शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

महापौराचे आदेश आयुक्तांना बंधनकारक असतात : संदीप जोशी यांचा मुंढेंना टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 23:46 IST

महापालिका आयुक्त व लोकप्रतिनिधी यांच्यात खटके उडत असताना आता महापौर संदीप जोशी यांनीही तुकाराम मुंढे यांना पत्र लिहून प्रशासनात लोकप्रतिनिधीही महत्त्वाचे असतात याची जाणीव करून दिली आहे. एवढेच नव्हे तर महापौराचे आदेश हे कायद्यानुसार आयुक्तांना बंधनकारक असतात, याचे स्मरणही त्यांनी मुंढे यांना करून दिले आहे.

ठळक मुद्देपत्र पाठवून करून दिले स्मरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका आयुक्त व लोकप्रतिनिधी यांच्यात खटके उडत असताना आता महापौर संदीप जोशी यांनीही तुकाराम मुंढे यांना पत्र लिहून प्रशासनात लोकप्रतिनिधीही महत्त्वाचे असतात याची जाणीव करून दिली आहे. एवढेच नव्हे तर महापौराचे आदेश हे कायद्यानुसार आयुक्तांना बंधनकारक असतात, याचे स्मरणही त्यांनी मुंढे यांना करून दिले आहे.महापालिकेतील सत्तापक्ष नेते संदीप जाधव व विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत आयुक्त मुंढे यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले होते. काँग्रेसचे शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनीही कन्टेन्मेंट झोन व क्वारंटाईन सेंटरवरून मुंढे यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. आता महापौर संदीप जोशी यांनीही उघडपणे मुंढे यांच्या विरोधात भूमिका मांडली आहे. जोशी यांनी अलीकडेच आयुक्तांना पाठिवलेल्या पत्रात म्हटले आहे की, प्रशासनाची जबाबदारी जशी आयुक्त म्हणून आपली आहे तशीच या नगरीचा महापौर म्हणून माझीसुद्धा आहे. नागपूरच्या नागरिकांनी ती विश्वासाने लोकप्रतिनिधी म्हणून माझ्यावर टाकली आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनयमाच्या कलम ४ मध्ये प्राधिकरणाच्या बाबतीत नमूद केलेल्या स्पष्टतेबाबत आपण अवगत आहात, अशी मला अपेक्षा आहे. लोकप्रतिनिधी व पदाधिकारी प्रशासनाचे दोन चाके आहेत. त्याप्रमाणे आपण कार्य करावे, त्याप्रमाणे आपण वागावे, अशी भावनाही त्यांनी पत्रात व्यक्त केली आहे.एमएलए होस्टेल क्वारंटाईन सेंटरमधील नागरिक सोशल डिस्टन्सिंगचे पालन मुळीच करीत नाहीत, याची पूर्ण माहिती घेऊनच आपण बोललो. याचदरम्यान लोणारा क्वारंटाईन सेंटरमध्ये असलेले लोक छतावर कसे एकत्र होते, याचा फोटो जवळपास सर्वच वर्तमानपत्रांनी छापला. हीच परिस्थिती आमदार निवासातीलही असू शकते. अशा प्रकारे क्वारंटाईन असलेल्या लोकांमुळे क्वारंटाईनची वाढती संख्या लक्षात घेता शहरात दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. शेवटी याला मनपा प्रशासनच जबाबदार असणार आहे. सध्याच्या परिस्थितीत कोरोनाच्या नियंत्रणासाठी महापौर आणि आयुक्त हे मिळून काम करीत असल्याचे चित्र नागरिकांपुढे जाणे आवश्यक होते. परंतु ते होताना दिसून येत नाही आणि नजीकच्या काळात थांबेल असेही दिसत नाही, असा सूचक इशाराही जोशी यांनी मुंढे यांना दिला आहे.

मुंढेंना नागपुरात तीन महिनेही झाले नाहीत‘राजकारण करण्याची वेळ नाही,’ या वक्तव्याबाबत महापौरांनी आक्षेप घेत खेद व्यक्त केला. ‘मी या शहरात जन्मलो, या शहरानेच मला मोठे केले आणि या शहरातच मी मरणार. तुम्हाला तर या शहरात येऊन ३ महिनेही पूर्ण झाले नाहीत. तेव्हा मी आपणाशी राजकारण का करावे, असा सवालही जोशी यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Sandip Joshiसंदीप जोशीtukaram mundheतुकाराम मुंढे