शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

शहीद पोलिसांचा २४ तासांत चुकविला हिशेब

By नरेश डोंगरे | Updated: February 22, 2023 00:24 IST

दरेकसा दलमने घेतला 'त्या' पोलिसांचा बळी : राणू आणि देवचंद मास्टरमाईंड

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर: नक्षलवाद्यांच्या अस्तित्त्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळे आपण सक्रिय असल्याचे दाखविण्यासाठी नक्षल्यांनी महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेजवळच्या बोरतलावमध्ये दोन पोलिसांना ठार मारले. तर, अवघ्या २४ तासांत या घटनेचा जसाच्या-तसा बदला चुकवून सुरक्षा दलाने दोन नक्षल्यांना ठार मारत शहीद पोलिसांना आपली श्रद्धांजली वाहिली आहे.

नक्षल्यांच्या विरोधात सुरक्षा दलाने महाराष्ट्र व छत्तीसगडमध्ये गेल्या वर्षभरात जोरदार कामगिरी बजावली आहे. नक्षल्यांचा नेता मिलिंद तेलतुंबडे याच्यासह अनेकांचे एनकाउंटर आणि अनेक जहाल नक्षल्यांची धरपकड केल्यामुळे नक्षल्यांचे मनोबल खचले आहे. अनेक नक्षलवादी पकडले जात असून, अनेक जण आत्मसमर्पणही करीत आहेत. या प्रकारामुळे नक्षलवादी पुरते बॅकफुटवर गेले असून, नक्षल चळवळीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे आपले अस्तित्व दाखविण्यासाठी महाराष्ट्र - छत्तीसगडच्या सीमेवर असलेल्या राजनांदगाव जिल्ह्यातील बोरतलाव क्षेत्रात हवालदार राजेशकुमार सिंह आणि कॉन्स्टेबल ललितकुमार यांच्यावर अंधाधूंद गोळीबार करून त्यांचा घात केला.

या घटनेनंतर महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या नक्षलविरोधी सुरक्षा दलाने जोरदार अभियान राबवून हा हल्ला करणाऱ्या नक्षल्यांना त्याच भागात घेरले. यावेळी झालेल्या जोरदार चकमकीत दोन नक्षलवादी ठार मारले गेले. त्यांचे काही साथीदार जखमी झाले, ते पळून गेले तर पोलिसांनी त्यांच्याकडून मोठा दारूगोळाही जप्त केल्याची माहिती आहे. या संबंधाने विस्तृत माहितीसाठी राजनांदगावचे पोलिस अधीक्षक अभिषेक मीना यांच्याशी लोकमतने वारंवार संपर्क केला. मात्र, माहिती मिळू शकली नाही.

दरम्यान, राजेशकुमार आणि ललितकुमार यांच्यावर हल्ला करणाऱ्या नक्षल दलमचा छडा लागल्याचे शीर्षस्थ अधिकारी सांगत आहेत. त्यानुसार, हा हल्ला दरेकसादलमने केल्याचे समजते. नक्षल चळवळीचे अस्तित्व दाखविण्यासाठी पोलिसांवर हल्ला करण्यात आला असून, कमांडर राणू आणि देवचंद हे दोघे या हल्ल्याचे मास्टर माईंड असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना हुडकून काढण्यासाठी तीनही राज्यात जोरदार शोधमोहीम सुरू असल्याची माहिती नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी 'लोकमत'ला दिली.

...'ते' साधे पोलिस होते, निशस्त्र होते !

नक्षलविरोधी अभियानातील पोलिसांवर हल्ला चढविण्याची एकही संधी नक्षलवादी चुकवीत नाहीत. त्यांच्यासोबत नेहमीच सुरक्षादलाच्या चकमकी सुरू असतात. मात्र, नक्षलविरोधी अभियानाचा संबंध नसताना आणि त्या पोलिसांकडे कोणतेही शस्त्र नसताना नक्षल्यांनी निशस्त्र पोलिसांवर हल्ला करून त्यांना ठार मारले. या घटनेमुळे पुन्हा नक्षलविरोधी सूर उमटला आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :nagpurनागपूरPoliceपोलिस