शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
"तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
3
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
4
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
5
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
7
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
9
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
10
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
11
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
12
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
13
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
14
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
15
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
16
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
17
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
18
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
19
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
20
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!

अहमदाबाद हावडा एक्सप्रेसवर मध्यरात्री दगडफेक? गाडी कामठी स्थानकाजवळ थांबवली!

By नरेश डोंगरे | Updated: September 20, 2024 23:40 IST

प्रशासनाकडून इन्कार, खालची गिट्टी उडाल्याचे उत्तर

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: अहमदाबाद हावडा एक्सप्रेसवर गुरुवारी मध्यरात्री समाजकंटकांनी दगडफेक केल्याची जोरदार चर्चा पसरली होती. यामुळे ही गाडी सुमारे १५ मिनिट कामठीनजिकच्या रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आल्याचेही वृत्त होते. रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) मात्र या घटनेचा ईन्कार केला असून, दगडफेकीची घटना घडली नाही तर ट्रॅकवर असलेली गिट्टी उसळल्याने गैरसमज झाल्याचे अधिकारी म्हणाले.

नेहमीप्रमाणे गुरुवारी मध्यरात्रीच्या दरम्यान अहमदाबाद हावडा एक्सप्रेस नागपूर रेेल्वे स्थानकावरून पुढच्या प्रवासाला मार्गस्थ झाली. कामठीकडे जात असताना कॅम्प परिसराच्या लाईनवर गाडीच्या इंजिवर तसेच बाजुच्या डब्याच्या खिडकीवर गिट्टीसारखे दगड आल्यासारखा भास झाला. त्यामुळे एकच उडाला. लोको पायलटने घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन काही अंतरावर तिरोडी स्थानकाजवळ गाडी थांबविली. रेल्वे कंट्रोल रूमला ही माहिती देण्यात आली. त्यानंतर कामठी तसेच नागपूरचे रेल्वे पोलीस (जीआरपी) आणि आरपीएफचा ताफा तिकडे धावला. ट्रेनच्या ड्रायव्हर, मॅनेजर तसेच अन्य काहींना विचारपूस करण्यात आली. रात्रीची वेळ असल्याने कुणी दगड भिरकावताना दिसला नाही. मात्र गाडीवर गिट्टीसारखे दगड आल्याचे स्पष्ट झाले.

सुरक्षेची खात्री केल्यानंतर गाडी पुढच्या प्रवासासाठी रवाना करण्यात आली. त्यानंतर जीआरपी आरपीएफने बरीच शोधाशोध केली. शेवटी रुळवार गिट्टी आली असावी आणि ती चाकात सापडून वर उडाली असावी, असा निष्कर्ष आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी काढला.

दरम्यान, या घटनेसंबंधाने सोशल मिडियावर उलटसुलट वृत्त व्हायरल झाले. त्यामुळे रात्रीच अनेकांनी आरपीएफ, जीआरपी तसेच रेल्वे कंट्रोल रूमकडे विचारणा केली. कुठलीही ठोस माहिती मिळत नसल्याने पहाटे २ वाजेपर्यंत या संबंधाने गोंधळ होता. आज सकाळी मात्र आरपीएफचे सुरक्षा आयुक्त दीपचंद आर्य घटनेचा ईन्कार केला. दगडफेकीची घटना घडलीच नाही, असे ठोसपणे त्यांनी सांगितले.

त्या घटनेची आठवण

वर्षभरापूर्वी वंदे भारत एक्सप्रेसवर कन्हानजवळ दगडफेक करण्यात आली होती. त्या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेत आरोपींना शोधून काढले होते. त्यांच्यावर रेल्वे अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. एवढेच नव्हे तर त्या घटनेनंतर आरपीएफकडून रेल्वे लाईनच्या बाजुला राहणाऱ्या वस्त्यांमधील, गावांतील नागरिकांचे समुपदेशनही करण्याची मोहिमही रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात आली होती. या घटनेमुळे शुक्रवारी सकाळपासून अनेकांना 'त्या' घटनेची आठवण झाली.

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर