शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

आठवणीतील निवडणूक; कच्च्या चिवड्याने मिळायची ऊर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 11:27 IST

तेव्हाचे उमेदवारही चारित्र्यवान होते. इंग्रज राजवटीत त्यांनी भोगलेल्या अत्याचारामुळे ते राष्ट्रप्रेमी होते अशा हृद्य स्मरणांमध्ये रमलेले ज्येष्ठ नागरिक सिद्धेश्वर गिºहाठे यांनी जुन्या काळातील निवडणुकांच्या आठवणींना उजाळा दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आता डझनभर पक्ष निवडणुकीत दिसतात. स्वातंत्र्यानंतर मात्र दोनच पक्षात निवडणुका व्हायच्या. त्यातही कॉँग्रेस याच पक्षाचे उमेदवार निवडून यायचे. तेव्हाचे उमेदवारही चारित्र्यवान होते. इंग्रज राजवटीत त्यांनी भोगलेल्या अत्याचारामुळे ते राष्ट्रप्रेमी होते अशा हृद्य स्मरणांमध्ये रमलेले ज्येष्ठ नागरिक सिद्धेश्वर गिºहाठे यांनी जुन्या काळातील निवडणुकांच्या आठवणींना उजाळा दिला. स्वातंत्र्याची जाणीव त्यांना होती. स्वातंत्र्य टिकले पाहिजे ही भावना उमेदवाराबरोबरच कार्यकर्त्यांमध्ये होती. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारात दारू, पैसा याला थाराच नव्हता. दमलेल्या कार्यकर्त्यांना कच्च्या चिवड्यानेही ऊर्जा मिळायची. उलट तेव्हा घरातील ज्येष्ठ मंडळी घरच्या लष्कराच्या भाकरी खाऊन नोकरी करू नये, असे राजकारणात येणाऱ्यांना म्हणायचे. आज अगदी चित्र उलट आहे. राजकारणातून मिळणारी प्रतिष्ठा, सवलत, संपत्ती यामुळे जुन्या काळी असलेले निवडणुकीचे पावित्र खऱ्या अर्थाने हरविले आहे. तेव्हाचा प्रचारही आजसारखा नव्हता. उमेदवार घरोघरी जाऊन, प्रत्यक्ष मतदाराला भेटून आपण निवडणुकीत का उभे आहोत, याबद्दल सांगायचा. त्याकाळी काँग्रेस पक्षाचे निवडणुक चिन्ह बैलजोडी होते. त्यामुळे प्रचाराचे साधनही बैलगाडीच असायचे. याशिवाय सोंगाडे, दंडारमध्ये काम करणारे कलावंत उमेदवाराचा प्रचार करायचे. मतदानाच्या एक दिवसापूर्वी कोतवालाकडून गावात दवंडी दिली जायची. त्याकाळी आचारसंहिता नसली तरी, शिस्त होती, भीती होती. तहसिलदार आणि ठाणेदाराचा दरारा होता. निवडणुकीत जातीपातीचे राजकारणच नव्हते. उमेदवारांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रप्रेम राष्ट्रभक्ती होती असे ते पुढे म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक