शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

शेतकऱ्यांच्या मुलांना 'केजी टू पीजी' मोफत शिक्षण द्या, बाजार समितीचे सभापती आमधरे यांची मागणी

By कमलेश वानखेडे | Updated: August 30, 2022 18:16 IST

गेल्या दोन महिन्यापासून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिकांचे मोठे नुकसान झाले.

कामठी (नागपूर) ः ओल्या दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला असून मुलांच्या शिक्षणासाठी पैसा नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सरकारने केजी टू पीजी शिक्षण मोफत देण्याचे धोरण जाहीर करावे, अशी मागणी मुंबई बाजार समितीचे सभापती हुकुमचंद आमधरे यांनी सरकारला दिलेल्या निवेदनात केली आहे.

गेल्या दोन महिन्यापासून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिकांचे मोठे नुकसान झाले. दुबार पेरणी केल्यानंतरही शेतकऱ्यांचे पीक पावसामुळे हातून गेले. यातून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. जुलै महिन्यापासून शाळांना सुरुवात होते. मात्र, मुलांच्या शिक्षणासाठी शेतकऱ्यांकडे पैसा नसल्याचे दिसून येत आहे.

शिक्षणाचे खासगीकरण झाल्यामुळे खासगी शाळेत मुलांना मोठे शुल्क द्यावे लागते. सध्या शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यातून बाहेर निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याची योजना सरकारने सुरू करावी. केजी टू पीजीमध्ये शिक्षण घेणाऱ्या त्याप्रमाणे व्यावसायिक शिक्षणही मोफत देण्यात यावे, अशी मागणी हुकुमचंद आमधरे यांनी केली आहे. सरकारने वेळीच शेतकऱ्यांच्या मुलाच्या शिक्षणाकडे लक्ष दिले नाही तर येणाऱ्या काळात शिक्षण न घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल, असा इशाराही हुकुमचंद आमधरे यांनी सरकारला दिलेल्या निवेदनात केला आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणEducationशिक्षणFarmerशेतकरी