शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

रेल्वेतील गर्दीची संधी साधून हवालाच्या कोट्यवधींच्या रकमेची हेरफेर

By नरेश डोंगरे | Updated: November 3, 2024 23:13 IST

मुखबिरांचे नेटवर्क कमकुवत : ठिकठिकाणी पोहचत आहे मोठी खेप

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : रेल्वेतील प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत हवालावाल्यांकडून कोट्यवधींच्या रकमेची हेरफेर केल्या जात असल्याची विश्वसनीय सूत्रांची आहे. विशेष म्हणजे, रेल्वेस्थानक तसेच परिसरात कर्तव्य बजावणारे या संबंधाने अनभिज्ञ असल्याने आणि पोलिसांचे मुखबिरांचे नेटवर्क कमकुवत झाल्याने हवालावाले बिनबोभाट आपला खेळ करीत आहेत.

मध्य भारतातील सर्वात मोठे हवालाचे केंद्र नागपुरात आहे. येथील नेटवर्कच्या माध्यमातून रोज देशाच्या कानाकोपऱ्यात हवालाची रोकड आणली आणि पोहचवली जाते. तपास यंत्रणातील अनेक जुन्या खेळाडूंना त्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन-तीन वर्षांपूर्वीपर्यंत नागपुरातील हवाला व्यवसायाचा वेळोवेळी भंडाफोड होत होता. हवालावाल्यांनी पद्धतशिर काही जणांना 'सेट' करून आपले अडथळे बाजुला सारले आहे. ज्यांना या व्यवसायाची माहिती आहे, ते अर्थपूर्ण चुप्पी साधून आहेत. त्यामुळे नागपुरात रोज कोट्यवधींची रोकड येते आणि येथून ती नियोजित ठिकाणी पोहचवली जाते. हवालाची रक्कम आणण्या-पाठवण्यासाठी संबंधितांकडून वेगवेगळ्या वाहनांचा वापर केला जातो. त्यासाठी चारचाकीच नव्हे तर दुचाकी वाहनांनाही विशेष कप्पे तयार करून घेतले जातात. चुकून एखादवेळी पोलिसांच्या तपासणीत हे वाहन आले तरी वरवर तपासणी केली जात असल्याने त्यात काही आढळत नाही. अशा प्रकारे ती रोकड घेऊन वाहनचालक नियोजित ठिकाणी पोहचतो आणि ठरलेल्या व्यक्तीला ती खेप देतो.

२२ ऑक्टोबरपासून महाराष्ट्र, झारखंडमध्ये विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहिर झाल्यापासून विविध मार्गावर ठिकठिकाणी नाकेबंदी केली जात आहे. ईलेक्शन कमिनशनकडून तयार करण्यात आलेली पथके, पोलीस पथके संशय आलेल्या वाहनांची कसून तपासणी करतात. ठिकठिकाणी कोट्यवधी रुपये पकडलेही गेले आहेत. त्यामुळे हवालावाल्यांना धोका निर्माण झाला आहे. ते लक्षात घेऊन त्यांनी हवालाची खेप रेल्वे गाड्यांमधून पाठविणे सुरू केल्याची सूत्रांची माहिती आहे.

स्फोटकांवर नजर, रोकड दुर्लक्षित !निवडणूकीदरम्यान ब्लॅक मनी मोठ्या प्रमाणात बाहेर येतो. सध्या महाराष्ट्रात विधानसभेची धामधुम सुरू आहे. अशात रेल्वेस्थानकं आणि गाड्यांमध्येही प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे. त्यामुळे हवालाची खेप पोहचविणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. रेल्वेच्या तपास यंत्रणा स्फोटके किंवा संशयास्पद व्यक्तींवर नजर केंद्रीत करून आहेत. त्यामुळे रोकड घेऊन निघालेले दुर्लक्षित झालेले आहेत. त्यामुळे वर्षानुवर्षांपासून खेप ईकडून तिकडे करणारे हवालावाले 'कुरियर' बिनबोभाटपणे कोट्यवधींची रोकड नियोजित ठिकाणी पोहचवत असल्याचे सांगितले जाते.

पार्सल स्कॅनरला होता जोरदार विरोध

रेल्वेतून जाणाऱ्या वेगवेगळ्या पार्सलमध्ये दडवून चार-सहा महिन्यांपर्यंत हवालाची मोठी रोकड ठिकठिकाणी पाठवली जात होती. 'लोकमत;ने त्याचा खुलासा केल्यानंतर विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी पार्सल विभागात स्कॅनर लावून प्रत्येकच पार्सल स्कॅन करणे बंधनकारक केले होते. त्याला अनेकांनी जोरदार विरोध केला होता. याच कालावधीत नागपूरहून जाणाऱ्या एका गाडीत ६० लाखांची रोकड पार्सल मधून पाठविण्यात आली होती आणि ती मुंबईत आरपीएफने पकडल्यानंतर एकच खळबळ निर्माण झाली होती. लोकमतचे वृत्तही त्यावेळी चर्चेला आले होते.