शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
4
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
5
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
6
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
7
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
8
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
9
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
10
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
11
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
12
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
13
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
14
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
15
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
16
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
18
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
19
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
20
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग

दैनावस्थेवर अश्रू ढाळतेय इतवारीतील शहिदांचे स्मारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 00:27 IST

इतवारीतील शहीद स्मारकाची दैनावस्था पाहून याची जाणीव होते. अनेक दिवसांपासून साफसफाई झाली नसल्याने कचरा पसरलेला आहे, सौंदर्यीकरणाचे नाव नाही, इतिहासाच्या नोंदीही मिटत चालल्या आहेत आणि अतिक्रमणामुळे स्मारकाचे अस्तित्वच नाहीसे होण्याची भीती निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : या देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या, प्रसंगी प्राणाची बाजी लावणाऱ्या शहिदांच्या त्यागामुळेच स्वातंत्र्याची पहाट उगवली आहे. त्या वीरांच्या स्मृतींना उजाळा म्हणून शहीद स्मारकांची उभारणी करण्यात आली. मात्र काळ पुढे सरकतो तसे त्या शहिदांच्या आठवणी व त्यांच्या स्मारकांचा सन्मान विस्मृतीत जात आहे. इतवारीतील शहीद स्मारकाची दैनावस्था पाहून याची जाणीव होते. अनेक दिवसांपासून साफसफाई झाली नसल्याने कचरा पसरलेला आहे, सौंदर्यीकरणाचे नाव नाही, इतिहासाच्या नोंदीही मिटत चालल्या आहेत आणि अतिक्रमणामुळे स्मारकाचे अस्तित्वच नाहीसे होण्याची भीती निर्माण झाली आहे.स्वातंत्र्याच्या ऊर्मीने भारावलेला तो काळ होता. १९४२ ला महात्मा गांधी व राष्ट्रीय नेत्यांनी इंग्रजांविरुद्ध ‘चले जाव’ची घोषणा दिली आणि देश पेटून उठला. या वणव्याची ठिणगी नागपुरातही पडली. गांधीजींच्या अटकेच्या वृत्ताने हा वणवा आणखी भडकला. हजारो लोक रस्त्यावर उतरले. मेयो रुग्णालयासमोर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कृष्णराव काकडे शहीद झाले. महाल भागात झालेल्या गोळीबारात वडिलांचा मृत्यू झाल्याने १७ वर्षाचे शंकर महाले आंदोलनात उतरले. त्यांच्या साथीदारांनी चिटणवीसपुरा पोलीस चौकीवर हल्ला केला. यानंतर महालेंसह आंदोलनातील पाच जणांना फाशी देण्यात आली. लोकांमध्ये असंतोष भडकला होता. सतत आठ दिवस ही धगधग चालली होती. अनेकांनी आपले प्राण गमावले तर अनेकजण भूमिगत झाले. जुना भंडारा रोडवर झालेल्या गोळीबारात आठ आंदोलक शहीद झाले. म्हणूनच गोळीबार चौक अशीच त्याची ओळख आहे. त्या चौकातील स्मारकांवर शहिदांच्या नावाचा उल्लेख आहे. आंदोलनकर्त्यांनी इतवारीतील पोस्ट ऑफिस जाळल्याची नोंद आहे. स्थानिक ज्येष्ठ नागरिक डॉ. संतोष मोदी यांनी त्यावेळच्या आठवणींना उजाळा दिला. या चौकात नागपुरातील नामांकित राजकीय नेत्यांची बैठक होती. जनरल मंचरशा आवारी, महात्मा भगवान दिन, पूनमचंद रांका, लालचंद मोदी, प्यारेलाल गोयल, महादेव मोदी, पन्नालाल देवडिया, भोलासिंग नायक, रामचंद्रसाव लांजेवार, विद्यावती देवडिया, दीनदयाल गुप्ता, वामनराव गावंडे यांच्यासह अनेकविध नेत्यांच्या उपस्थितीने हा चौक नेहमी गजबजला आहे. जांबुवंतराव धोटे यांनी स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी १९६२ पासून शहीद स्मारकापासून आंदोलन सुरू केले होते.कचरा, अतिक्रमण, दारूच्या बॉटल्सअनेक दिवसांपासून स्मारकाच्या परिसराची साफसफाई न झाल्यामुळे सभोवताल कचरा पसरलेला आहे. स्मारकाचे संगमरवर अनेक भागातून खंडित झाले आहे. स्मारकाच्या परिसरात श्वानांचा आराम चाललेला असतो. असामाजिक तत्त्वांचा वावर येथे राहत असल्याने स्तंभाजवळच मद्य व पाण्याच्या बॉटल्स पडलेल्या दिसून येतात. फेरीवाले, पावभाजीचे ठेलेवाले आणि काही स्थानिक दुकानदारांचेही अतिक्रमण येथे झालेले दिसून येते. काही दुकानदार येथेच साहित्यही ठेवतात व कचराही टाकतात. अवैध होर्डिंग्जने स्मारकावरच कब्जा केल्याचे दिसते, त्यामुळे स्मारकाचाच शोध घ्यावा लागतो. स्मारकाच्या लोखंडी रॉडला दुकानदार कापडी छत बांधतात. स्मारकाचे सौंदर्यीकरणही करण्यात आले पण देखभाल दुरुस्तीअभावी पुन्हा त्याची दुरवस्था होत आहे.स्मारकाचा इतिहासडॉ. संतोष मोदी यांनी सांगितले, या धगधगत्या इतिहासाची आठवण म्हणून स्वातंत्र्याच्या काही महिन्यांपूर्वी त्यावेळी शहराचे केंद्र असलेल्या इतवारी भागात हे स्मारक उभे करण्यात आले. मौलाना अबुल कलाम आझाद, राज्यपाल मंगलदास पक्वासा, काँग्रेस अध्यक्ष कृपलानी यांच्या उपस्थितीत २९ नोव्हेंबर १९४६ रोजी स्मारकाचे उद्घाटन झाल्याचा येथे उल्लेख आहे. यावेळी आझाद यांनी व्यक्त केलेल्या भावना स्मारकावर कोरल्या आहेत. चार पायऱ्या चढून गेल्यानंतर उंच शहीद स्तंभ आहे. त्यामागे महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस, क्रांतिवीर चंद्रशेखर आझाद यांच्या मूर्ती कोरल्या आहेत. पुढे दरवर्षी हजारो लोक या स्मारकाला मानवंदना देण्यासाठी गोळा होत पण आता कुणाला त्याची आठवणही होत नसल्याची खंत डॉ. मोदी यांनी व्यक्त केली.

टॅग्स :nagpurनागपूर