शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

दुष्काळ घोषित करण्यासाठीचे निकष जटील असल्याची महसूल मंत्र्यांची कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 19:13 IST

दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्र सरकारचे नवीन निकष अतिशय जटील असल्याची बाब महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत कबुल केली.

ठळक मुद्देकेंद्राला विनंती करण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीला जाणार

आॅनलाईन लोकमतनागपूर : दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्र सरकारचे नवीन निकष अतिशय जटील असल्याची बाब महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत कबुल केली. हे निकष सोपे व सहज करण्याची विनंती केंद्र सरकारला करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मंत्री आणि आमदारांचे एक शिष्टमंडळ दिल्लीला सुद्धा जाणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.भाजपाचे सदस्य एकनाथ खडसे यांनी उपस्थित केलेल्या एका प्रश्नाला ते उत्तर देत होते. खडसे यांनी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, बोदवड आणि अंमळनेर तालुक्यात कमी पावसामुळे दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाल्याचा प्रश्न उपस्थित करीत या तालुक्यांना तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना शासकीय मदत जाहीर करा. जिल्हा नियोजन समितीपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत यासंदर्भात मागणी व तक्रार करून झाली. परंतु मदत मिळालेली नाही. तेव्हा राज्य सरकार स्वत:हून या शेतकऱ्यांना काही मदत करेल का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावर राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आजच मदत देण्याचे निर्देश दिले जातील, असे सांगितले. केंद्र सरकारच्या नवीन निकषामध्ये मातीतील ओलावा नुसार परिसर दुष्काळग्रस्त आहे की नाही, हे ठरवले जाणार आहे.एकनाथ खडसे यांनी केंद्र सरकारच्या नवीन धोरणाला केंद्राचा ‘फतवा’ असे म्हणत यात महाराष्ट्रातील एकही गाव दुष्काळग्रस्त घोषित होणार नाही, असे संगितले. त्यावर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी असे म्हणणे योग्य होणार नाही. नवीन निकषामध्ये गोंदिया जिल्ह्यातील तीन तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले आहेत. नवीन निकषातील अटी अतिशय जटील आहेत ही बाब मात्र त्यांनी मान्य केली.खडसे यांनी प्रत्येक तालुक्यातील किती गावे ५० पैशापेक्षा कमी आहेत याची माहिती दिली. त्यावर आकडेवारी तपासून दुष्काळ जाहीर केला जाईल, असे सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य अजित पवार यांनी भाग घेतला....तर एसडीआरएफ करेल मदतमहसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले की, दुष्काळ प्रभावित परिसराला मदत मिळाली नाही. तर राज्य सरकार एसडीआरएफच्या माध्यमातून मदत करण्याचा प्रयत्न करेल. अशा गावांना मदत देण्यासाठी शासन सकारातक असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७Farmerशेतकरी