शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
4
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
5
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
6
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
7
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
8
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
9
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
10
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
11
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
12
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
13
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
14
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
15
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
16
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
17
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
18
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
19
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
20
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...

औषध व्यावसायिकांची विम्याच्या पूर्ततेसाठी फरफट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 23:30 IST

मध्यभारतातील औषधांची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या गंजीपेठीतील संदेश दवा बाजाराला शुक्रवारी आग लागली. या आगीत अनेक व्यापाऱ्यांच्या करोडो रुपयांच्या औषधांचा साठा खाक झाला. काही व्यापाऱ्यांनी औषधांचा विमा उतरविला होता. पण विमा कंपन्या नुकसान भरपाई देताना शेतकऱ्यांसारखीच व्यापाऱ्यांची सुद्धा थट्टा करीत आहे. व्यापाऱ्यांकडून वेगवेगळे दस्तावेज मागवत असून, त्याची पूर्तता करता करता व्यापारी हतबल झाले आहे.

ठळक मुद्देआगीत नुकसान झालेले व्यापारी हतबल : कंपन्यांकडून वेगवेगळ्या दस्तावेजाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्यभारतातील औषधांची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या गंजीपेठीतील संदेश दवा बाजाराला शुक्रवारी आग लागली. या आगीत अनेक व्यापाऱ्यांच्या करोडो रुपयांच्या औषधांचा साठा खाक झाला. काही व्यापाऱ्यांनी औषधांचा विमा उतरविला होता. पण विमा कंपन्या नुकसान भरपाई देताना शेतकऱ्यांसारखीच व्यापाऱ्यांची सुद्धा थट्टा करीत आहे. व्यापाऱ्यांकडून वेगवेगळे दस्तावेज मागवत असून, त्याची पूर्तता करता करता व्यापारी हतबल झाले आहे.संदेश दवा बाजाराला आग लागल्यानंतर औषधांचा तुटवडा भासू लागला आहे. आग लागून चार दिवस झाल्यानंतरही औषधांची दुकाने सुरू झालेली नाही. शासनाच्या विविध यंत्रणेकडून कारवाया सुरू आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून सातत्याने तपासण्या सुरू आहे. अग्निशमन विभागाकडून वेगळी कारवाई सुरू आहे. पोलिसांचे पंचनामे सातत्याने सुरू आहे. दुसरीकडे करोडो रुपयांचा औषधांचा साठा खाक झाल्याने व्यापारी वेगळ्या चिंतेत आहे. अशात काही व्यापाऱ्यांनी औषधांचा विमाही उतरविला होता. त्यांना विमा कंपन्यांकडून विम्याची पूर्तता होईल, अशी अपेक्षा होती. घटनेनंतर विमा कंपन्यांचे प्रतिनिधी पाच पाच वेळा चौकशीसाठी घटनास्थळी आले. घटनास्थळाचे निरीक्षण करून गेल्यानंतर २० ते २५ प्रकारचे वेगवेगळे दस्तावेज उपलब्ध करून देण्याची मागणी व्यापाऱ्यांना केली. विशेष म्हणजे काही व्यापाऱ्यांच्या दुकांनाची अक्षरश: राखरांगोळी झाली आहे. त्यांच्याजवळील दस्तावेज सुद्धा यात नष्ट झाले आहे. अशावेळी विमा कंपन्यांकडून मागणी करण्यात येणाऱ्या दस्तावेजाची पूर्तता कशी करणार असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे. या आगीत १०० टक्के नुकसान झालेल्यांमध्ये पुनित मेडिकल, विजय मेडिकोज, सिद्धाविनायक मेडिकल, दयाल ट्रेडलिंक, साहू मेडिकल, साईमीरा एजन्सीज नावाने १० ते १२ व्यापारी आहे.आगीत नुकसान झालेल्या ६० टक्के व्यापाऱ्यांनी विमा उतरविला आहे तर ४० टक्के व्यापाऱ्यांनी विमा काढला नाही. ज्यांनी विमा काढला नाही अशा व्यापाऱ्यांना बिंल्डींगचे बांधकाम केलेल्या बिल्डरने २० टक्के नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले आहे. पण ज्या व्यापाऱ्यांनी प्रामाणिकपणे विमा काढला, त्या व्यापाऱ्यांचा छळ विमा कंपन्या करीत आहे. व्यापारी झालेल्या नुकसानाने हतबल झाल्या असून, शासनाने यात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. शासनाने विमा कंपन्यांवर अंकुश ठेवून व्यापाऱ्यांना होणारा त्रास कमी करावा, अशी मागणी व्यापाऱ्यांची आहे.

टॅग्स :fireआगmedicinesऔषधंbusinessव्यवसाय