शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेतील गर्दीची संधी साधून हवालाच्या कोट्यवधींच्या रकमेची हेरफेर

By नरेश डोंगरे | Updated: November 3, 2024 23:13 IST

मुखबिरांचे नेटवर्क कमकुवत : ठिकठिकाणी पोहचत आहे मोठी खेप

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : रेल्वेतील प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत हवालावाल्यांकडून कोट्यवधींच्या रकमेची हेरफेर केल्या जात असल्याची विश्वसनीय सूत्रांची आहे. विशेष म्हणजे, रेल्वेस्थानक तसेच परिसरात कर्तव्य बजावणारे या संबंधाने अनभिज्ञ असल्याने आणि पोलिसांचे मुखबिरांचे नेटवर्क कमकुवत झाल्याने हवालावाले बिनबोभाट आपला खेळ करीत आहेत.

मध्य भारतातील सर्वात मोठे हवालाचे केंद्र नागपुरात आहे. येथील नेटवर्कच्या माध्यमातून रोज देशाच्या कानाकोपऱ्यात हवालाची रोकड आणली आणि पोहचवली जाते. तपास यंत्रणातील अनेक जुन्या खेळाडूंना त्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन-तीन वर्षांपूर्वीपर्यंत नागपुरातील हवाला व्यवसायाचा वेळोवेळी भंडाफोड होत होता. हवालावाल्यांनी पद्धतशिर काही जणांना 'सेट' करून आपले अडथळे बाजुला सारले आहे. ज्यांना या व्यवसायाची माहिती आहे, ते अर्थपूर्ण चुप्पी साधून आहेत. त्यामुळे नागपुरात रोज कोट्यवधींची रोकड येते आणि येथून ती नियोजित ठिकाणी पोहचवली जाते. हवालाची रक्कम आणण्या-पाठवण्यासाठी संबंधितांकडून वेगवेगळ्या वाहनांचा वापर केला जातो. त्यासाठी चारचाकीच नव्हे तर दुचाकी वाहनांनाही विशेष कप्पे तयार करून घेतले जातात. चुकून एखादवेळी पोलिसांच्या तपासणीत हे वाहन आले तरी वरवर तपासणी केली जात असल्याने त्यात काही आढळत नाही. अशा प्रकारे ती रोकड घेऊन वाहनचालक नियोजित ठिकाणी पोहचतो आणि ठरलेल्या व्यक्तीला ती खेप देतो.

२२ ऑक्टोबरपासून महाराष्ट्र, झारखंडमध्ये विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहिर झाल्यापासून विविध मार्गावर ठिकठिकाणी नाकेबंदी केली जात आहे. ईलेक्शन कमिनशनकडून तयार करण्यात आलेली पथके, पोलीस पथके संशय आलेल्या वाहनांची कसून तपासणी करतात. ठिकठिकाणी कोट्यवधी रुपये पकडलेही गेले आहेत. त्यामुळे हवालावाल्यांना धोका निर्माण झाला आहे. ते लक्षात घेऊन त्यांनी हवालाची खेप रेल्वे गाड्यांमधून पाठविणे सुरू केल्याची सूत्रांची माहिती आहे.

स्फोटकांवर नजर, रोकड दुर्लक्षित !निवडणूकीदरम्यान ब्लॅक मनी मोठ्या प्रमाणात बाहेर येतो. सध्या महाराष्ट्रात विधानसभेची धामधुम सुरू आहे. अशात रेल्वेस्थानकं आणि गाड्यांमध्येही प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे. त्यामुळे हवालाची खेप पोहचविणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. रेल्वेच्या तपास यंत्रणा स्फोटके किंवा संशयास्पद व्यक्तींवर नजर केंद्रीत करून आहेत. त्यामुळे रोकड घेऊन निघालेले दुर्लक्षित झालेले आहेत. त्यामुळे वर्षानुवर्षांपासून खेप ईकडून तिकडे करणारे हवालावाले 'कुरियर' बिनबोभाटपणे कोट्यवधींची रोकड नियोजित ठिकाणी पोहचवत असल्याचे सांगितले जाते.

पार्सल स्कॅनरला होता जोरदार विरोध

रेल्वेतून जाणाऱ्या वेगवेगळ्या पार्सलमध्ये दडवून चार-सहा महिन्यांपर्यंत हवालाची मोठी रोकड ठिकठिकाणी पाठवली जात होती. 'लोकमत;ने त्याचा खुलासा केल्यानंतर विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी पार्सल विभागात स्कॅनर लावून प्रत्येकच पार्सल स्कॅन करणे बंधनकारक केले होते. त्याला अनेकांनी जोरदार विरोध केला होता. याच कालावधीत नागपूरहून जाणाऱ्या एका गाडीत ६० लाखांची रोकड पार्सल मधून पाठविण्यात आली होती आणि ती मुंबईत आरपीएफने पकडल्यानंतर एकच खळबळ निर्माण झाली होती. लोकमतचे वृत्तही त्यावेळी चर्चेला आले होते.