शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

'पुरुषाचा देह लाभलेली 'माऊली'; राम शेवाळकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2022 07:00 IST

Nagpur News २००१ मध्ये  निव्रुत्त झाल्यानंतर शेवटपावेतो  मी त्यांच्या राज्यभरातील व्याख्यानांच्या दौऱ्यात त्यांच्या सोबत होतो. ४४ वर्षे  त्यांचा निकटचा सहवास लाभला हे माझे पूर्व संचितच म्हटले पाहिजे.

 

जयंतीदिनी केलेले हृद्य स्मरण

नागपूरः 'वक्तादशसहस्त्रेषु  राम शेवाळकर यांच्या व्यक्तिमत्त्वाला असलेले आयाम पहायला गेलं तर आपण अचंबित होऊन जावं असं दर्शन घडतं. ते उत्तम लेखक, कवी, आचार्य, संपादक, निवेदक, मैफल रंगविणारे मित्र, विविध प्रकारच्या संमेलनांचे आदर्श संयोजक, निर्भय साहित्यिक, प्रकाशपूजक, सत्य, शिवं सुंदराचे उपासक, महाराष्ट्र आचार्यकुलाचे संयोजक, चांगले गायक व नकलाकार आणि प्रखर राष्ट्रभक्त अशी अनेक उत्तरे त्यांच्या सहवासात आलेल्यांकडून त्यांच्या त्यांच्या अनुभवानुसार येतील. या त्यांच्या सर्व गुणविशेषांचा मी ४४ वर्षे भाग्यवान साक्षीदार  राहिलो आहे.

राम शेवाळकर(आम्ही वणीकर त्यांना नानासाहेब म्हणत असू.) वणीत १९६५ मध्ये प्राचार्य म्हणून आले. आमची जुनी काहीही ओळख नव्हती. वणीतील एका शाळेत मी साधा शिक्षक होतो. वक्ता म्हणून मी त्यांचे नाव ऐकून होतो. त्यामुळे आल्या आल्या त्यांना मी माझ्या शाळेत एका कार्यक्रमासाठी वक्ता म्हणून आमंत्रित केले. पूर्वपरिचय नसतांनाही त्यांनी आमंत्रण कसलेही आढेवेढे न घेता स्वीकारले. ती आमची पहिली ओळख. वणीत प्राचार्य म्हणून रुजू झाल्यावर स्थानिक साहित्य संघाचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे चालून आले. त्या संदर्भात त्यांनी मला तुकाराम बीजेला तुकारामावर बोलण्याविषयी सुचविले.  'तुका झालासे कळस ' हा विषय देऊन मी ती सूचना मान्य केली. तेव्हा पासून त्यांनी अंगिकारलेल्या प्रत्येक उपक्रमात मला अग्रक्रमाने सहभागी करुन घेतले. हे सर्व सांगण्याचा उद्देश  म्हणजे १९६५ पासून तो त्यांनी शेवटचा श्वास घेईपर्यंतच्या दुर्दैवी क्षणाचा मी साक्षीदार आहे. २००१ मध्ये  निव्रुत्त झाल्यानंतर शेवटपावेतो  मी त्यांच्या राज्यभरातील व्याख्यानांच्या दौऱ्यात त्यांच्या सोबत होतो. ४४ वर्षे  त्यांचा निकटचा सहवास लाभला हे माझे पूर्व संचितच म्हटले पाहिजे.       

त्यांच्या विद्वत्तेची व वक्तृत्वाची जनमानसावर मोहिनी तर निश्चितच होती परंतु तद्वतच कोणालाही आपल्या पहिल्या भेटीतच आपलेसे करण्याएवढे त्यांचे व्यक्तिमत्त्व विलोभनीय होते. या त्यांच्या स्वभावामुळेच  प्रवासातील त्यांचे सहप्रवासी त्यांचे कुटुंबीय होऊन जात. यामुळेच भारतरत्न लतादीदी त्यांना आपले आप्त मानीत. माझे त्यांच्या सोबतच्या प्रवासातील अनुभव सांगतो, ते ज्या घरी मुक्कामाला असत त्यांना ते दिवस दसरा, दिवाळी सारखे वाटत आणि  त्यांना निरोप देतांना घरच्यांचे डोळे अश्रूंनी डबडबलेले असत. आपल्या घराला त्यांचा पदस्पर्श व्हावा म्हणून दुसऱ्या मजल्यावर राहणारे त्यांचे चाहते त्यांना खुर्चीवर बसवून आपल्या घरी नेत.   समाजाच्या विविधस्तरातील गुणीजनांच्या अलोट प्रेमाचे ते धनी होते. प्रत्यक्षात सत्पुरुष असूनही ते लहान मोठयांना आपले वाटत. स्वामी गोविंददेव गिरी तर म्हणत, मंत्रदीक्षा देण्याचे आपण अधिकारी आहात. संत साहित्यिक ही संकल्पना आहे की नाही, मला माहिती नाही परंतु ते संत साहित्यिक होते. महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील असंख्य घरात त्यांनी सद्भावनेची व सुसंस्कारांची ज्योत चेतवली. त्यांची विद्वत्ता विनयाने अधिक शोभून दिसत होती. विस्तारभयास्तव एका वाक्यात  मी एवढेच म्हणेन की नानासाहेब (शेवाळकर ) पुरुषाचा देह लाभलेली  ' माऊली ' होती . 

माधव सरपटवार, वणी, यवतमाळ.              

टॅग्स :literatureसाहित्य