शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

‘मेट्रो’, ‘मिहान’ मीच आणले; मुत्तेमवारांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 10:09 IST

नागपूरच्या विकासाच्या मुद्यावरुन कॉंग्रेस व भाजपाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी मागील पाच वर्षांमध्ये शहरात कुठले प्रकल्प आले, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देमागील पाच वर्षांत कुठले प्रकल्प आले ?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरच्या विकासाच्या मुद्यावरुन कॉंग्रेस व भाजपाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी मागील पाच वर्षांमध्ये शहरात कुठले प्रकल्प आले, असा प्रश्न उपस्थित केला आहे. नागपुरात ‘मेट्रो’ तसेच ‘मिहान’ हे प्रकल्प तर मीच आणले होते. मात्र भाजपाचे नेते सर्व ‘क्रेडिट’ घेत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. रविवारी देवडिया कॉंग्रेस भवन येथे कॉंग्रेस नेत्यांची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.‘मेट्रो’ची सैद्धांतिक मान्यता आणणे, ‘डीपीआर’ तयार करणे मीच केले. भूमिपूजन होऊ शकले नाही. आता दोन दिवस ‘मेट्रो’ चालवली तर भाजपचे लोक ‘क्रेडिट’ घेत आहेत. नाना पटोले यांना शहराची माहिती तरी काय असे भाजपचे लोक म्हणतात. मात्र लोकसभेची निवडणूक ही उमेदवाराची नाही तर कार्यकर्त्याची असते. शासनाने बाबा रामदेव यांना कवडीमोल दरात जमीन दिली. मात्र येथे रोजगार तर मिळालेच नाही. शहरात रोजगारनिर्मिती किती झाली यावर भाजपचे लोक का बोलत नाहीत, असा सवाल मुत्तेमवार यांनी केला. राजकारणात आरोप प्रत्यारोप होतात. पण विदर्भवाद्यांच्या तोंडाला गेल्या पाच वर्षांत पानेच पुसण्यात आली आहेत. नागपुरात संघभूमी विरुद्ध दीक्षाभूमी अशी लढाई असल्याचे नाना पटोले यावेळी म्हणाले. दरम्यान, नाना पटोले यांना कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतभेद विसरुन कामाला लागावे, असा या बैठकीत नेत्यांचा सूर होता. यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे, नाना पटोले, बाबुराव तिडके, यादवराव देवगडे, अ‍ॅड. अभिजित वंजारी, शेख हुसैन, विशाल मुत्तेमवार, अतुल कोटेचा, संजय महाकाळकर, अतुल लोंढे यांच्यासह शहर काँगे्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक व विविध आघाड्यांचे पदधिकारी उपस्थित होते.

बूथवर मते मिळाली तरच पद राहणारकाँग्रेसमधील अनेक नेते भाजपात गेले तर अनेक लाभार्थी झालेत. पक्षाच्या झेंड्याखाली राहतात पण इतरांसाठी काम करतात. अशा नेत्यांची गय केली जाणार नाही. राज्यात व देशात सत्ता नसूनही कार्यकर्त्यांनी पक्ष जिवंत ठेवला. पक्षाचा पदाधिकारी असलेल्या बूथवर उमेदवाराला अधिक मते मिळाली तरच तो पदाधिकारी पदावर कायम राहील, असा इशारा विकास ठाकरे यांनी यावेळी दिला.

टॅग्स :Vilas Muttemwarविलास मुत्तेमवार