शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

औषध व्यावसायिकांची विम्याच्या पूर्ततेसाठी फरफट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 11:26 PM

मध्यभारतातील औषधांची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या गंजीपेठीतील संदेश दवा बाजाराला शुक्रवारी आग लागली. या आगीत अनेक व्यापाऱ्यांच्या करोडो रुपयांच्या औषधांचा साठा खाक झाला. काही व्यापाऱ्यांनी औषधांचा विमा उतरविला होता. पण विमा कंपन्या नुकसान भरपाई देताना शेतकऱ्यांसारखीच व्यापाऱ्यांची सुद्धा थट्टा करीत आहे. व्यापाऱ्यांकडून वेगवेगळे दस्तावेज मागवत असून, त्याची पूर्तता करता करता व्यापारी हतबल झाले आहे.

ठळक मुद्देआगीत नुकसान झालेले व्यापारी हतबल : कंपन्यांकडून वेगवेगळ्या दस्तावेजाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्यभारतातील औषधांची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या गंजीपेठीतील संदेश दवा बाजाराला शुक्रवारी आग लागली. या आगीत अनेक व्यापाऱ्यांच्या करोडो रुपयांच्या औषधांचा साठा खाक झाला. काही व्यापाऱ्यांनी औषधांचा विमा उतरविला होता. पण विमा कंपन्या नुकसान भरपाई देताना शेतकऱ्यांसारखीच व्यापाऱ्यांची सुद्धा थट्टा करीत आहे. व्यापाऱ्यांकडून वेगवेगळे दस्तावेज मागवत असून, त्याची पूर्तता करता करता व्यापारी हतबल झाले आहे.संदेश दवा बाजाराला आग लागल्यानंतर औषधांचा तुटवडा भासू लागला आहे. आग लागून चार दिवस झाल्यानंतरही औषधांची दुकाने सुरू झालेली नाही. शासनाच्या विविध यंत्रणेकडून कारवाया सुरू आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून सातत्याने तपासण्या सुरू आहे. अग्निशमन विभागाकडून वेगळी कारवाई सुरू आहे. पोलिसांचे पंचनामे सातत्याने सुरू आहे. दुसरीकडे करोडो रुपयांचा औषधांचा साठा खाक झाल्याने व्यापारी वेगळ्या चिंतेत आहे. अशात काही व्यापाऱ्यांनी औषधांचा विमाही उतरविला होता. त्यांना विमा कंपन्यांकडून विम्याची पूर्तता होईल, अशी अपेक्षा होती. घटनेनंतर विमा कंपन्यांचे प्रतिनिधी पाच पाच वेळा चौकशीसाठी घटनास्थळी आले. घटनास्थळाचे निरीक्षण करून गेल्यानंतर २० ते २५ प्रकारचे वेगवेगळे दस्तावेज उपलब्ध करून देण्याची मागणी व्यापाऱ्यांना केली. विशेष म्हणजे काही व्यापाऱ्यांच्या दुकांनाची अक्षरश: राखरांगोळी झाली आहे. त्यांच्याजवळील दस्तावेज सुद्धा यात नष्ट झाले आहे. अशावेळी विमा कंपन्यांकडून मागणी करण्यात येणाऱ्या दस्तावेजाची पूर्तता कशी करणार असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे. या आगीत १०० टक्के नुकसान झालेल्यांमध्ये पुनित मेडिकल, विजय मेडिकोज, सिद्धाविनायक मेडिकल, दयाल ट्रेडलिंक, साहू मेडिकल, साईमीरा एजन्सीज नावाने १० ते १२ व्यापारी आहे.आगीत नुकसान झालेल्या ६० टक्के व्यापाऱ्यांनी विमा उतरविला आहे तर ४० टक्के व्यापाऱ्यांनी विमा काढला नाही. ज्यांनी विमा काढला नाही अशा व्यापाऱ्यांना बिंल्डींगचे बांधकाम केलेल्या बिल्डरने २० टक्के नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले आहे. पण ज्या व्यापाऱ्यांनी प्रामाणिकपणे विमा काढला, त्या व्यापाऱ्यांचा छळ विमा कंपन्या करीत आहे. व्यापारी झालेल्या नुकसानाने हतबल झाल्या असून, शासनाने यात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. शासनाने विमा कंपन्यांवर अंकुश ठेवून व्यापाऱ्यांना होणारा त्रास कमी करावा, अशी मागणी व्यापाऱ्यांची आहे.

टॅग्स :fireआगmedicinesऔषधंbusinessव्यवसाय