शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

म्हाडा कॉलनीच्या नागरिकांचा मतदानावर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 01:19 IST

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान गुरुवारी पार पडले. यादरम्यान लाखो नागरिकांनी मतदानाचा अधिकार बजावला. मात्र यावेळी झिंगाबाई टाकळी परिसरातील म्हाडा कॉलनी येथील नागरिकांनी मतदान करण्यास नकार दिला. मिळालेल्या माहितीनुसार येथे राहणाऱ्या जवळपास ३८ कुटुंबीयांनी मतदानावरच बहिष्कार टाकला. २५ वर्षापासून कॉलनीसाठी रस्ता आणि नागरी सुविधा नसल्याने नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला.

ठळक मुद्देनागरी सुविधा न मिळाल्याने घेतला निर्णय : १५० नागरिकांनी केले नाही मतदान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान गुरुवारी पार पडले. यादरम्यान लाखो नागरिकांनी मतदानाचा अधिकार बजावला. मात्र यावेळी झिंगाबाई टाकळी परिसरातील म्हाडा कॉलनी येथील नागरिकांनी मतदान करण्यास नकार दिला. मिळालेल्या माहितीनुसार येथे राहणाऱ्या जवळपास ३८ कुटुंबीयांनी मतदानावरच बहिष्कार टाकला. २५ वर्षापासून कॉलनीसाठी रस्ता आणि नागरी सुविधा नसल्याने नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला.येथील रहिवासी मिहिर पानतावणे यांनी सांगितले की १९९५ पासून ही कॉलनी वसलेली आहे. वस्तीच्या ले-आऊटनुसार म्हाडा कॉलनीला जोडणारे दोन रस्ते मंजूर आहेत. मात्र सत्यपरिस्थिती वेगळीच आहे. गेल्या २५ वर्षापासून येथील नागरिक रस्त्याची प्रतीक्षाच करीत असल्याचे त्यांनी सांगितले. म्हाडा कार्यालय व नागपूर सुधार प्रन्यास कार्यालयाच्या अधिकाऱ्यांशी असंख्य बैठका घेण्यात आल्या, अनेकदा निवेदने सादर करण्यात आली. अनेकदान आंदोलन आणि उपोषणावर बसले. मात्र प्रशासनाने नागरिकांची दखल घेतली नसल्याचा आरोप त्यांनी केला. आरटीआयद्वारे प्राप्त माहितीनुसार म्हाडा कॉलनीच्या खसरा क्रमांक २०९ व २१० साठी १२ मीटरचा रोड मंजूर आहे. मात्र योजनेनुसार दोन्ही संस्थांनी रस्ता तयार करण्यासाठी काहीच केले नाही. विशेष म्हणजे येथील नागरिकांनी काही दिवसांपूर्वी मानकापूर रस्ता चोरीला गेल्याची तक्रारही दाखल केली होती. आम्ही आमच्या प्रयत्नाने रस्ता तयार केला असता, मात्र आता फेन्सिंग व सुरक्षा भिंत बांधल्यामुळे रस्ताच बंद झाला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी रस्ताच उरला नाही. गेल्या काही वर्षापासून अनेकदा तक्रार करूनही स्थानिक लोकप्रतिनिधीही कॉलनीला भेट देण्यास आले नसल्याचे त्यांनी सांगितले. रस्त्यासाठी संघर्ष करणाºया नागरिकांनी मतदानावरच बहिष्कार टाकला. ३८ कुटुंबाच्या १५० च्यावर पात्र मतदारांनी मतदान केले नसल्याचे सांगण्यात येत आहे. केवळ निवडणुकीवर बहिष्कार नाही तर येथील नागरिकांनी राजकीय नेत्यांना बैठक किंवा रॅली काढू दिली नाही.नगरसेवकांनी नागरिकांना धरले जबाबदारयाबाबत नगरसेवक भूषण शिंगणे यांना विचारले असता त्यांनी नागरिकांवर रोष व्यक्त केला. कॉलनीचा रस्ता बांधण्यासाठी आवश्यक जागा मिळविण्याची प्रक्रिया सुरू आहे. रस्त्यासाठी निर्धारीत जमीन सरकारची असल्याचे वाटले मात्र ही जमीन वक्फ बोर्डाची असल्याने अडचणी येत आहेत. आम्ही समन्वयाने ही समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत आहोत, मात्र रहिवासी आक्रमक असून तेच सहकार्य करीत नसल्याचे शिंगणे यांनी सांगितले.मिहान प्रकल्पग्रस्तांचा बहिष्कार मागेमिहान प्रकल्प पुनर्वसन समिती व प्रकल्पग्रस्तांनी शिवणगाव येथील वित्तुबाबानगर परिसरात बॅनर लावून आपला रोष व्यक्त केला होता. मतदानावर बहिष्कार टाकण्याचीदेखील त्यांनी भूमिका घेतली होती. राजकीय नेते आणि प्रशासनाने आमचे म्हणणे ऐकावे अशी नागरिकांची अपेक्षा होती. त्यातच पोलिसांनी येथील कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पावले उचलली होती. ही बाब शिवसेनेचे गजानन चकोले यांना कळताच त्यांनी भाजपाचे मनपातील सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांना बुधवारी याची कल्पना दिली. बुधवारी रात्रीच संदीप जोशी यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी त्यांच्या प्रतिनिधींचे बोलणे करून दिले. बावनकुळे यांनी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या. जोशी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर प्रकल्पग्रस्तांनी बहिष्कार मागे घेतला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019