शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
5
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
6
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
7
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
8
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
9
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
10
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
11
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
12
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
13
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
14
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
15
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
16
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
17
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
18
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
19
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
20
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा

शहीद पोलिसांचा २४ तासांत चुकविला हिशेब

By नरेश डोंगरे | Updated: February 22, 2023 00:24 IST

दरेकसा दलमने घेतला 'त्या' पोलिसांचा बळी : राणू आणि देवचंद मास्टरमाईंड

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर: नक्षलवाद्यांच्या अस्तित्त्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळे आपण सक्रिय असल्याचे दाखविण्यासाठी नक्षल्यांनी महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेजवळच्या बोरतलावमध्ये दोन पोलिसांना ठार मारले. तर, अवघ्या २४ तासांत या घटनेचा जसाच्या-तसा बदला चुकवून सुरक्षा दलाने दोन नक्षल्यांना ठार मारत शहीद पोलिसांना आपली श्रद्धांजली वाहिली आहे.

नक्षल्यांच्या विरोधात सुरक्षा दलाने महाराष्ट्र व छत्तीसगडमध्ये गेल्या वर्षभरात जोरदार कामगिरी बजावली आहे. नक्षल्यांचा नेता मिलिंद तेलतुंबडे याच्यासह अनेकांचे एनकाउंटर आणि अनेक जहाल नक्षल्यांची धरपकड केल्यामुळे नक्षल्यांचे मनोबल खचले आहे. अनेक नक्षलवादी पकडले जात असून, अनेक जण आत्मसमर्पणही करीत आहेत. या प्रकारामुळे नक्षलवादी पुरते बॅकफुटवर गेले असून, नक्षल चळवळीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे आपले अस्तित्व दाखविण्यासाठी महाराष्ट्र - छत्तीसगडच्या सीमेवर असलेल्या राजनांदगाव जिल्ह्यातील बोरतलाव क्षेत्रात हवालदार राजेशकुमार सिंह आणि कॉन्स्टेबल ललितकुमार यांच्यावर अंधाधूंद गोळीबार करून त्यांचा घात केला.

या घटनेनंतर महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या नक्षलविरोधी सुरक्षा दलाने जोरदार अभियान राबवून हा हल्ला करणाऱ्या नक्षल्यांना त्याच भागात घेरले. यावेळी झालेल्या जोरदार चकमकीत दोन नक्षलवादी ठार मारले गेले. त्यांचे काही साथीदार जखमी झाले, ते पळून गेले तर पोलिसांनी त्यांच्याकडून मोठा दारूगोळाही जप्त केल्याची माहिती आहे. या संबंधाने विस्तृत माहितीसाठी राजनांदगावचे पोलिस अधीक्षक अभिषेक मीना यांच्याशी लोकमतने वारंवार संपर्क केला. मात्र, माहिती मिळू शकली नाही.

दरम्यान, राजेशकुमार आणि ललितकुमार यांच्यावर हल्ला करणाऱ्या नक्षल दलमचा छडा लागल्याचे शीर्षस्थ अधिकारी सांगत आहेत. त्यानुसार, हा हल्ला दरेकसादलमने केल्याचे समजते. नक्षल चळवळीचे अस्तित्व दाखविण्यासाठी पोलिसांवर हल्ला करण्यात आला असून, कमांडर राणू आणि देवचंद हे दोघे या हल्ल्याचे मास्टर माईंड असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना हुडकून काढण्यासाठी तीनही राज्यात जोरदार शोधमोहीम सुरू असल्याची माहिती नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी 'लोकमत'ला दिली.

...'ते' साधे पोलिस होते, निशस्त्र होते !

नक्षलविरोधी अभियानातील पोलिसांवर हल्ला चढविण्याची एकही संधी नक्षलवादी चुकवीत नाहीत. त्यांच्यासोबत नेहमीच सुरक्षादलाच्या चकमकी सुरू असतात. मात्र, नक्षलविरोधी अभियानाचा संबंध नसताना आणि त्या पोलिसांकडे कोणतेही शस्त्र नसताना नक्षल्यांनी निशस्त्र पोलिसांवर हल्ला करून त्यांना ठार मारले. या घटनेमुळे पुन्हा नक्षलविरोधी सूर उमटला आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :nagpurनागपूरPoliceपोलिस