शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
3
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
4
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
5
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
6
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
7
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
8
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
9
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
10
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
11
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
12
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
13
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
14
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
15
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
16
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
17
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
18
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
19
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
20
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी

उपराजधानीत अनेक अवैध पिस्तुलधारी

By admin | Updated: June 12, 2016 02:31 IST

बनावट परवान्याच्या आधारे उपराजधानीत अनेक जण राजरोसपणे पिस्तूल घेऊन फिरत असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे.

बनावट परवान्याचा वापर : पोलीस यंत्रणा खडबडून जागी झालीनरेश डोंगरे नागपूरबनावट परवान्याच्या आधारे उपराजधानीत अनेक जण राजरोसपणे पिस्तूल घेऊन फिरत असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. महिनाभरात दोन प्रकरणे उघड झाल्याने पोलीस यंत्रणाही खडबडून जागी झाली आहे. या पार्श्वभूमीवर, शहरात अधिकृत किती आणि अनधिकृत (बनावट परवानाधारक) किती पिस्तुलधारी आहेत, त्याची माहिती गोळा केली जात आहे. स्वत:च्या जानमालाचे रक्षण करण्याचा घटनादत्त अधिकार प्रत्येकाला आहे. आपल्या जीविताला धोका असल्याची जाणीव झालेला व्यक्ती प्रसंगी स्वरक्षणासाठी पिस्तूल किंवा माऊझर (अग्निशस्त्र) जवळ बाळगू शकतो. कायद्यानुसार त्याला पोलीस अग्निशस्त्र बाळगण्याचा परवानाही देतात. मात्र, त्यासाठी पोलिसांच्या काही अटी-शर्ती आहेत. परवाना मिळविण्यापूर्वी संबंधित व्यक्तीला आपल्या किंवा परिवारातील व्यक्तीच्या जीवाला कसा धोका आहे, ते पोलिसांना सोदाहरण पटवून द्यावे लागते. याशिवाय पोलिसांनी घालून दिलेल्या अटी-शर्तींचे पालन करतानाच चारित्र्य प्रमाणपत्रासह अनेक प्रमाणपत्रेही पोलीस आयुक्तालयात सादर करावी लागतात. अग्निशस्त्राच्या परवान्याची मागणी करणाऱ्या व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा नसावा आणि तो गुन्हेगारीवृत्तीचा नसावा, ही एक मुख्य अट असते. शिवाय तो अग्निशस्त्राचे सार्वजनिक प्रदर्शन अथवा कुणाला भीती दाखविण्यासाठी वापर करणार नाही, अशीही दुसरी एक मुख्य अट असते. गुन्हे दाखल असलेल्याला किंवा गुन्हेगाराला अग्निशस्त्राचा परवाना मिळत नाही. स्वच्छ चारित्र्याच्या व्यक्तीला, व्यापारी, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ता यांना पोलिसांकडून अग्निशस्त्राचा परवाना मिळतो. हा परवाना मिळाल्यानंतर पोलिसांनी घालून दिलेल्या अटी-शर्तीनुसार संबंधित परवानाधारक अधिकृतपणे अग्निशस्त्र आणि काडतूस विकत घेऊन जवळ बाळगू शकतो.तीन हजाराहून अधिक परवाने नागपूर : स्वत:चा जीव वाचविण्यासाठी त्याचा वापरही करू शकतो. निवडणूका आणि आणीबाणीच्या वेळी अग्निशस्त्र आणि काडतूस पोलिसांकडे जमा करावे लागतात. ठराविक मुदतीनंतर पोलीस संबंधित व्यक्तीला त्याचे अग्निशस्त्र परत करतात. अशाप्रकारे शहरात तीन हजारांपेक्षा जास्त व्यक्तींकडे अग्निशस्त्रांचे परवाने आहेत. अर्थात शहरातील अनेक जण पिस्तूल, रिव्हॉल्व्हरधारक आहेत. त्यातील अनेकांनी अटीशर्तींचे पालन करून परवाना मिळवला असला तरी काही जणांनी मात्र पाच वर्षांपूर्वीपर्यंत लागेबांधे वापरून अग्निशस्त्राचा परवाना मिळवला आहे. शहरात गाजलेल्या लखोटिया बंधू हत्याकांड आणि त्यानंतर व्यापाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनांमुळे पोलिसांनी अग्निशस्त्र परवाना देण्याचा सपाटा लावल्याचे पाहून लागेबांधेवाल्यांनी पोलिसांकडे अग्निशस्त्र परवाना मिळवण्यासाठी एकच गर्दी केली होती. त्यामुळे चुकून नको त्या व्यक्तींकडे परवाने गेल्याचे लक्षात आल्याने तत्कालीन सहपोलीस आयुक्त (सध्याचे मुंबई गुन्हेशाखेचे सहपोलीस आयुक्त) संजय सक्सेना यांनी परवाना वाटपाला ब्रेक लावला. त्यानंतर परवाना मागणाऱ्यांची संख्या आपोआपच रोडावली. त्यामुळे सद्यस्थितीत शहरात अधिकृत परवानाप्राप्त अग्निशस्त्रधारकच आहे, असा आतापर्यंत खुद्द पोलिसांचाही समज होता. महिनाभरापूर्वी डब्बा प्रकरणातील आरोपी नीरज अग्रवालकडे पोलिसांनी छापा घातला. त्यावेळी कागदपत्रांसह पोलिसांना अग्निशस्त्राचा परवानाही सापडला. तो नागालॅण्डचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर २६ मे रोजी कामठी नगर परिषदेचे उपाध्यक्ष रंजित सफेलकर यांच्या कारमध्ये पिस्तुल सापडले. त्यांचा परवाना गोरखपूर (उत्तरप्रदेश)चा होता. ज्या ठिकाणी व्यक्तीचे वास्तव्य आहे, त्या जिल्ह्याचे प्रशासनच अग्निशस्त्राचा परवाना देते. त्यामुळे या दोन अग्निशस्त्र परवान्यांनी अनेक शंकाकुशंका निर्माण केल्या असून, पोलिसांची झोप उडवली आहे. (प्रतिनिधी)