बोर्डाच्या नियोजनशून्यतेमुळे लाखो विद्यार्थी संभ्रमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:08 IST2021-01-04T04:08:06+5:302021-01-04T04:08:06+5:30
नागपूर : राज्यात कोरोनाचा प्रकोप काहीसा मंदावला असून, हळूहळू सर्वच क्षेत्रांत कामकाज सुरू झाले आहे. डिसेंबर महिन्यापासून शाळाही ...

बोर्डाच्या नियोजनशून्यतेमुळे लाखो विद्यार्थी संभ्रमात
नागपूर : राज्यात कोरोनाचा प्रकोप काहीसा मंदावला असून, हळूहळू सर्वच क्षेत्रांत कामकाज सुरू झाले आहे. डिसेंबर महिन्यापासून शाळाही सुरू झाल्या आहेत. ९ ते १२ वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या शिकवणी सुरू झाल्या आहेत
दहावी व बारावीच्या परीक्षेचे विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु परीक्षा कधी होणार, अभ्यासक्रम किती असणार, पेपर पॅटर्न कोणता असणार, तोंडी व लेखी गुणांचे प्रमाण काय असणार, अभ्यासक्रम कमी झाल्यामुळे मूल्यमापन गुणदान किती व कसे असणार, परीक्षा ऑफलाईन की ऑनलाईन होणार, गुणदान तक्त्याचे नियोजन कसे असणार, हे प्रश्न आता भेडसावत आहेत.
आणखी अभ्यासक्रम कमी करणार आहे की नाही, परीक्षा बहुपर्यायी प्रश्नावली की जुन्याच पद्धतीची प्रश्नपत्रिका राहणार, त्या अनुषंगाने शिक्षकांचे प्रशिक्षण होणार किंवा नाही? असे अनेक प्रश्न विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या मनात असल्याने संपूर्ण शिक्षणक्षेत्रात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून गोंधळाची स्थिती आहे.
राज्यात दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेत दरवर्षी नागपूर विभागातून लाखो विद्यार्थी बसतात. त्यामुळे या विषयाकडे शिक्षण विभागाने गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.
- संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी, पालक व शिक्षकांचा संभ्रम दूर करून दहावी व बारावीच्या परीक्षेसंदर्भातील सर्व निकष निश्चित करून स्वयंस्पष्ट दिशा-निर्देश तत्काळ निर्गमित करावे. पालकांच्या, विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या मनातील संभ्रम दूर करावा.
- अनिल शिवणकर, शिक्षक
- दहा महिन्यांनंतर आता वर्ग ९ ते १२ च्या प्रत्यक्ष शाळा सुरू होणार आहे. कमी कालावधीत विद्यार्थ्यांंचा अभ्यासक्रम पूर्ण करायचा असला तरी शासनाकडून अभ्यासक्रम, पेपर पॅटर्न, परीक्षा पद्धती, मूल्यमापन याबाबतचे निश्चित धोरण नाही.
-दिलीप तडस, उपमुख्याध्यापक, विदर्भ बुनियादी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय