शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

आठवणीतील निवडणूक; कच्च्या चिवड्याने मिळायची ऊर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 11:27 IST

तेव्हाचे उमेदवारही चारित्र्यवान होते. इंग्रज राजवटीत त्यांनी भोगलेल्या अत्याचारामुळे ते राष्ट्रप्रेमी होते अशा हृद्य स्मरणांमध्ये रमलेले ज्येष्ठ नागरिक सिद्धेश्वर गिºहाठे यांनी जुन्या काळातील निवडणुकांच्या आठवणींना उजाळा दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आता डझनभर पक्ष निवडणुकीत दिसतात. स्वातंत्र्यानंतर मात्र दोनच पक्षात निवडणुका व्हायच्या. त्यातही कॉँग्रेस याच पक्षाचे उमेदवार निवडून यायचे. तेव्हाचे उमेदवारही चारित्र्यवान होते. इंग्रज राजवटीत त्यांनी भोगलेल्या अत्याचारामुळे ते राष्ट्रप्रेमी होते अशा हृद्य स्मरणांमध्ये रमलेले ज्येष्ठ नागरिक सिद्धेश्वर गिºहाठे यांनी जुन्या काळातील निवडणुकांच्या आठवणींना उजाळा दिला. स्वातंत्र्याची जाणीव त्यांना होती. स्वातंत्र्य टिकले पाहिजे ही भावना उमेदवाराबरोबरच कार्यकर्त्यांमध्ये होती. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारात दारू, पैसा याला थाराच नव्हता. दमलेल्या कार्यकर्त्यांना कच्च्या चिवड्यानेही ऊर्जा मिळायची. उलट तेव्हा घरातील ज्येष्ठ मंडळी घरच्या लष्कराच्या भाकरी खाऊन नोकरी करू नये, असे राजकारणात येणाऱ्यांना म्हणायचे. आज अगदी चित्र उलट आहे. राजकारणातून मिळणारी प्रतिष्ठा, सवलत, संपत्ती यामुळे जुन्या काळी असलेले निवडणुकीचे पावित्र खऱ्या अर्थाने हरविले आहे. तेव्हाचा प्रचारही आजसारखा नव्हता. उमेदवार घरोघरी जाऊन, प्रत्यक्ष मतदाराला भेटून आपण निवडणुकीत का उभे आहोत, याबद्दल सांगायचा. त्याकाळी काँग्रेस पक्षाचे निवडणुक चिन्ह बैलजोडी होते. त्यामुळे प्रचाराचे साधनही बैलगाडीच असायचे. याशिवाय सोंगाडे, दंडारमध्ये काम करणारे कलावंत उमेदवाराचा प्रचार करायचे. मतदानाच्या एक दिवसापूर्वी कोतवालाकडून गावात दवंडी दिली जायची. त्याकाळी आचारसंहिता नसली तरी, शिस्त होती, भीती होती. तहसिलदार आणि ठाणेदाराचा दरारा होता. निवडणुकीत जातीपातीचे राजकारणच नव्हते. उमेदवारांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रप्रेम राष्ट्रभक्ती होती असे ते पुढे म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक