शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

अहमदाबाद हावडा एक्सप्रेसवर मध्यरात्री दगडफेक? गाडी कामठी स्थानकाजवळ थांबवली!

By नरेश डोंगरे | Updated: September 20, 2024 23:40 IST

प्रशासनाकडून इन्कार, खालची गिट्टी उडाल्याचे उत्तर

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: अहमदाबाद हावडा एक्सप्रेसवर गुरुवारी मध्यरात्री समाजकंटकांनी दगडफेक केल्याची जोरदार चर्चा पसरली होती. यामुळे ही गाडी सुमारे १५ मिनिट कामठीनजिकच्या रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आल्याचेही वृत्त होते. रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) मात्र या घटनेचा ईन्कार केला असून, दगडफेकीची घटना घडली नाही तर ट्रॅकवर असलेली गिट्टी उसळल्याने गैरसमज झाल्याचे अधिकारी म्हणाले.

नेहमीप्रमाणे गुरुवारी मध्यरात्रीच्या दरम्यान अहमदाबाद हावडा एक्सप्रेस नागपूर रेेल्वे स्थानकावरून पुढच्या प्रवासाला मार्गस्थ झाली. कामठीकडे जात असताना कॅम्प परिसराच्या लाईनवर गाडीच्या इंजिवर तसेच बाजुच्या डब्याच्या खिडकीवर गिट्टीसारखे दगड आल्यासारखा भास झाला. त्यामुळे एकच उडाला. लोको पायलटने घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन काही अंतरावर तिरोडी स्थानकाजवळ गाडी थांबविली. रेल्वे कंट्रोल रूमला ही माहिती देण्यात आली. त्यानंतर कामठी तसेच नागपूरचे रेल्वे पोलीस (जीआरपी) आणि आरपीएफचा ताफा तिकडे धावला. ट्रेनच्या ड्रायव्हर, मॅनेजर तसेच अन्य काहींना विचारपूस करण्यात आली. रात्रीची वेळ असल्याने कुणी दगड भिरकावताना दिसला नाही. मात्र गाडीवर गिट्टीसारखे दगड आल्याचे स्पष्ट झाले.

सुरक्षेची खात्री केल्यानंतर गाडी पुढच्या प्रवासासाठी रवाना करण्यात आली. त्यानंतर जीआरपी आरपीएफने बरीच शोधाशोध केली. शेवटी रुळवार गिट्टी आली असावी आणि ती चाकात सापडून वर उडाली असावी, असा निष्कर्ष आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी काढला.

दरम्यान, या घटनेसंबंधाने सोशल मिडियावर उलटसुलट वृत्त व्हायरल झाले. त्यामुळे रात्रीच अनेकांनी आरपीएफ, जीआरपी तसेच रेल्वे कंट्रोल रूमकडे विचारणा केली. कुठलीही ठोस माहिती मिळत नसल्याने पहाटे २ वाजेपर्यंत या संबंधाने गोंधळ होता. आज सकाळी मात्र आरपीएफचे सुरक्षा आयुक्त दीपचंद आर्य घटनेचा ईन्कार केला. दगडफेकीची घटना घडलीच नाही, असे ठोसपणे त्यांनी सांगितले.

त्या घटनेची आठवण

वर्षभरापूर्वी वंदे भारत एक्सप्रेसवर कन्हानजवळ दगडफेक करण्यात आली होती. त्या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेत आरोपींना शोधून काढले होते. त्यांच्यावर रेल्वे अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. एवढेच नव्हे तर त्या घटनेनंतर आरपीएफकडून रेल्वे लाईनच्या बाजुला राहणाऱ्या वस्त्यांमधील, गावांतील नागरिकांचे समुपदेशनही करण्याची मोहिमही रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात आली होती. या घटनेमुळे शुक्रवारी सकाळपासून अनेकांना 'त्या' घटनेची आठवण झाली.

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर