शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2022 11:19 IST

राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे ७ व ८ फेब्रुवारी अशा दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत.

नागपूर : राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे ७ व ८ फेब्रुवारी अशा दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दरम्यान, ते नागपूर जिल्ह्यातील औष्णिक वीजकेंद्राद्वारे होणाऱ्या प्रदूषणाची पाहणी व फ्लाय अॅशच्या प्रश्नावर तसेच, चंद्रपूरमधील तलावाबाबत पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदलाचा आढावा आढावा घेणार आहेत. 

सोमवारी दुपारी २ वाजता आदित्य ठाकरे हे विषेश विमानाने नागपुरला आल्यानंतर तेथून ते कारने चंद्रपूरकडे रवाना होतील. चंद्रपुरातील रामाळा तलाव, बगड खिडकी, चांदा किल्ला स्वच्छता अभियानाची पाहणी करतील. जिल्ह्यातील पर्टनाबाबत आढावा बैठक घेतल्यानंतर ते रात्री नागपूरला परततील. 

नागपूर जिल्ह्यातील कोराडी व खापरखेडा या औष्णिक वीज प्रकल्पाच्या प्रदूषणाचा मुद्दा गंभीर बनला आहे. मध्यंतरी हा मुद्दा बराच गाजला होता. आदित्य ठाकरे यांनी याची दखल घेतली आहे. आदित्य ठाकरे मंगळवारी सकाळी ते या वीज प्रकल्पाचा आढावा घेतील व या परीसराला प्रदूषणापासून दिलासा देण्यासाठी पर्यावरण व उर्जा विभागाकडून संयुक्त योजना कार्यान्वित करण्याबाबत विचार ते बोलण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी)च्या नाेटीसनंतर शुक्रवारी (४ फेब्रुवारी) केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाच्या पथकाने काेराडी व खापरखेडा औष्णिक वीजकेंद्राद्वारे हाेणाऱ्या प्रदूषणाची पाहणी केली होती. वीजकेंद्रातून निघणारी पाईपलाईन जागाेजागी फुटल्याने नदी, तलाव व शेतात पसरलेला राखेचा प्रवाह पाहून त्यांनाही धक्का बसला. मंत्रालयाच्या पथकाने हा सर्व प्रकार ताबडताेब थांबविण्याचे कडक निर्देश साेबत असलेल्या महाजेनकाेच्या अधिकाऱ्यांना दिले.

टॅग्स :PoliticsराजकारणAditya Thackreyआदित्य ठाकरेenvironmentपर्यावरणpollutionप्रदूषणVidarbhaविदर्भ