शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

शहीदाच्या कुटुंबाला न्याय मिळाला ; आता निवृत्तीपर्यंत मिळणार वेतन व लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 13:24 IST

Nagpur : नियमित वेतन अदा करण्याचा हायकोर्टाचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संघटित गुन्हेगारी नियंत्रणाचे कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या पोलिस कॉन्स्टेबलच्या पत्नीने स्वतःच्या अधिकारासाठी केलेला संघर्ष सहा वर्षांनंतर फळाला आला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पीडित पत्नीसह इतर वारसदारांना २९ नोव्हेंबर २००८ रोजीच्या शासन निर्णयानुसार नियमित वेतन व इतर लाभ अदा करा, असा आदेश गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना दिला. त्याकरिता सचिवांना येत्या १० ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली.

विशाखा मेश्राम असे पीडित पत्नीचे नाव आहे. त्यांना राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे दीर्घकाळ मनस्ताप सहन करावा लागला. पती पोलिस कॉन्स्टेबल प्रकाश मेश्राम यांचा संघटित गुन्हेगारी नियंत्रित करताना मृत्यू झाल्यामुळे त्यांना २९ नोव्हेंबर २००८ रोजीच्या शासन निर्णयानुसार लाभ देण्याची शिफारस प्रशासन विभागाच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांनी १२ मार्च २०१९ रोजी गृह विभागाला केली होती. तसेच, याकरिता विशाखा यांनीही वेळोवेळी निवेदने सादर केली होती. परंतु, गृह विभागाने मेश्राम यांच्या मृत्यूनंतर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला नाही म्हणून ही शिफारस नामंजूर केली. त्यामुळे विशाखा यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय नितीन सांबरे व महेंद्र नेरलीकर यांनी विविध बाबी लक्षात घेता गृह विभागाचा वादग्रस्त निर्णय अवैध ठरवला. सक्षम अधिकाऱ्याने केलेली शिफारस डावलून गृह विभाग स्वतःचे स्वतंत्र मत ठरवू शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. 

असा आहे शासन निर्णयनक्षलवादी, दहशतवादी, दरोडेखोर व संघटित गुन्हेगारी नियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापनाचे कर्तव्य बजावताना पोलिस अधिकारी /कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याचे घटना काळातील मासिक वेतन त्याच्या कुटुंबाला सुरू केले जाईल. हे वेतन संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्याच्या निवृत्तीपर्यंतच्या तारखेपर्यंत दिले जाईल. वेतनात नियमानुसार व पदोन्नतीच्या अधिकारानुसार वेळोवेळी वृद्धी केली जाईल. यासह इतर काही लाभ देण्यात येतील, असे २९ नोव्हेंबर २००८ रोजीचा शासन निर्णय म्हणतो.

अशी घडली हृदयद्रावक घटनाप्रकाश मेश्राम चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती पोलिस ठाण्यात कार्यरत होते. ते २० जानेवारी २०१९ रोजी खांबाडा क्षेत्रात कर्तव्यावर गेले होते व आवश्यक चौकशीसाठी धावती वाहने थांबवित होते. दरम्यान, जनावरांची तस्करी करणाऱ्या एका वाहनाने पोलिसांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून मेश्राम यांना चिरडले. त्यामुळे त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. न्यायालयात विशाखा यांच्यातर्फे अॅड. शिल्पा गिरटकर यांनी बाजू मांडली.

टॅग्स :nagpurनागपूर