शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

आजोबांची कमाल! वयाच्या शंभराव्या वर्षी पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2022 16:48 IST

आजोबांना १७ व्या वर्षापासूनच कविता लिहिण्याचा छंद होता. मात्र, त्यांनी त्याचा कवितासंग्रह प्रकाशित केला नव्हता. तर आता वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले असून नववर्षदिनी काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा पार पडला.

ठळक मुद्देकृष्णराव माधवराव दळवी : वयाच्या १७ व्या वर्षापासून लिहिलेल्या कवितांचा समावेश

नागपूर : या जगात प्रत्येकाला काही ना काही छंद असतोच. कुणाला चित्र काढण्याचा, क्रिकेट खेळायचा, गाण्याचा, नाचण्याचा पण तो छंद आयुष्यभर जपणारे काहीच. एका आजोबांनी आपला कविता लिहिण्याचा छंद जोपासला आणि  वयाच्या शंभरीत आपले पहिले कवितासंग्रह प्रकाशित केले. या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा नववर्षदिनी पार पडला.

कृष्णराव माधवराव दळवी यांचा जन्म १ जानेवारी १९२३ चा भंडारा जिल्ह्यातील पवनी येथचा. १ जानेवारी २०२२ रोजी त्यांनी वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केले. ते भारत सरकारच्या सिव्हिल डिफेन्स (नेव्ही) विभागातून क्लास वन अधिकारी म्हणून निवृत्त झाले. आपल्या आयुष्यातील आलेले अनुभव व मनात संचारणाऱ्या कल्पनांना त्यांनी कवितांचे आवरण चढवले.

कृष्णराव यांना कविता लिहिण्याचा छंद वयाच्या १७व्या वर्षापासूनच होता. मात्र, त्या प्रकाशित करण्याचा मानस त्यांनी कधीच व्यक्त केलेला नव्हता. त्यामुळे त्यांचा हा शतक पदार्पण सोहळा संस्मरणीय करण्याची कल्पना स्नुषा डॉ. अपर्णा दळवी, मुलगा दीपक दळवी यांच्या मनात आली. त्याअनुषंगाने कृष्णराव यांच्या निवडक ७५ कवितांचा संग्रह ‘मर्मध्वनी’ साकारण्याची कल्पना आली आणि मिलिंद हरदास यांनी प्रकाशनाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली.

त्याअनुषंगाने १ जानेवारी २०२२ रोजी वयाच्या शतक पदार्पण सोहळ्यात या काव्यसंग्रहाचे प्रकाशन वैशाली मुलमुले यांच्या हस्ते करण्यात आले. वयाच्या शंभराव्या वर्षी आयुष्यभर रचलेल्या कवितांचा काव्यसंग्रह प्रकाशित होणे, हा एक दुर्मिळ योग ठरला. हा सोहळा शंकरपूर येथील बालाजी मंदिरात पार पडला. यावेळी अंजली पाठक, डॉ. उदय नारलावार यांच्यासह कौटुंबिक मंडळी उपस्थित होती.

टॅग्स :SocialसामाजिकSenior Citizenज्येष्ठ नागरिक