोधले जाते. प्रत्येकाची उपासना, आराधना पद्धती वेगळी आहे. असे असतानाही, सर्व एकोप्याने राहतो. हिंदू संस्कृतीच्या स्वभावधर्मामुळेच हे शक्य झाल्याचे दिब्रिटो म्हणाले. यावेळी, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर, सरचिटणीस विलास मानेकर, विलास देशपांडे उपस्थित होते. निवेदन प्रकाश एदलाबादकर यांनी केले.मराठी साहित्यिक वर्ग भूमिकाहीन, मग अभिजात दर्जा कसा मिळेल?जिथे पर्यावरण तिथे साहित्यिकांनी असावे. मात्र, वर्तमानातील साहित्यिक भूमिकाहीन असल्याचा आरोपही दिब्रिटो यांनी लावला. आरे कॉलनीतील दोन हजार झाडांची एका रात्रीत कत्तल करण्यात आली. मात्र, त्याविरोधात एकही मराठी साहित्यिक रस्त्यावर उतरला नाही किंवा साधा विरोधी शब्द उच्चारला नाही. जेव्हा संकट येते तेव्हा मंदिर किंवा मशिदीत जाऊन काहीच उपयोग होत नाही. संकटाचा सामना करावा लागतो, संघर्ष करावा लागतो. मात्र, मराठी साहित्यिकांमध्ये तो संघर्ष करण्याची क्षमता दिसत नाही. हे साहित्यिक स्वत:चीच अभिजातता विसरले तर मग मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधीच मिळणार नाही, असे दिब्रिटो म्हणाले. संघर्ष करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका मराठी साहित्यिक कधी घेतील, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Father Francis Dibritoफादर फ्रान्सिस दिब्रिटोmarathiमराठीliteratureसाहित्यnagpurनागपूर