शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

आठवणीतील निवडणूक; कच्च्या चिवड्याने मिळायची ऊर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 11:27 IST

तेव्हाचे उमेदवारही चारित्र्यवान होते. इंग्रज राजवटीत त्यांनी भोगलेल्या अत्याचारामुळे ते राष्ट्रप्रेमी होते अशा हृद्य स्मरणांमध्ये रमलेले ज्येष्ठ नागरिक सिद्धेश्वर गिºहाठे यांनी जुन्या काळातील निवडणुकांच्या आठवणींना उजाळा दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आता डझनभर पक्ष निवडणुकीत दिसतात. स्वातंत्र्यानंतर मात्र दोनच पक्षात निवडणुका व्हायच्या. त्यातही कॉँग्रेस याच पक्षाचे उमेदवार निवडून यायचे. तेव्हाचे उमेदवारही चारित्र्यवान होते. इंग्रज राजवटीत त्यांनी भोगलेल्या अत्याचारामुळे ते राष्ट्रप्रेमी होते अशा हृद्य स्मरणांमध्ये रमलेले ज्येष्ठ नागरिक सिद्धेश्वर गिºहाठे यांनी जुन्या काळातील निवडणुकांच्या आठवणींना उजाळा दिला. स्वातंत्र्याची जाणीव त्यांना होती. स्वातंत्र्य टिकले पाहिजे ही भावना उमेदवाराबरोबरच कार्यकर्त्यांमध्ये होती. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारात दारू, पैसा याला थाराच नव्हता. दमलेल्या कार्यकर्त्यांना कच्च्या चिवड्यानेही ऊर्जा मिळायची. उलट तेव्हा घरातील ज्येष्ठ मंडळी घरच्या लष्कराच्या भाकरी खाऊन नोकरी करू नये, असे राजकारणात येणाऱ्यांना म्हणायचे. आज अगदी चित्र उलट आहे. राजकारणातून मिळणारी प्रतिष्ठा, सवलत, संपत्ती यामुळे जुन्या काळी असलेले निवडणुकीचे पावित्र खऱ्या अर्थाने हरविले आहे. तेव्हाचा प्रचारही आजसारखा नव्हता. उमेदवार घरोघरी जाऊन, प्रत्यक्ष मतदाराला भेटून आपण निवडणुकीत का उभे आहोत, याबद्दल सांगायचा. त्याकाळी काँग्रेस पक्षाचे निवडणुक चिन्ह बैलजोडी होते. त्यामुळे प्रचाराचे साधनही बैलगाडीच असायचे. याशिवाय सोंगाडे, दंडारमध्ये काम करणारे कलावंत उमेदवाराचा प्रचार करायचे. मतदानाच्या एक दिवसापूर्वी कोतवालाकडून गावात दवंडी दिली जायची. त्याकाळी आचारसंहिता नसली तरी, शिस्त होती, भीती होती. तहसिलदार आणि ठाणेदाराचा दरारा होता. निवडणुकीत जातीपातीचे राजकारणच नव्हते. उमेदवारांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रप्रेम राष्ट्रभक्ती होती असे ते पुढे म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक