शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
3
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
4
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
5
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
6
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
7
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
8
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
9
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
10
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
11
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
12
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
13
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
14
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
15
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
16
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
17
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
18
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
19
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
20
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यदिनी नागपूर आणि अमरावतीतही मांस विक्रीवर बंदी; महापालिकांच्या निर्णयावरून वाद निर्माण

By शुभांगी काळमेघ | Updated: August 12, 2025 20:08 IST

१५ आणि २० ऑगस्टला कत्तलखान्यांना टाळे : राज्यभरात मांस विक्रीवर बंदी

नागपूर : स्वातंत्र्यदिन आणि गोकुळाष्टमी या दोन सणांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अनेक महापालिकांनी मांस विक्रीवर बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत. कल्याण-डोंबिवली, छत्रपती संभाजीनगरसह विदर्भातील नागपूर आणि अमरावती या दोन महापालिकेनेही १५ आणि २० ऑगस्ट या दोन दिवशी कत्तलखाने आणि मांस विक्री दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयावरून राज्यात राजकीय आणि सामाजिक वर्तुळात वादाची ठिणगी पडली आहे.

महापालिकांच्या आदेशानुसार, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनासोबत गोकुळाष्टमीचा सणही साजरा होणार आहे. २० ऑगस्टपासून जैन धर्मीयांचे पवित्र 'पर्युषण पर्व' सुरू होत आहे. या दोन्ही दिवशी कोणतीही कत्तल करण्यास तसेच मांस विक्रीस मनाई करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या कडून यासंदर्भात अधिकृत परिपत्रकही जाहीर करण्यात आले आहे.

नागपूर महापालिका आणि अमरावती महापालिका यांनी देखील १५ ऑगस्ट रोजी मटन, चिकनची दुकाने आणि कत्तलखाने पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. नागपूर मनपाने यासाठी लवकरच नोटीस जारी करण्याचे सांगितले असून, शासनाच्या मागील निर्णयाचा आधार घेत हा आदेश लागू करण्यात येणार आहे.

विक्रेत्यांकडून विरोधाची शक्यतामहापालिकांच्या या निर्णयामुळे मांस विक्रेत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. काही विक्रेत्यांनी या बंदीला विरोध करण्याची तयारी दाखवली असून, त्यामध्ये व्यापारी संघटनाही सहभागी होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :nagpurनागपूरIndependence Dayस्वातंत्र्य दिनAmravatiअमरावती