शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

लोककला, साहित्य, प्रकारांचे दस्तऐवज करा : अरुणा ढेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 21:22 IST

लोकगीत, कला, साहित्य प्रकार सांगणारी फार थोडी माणसे शिल्लक राहिली आहेत. त्यांचे दस्तऐवजीकरण करण्याचे आवाहन यवतमाळ येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी केले.

ठळक मुद्देसाहित्यिकांनी आपली प्रतिष्ठा वाढवावीद्विदिवसीय मराठी संशोधन साहित्य संमेलनास सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वैदिकांसोबतच अवैदिक साहित्य, कलांची परंपरा प्राकृत भाषेच्या आश्रयाने सुरूच राहिली आहे. मात्र, त्या मौखिक असल्याने त्यांचा वसा जसाच्या तसा पुढे जाऊ शकला नाही. लोकगीत, कला, साहित्य प्रकार सांगणारी फार थोडी माणसे शिल्लक राहिली आहेत. त्यांचे दस्तऐवजीकरण करण्याचे आवाहन यवतमाळ येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी केले.महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ पुरस्कृत विदर्भ संशोधन मंडळाच्या वतीने आयोजित ‘लोकसाहित्य आणि ललित साहित्य’ या विषयावरील द्विदिवसीय राष्ट्रीय मराठी संशोधन साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी संमेलनाध्यक्ष म्हणून ढेरे बोलत होत्या. व्यासपीठावर संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून प्रख्यात ज्येष्ठ समीक्षक डॉ. मदन कुळकर्णी यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. म.रा. जोशी, सावित्रीबाई फुले विपद्यापीठ पुणे येथील म. फुले अध्यासन केंद्राचे प्रमुख डॉ. विश्वनाथ शिंदे, डॉ. गो.ब. देगलूरकर, डॉ. राजेंद्र वाटाणे उपस्थित होते. यावेळी स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.आपण लिहितो, तेव्हा मागचं सगळं ज्ञान तिथपर्यंत येऊन थांबलेलं असतं. संस्कृती ही माणसांनीच घडविली असते. त्यामुळे सोन्यासोबतच माती आणि चांगल्यासोबतच वाईटही आलेले असते. संशोधनाद्वारे त्यांचा अन्वय लावावा लागतो. समकालिनी विचारधन घेऊन पुढे जावं लागतं आणि नव्या संस्कृतीत सहभागी व्हावं लागतं. त्याच संचितातील सामर्थ्याचं दृष्टिकोन ठेवण्याची जबाबदारी संशोधक आणि साहित्यिकांची आहे. मात्र, साहित्यिकांकडील शब्द सामर्थ्य रसातळाला गेल्याने, त्यांचा दर्जा प्रभावहीन झाल्याची भावना डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केली. संचालन डॉ. अजय कुळकर्णी यांनी केले, तर आभार डॉ. व्यंकटेश पोटफोडे यांनी मानले.देगलूरकर यांना ‘संशोधन महर्षी पदवी’विदर्भ संशोधन मंडळातर्फे या संमेलनात प्रख्यात इतिहास संशोधक डॉ. गो. ब. देगलूरकर यांना ‘संशोधन महर्षी पदवी’ प्रदान करण्यात आली. यासोबतच डॉ. म.रा. जोशी यांचा विशेष सत्कार याप्रसंगी करण्यात आला. पुरस्काराला उत्तर देताना देगलूरकर यांनी पुराव्याशिवायचा दावा इतिहासाला मान्य नसल्याचे स्पष्ट केले. विदर्भात अनेक वर्षे राहिलो आणि उत्खननातून अनेक गोष्टी बाहेर काढल्या. त्या गोष्टी भविष्यापर्यंत पोहोचण्यासाठी कार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.तोंडदेखलेपणाचा गौरव कशासाठी - विश्वनाथ शिंदेख्रिस्ती धर्मप्रसारकांचे काम वाढत असल्याचे पाहून सनातन यांनी तत्कालीन शुद्रांच्या लोकगीत, साहित्य आणि परंपरांचा गौरव करण्याचा विडा उचलला, मात्र त्यांना सन्मान आजही दिलेला नाही. केवळ तोंडदेखलेपणासाठीचा हा गौरव कशासाठी, असा सवाल डॉ. विश्वनाथ शिंदे यांनी यावेळी उपस्थित केला.लोकसाहित्यावरच नवसाहित्य समृद्ध होत आहे - मदन कुळकर्णीजुन्या लोकसाहित्य, गीत, परंपरांचे अनुकरण करीतच नवसाहित्य समृद्ध होण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे मानसिक पटलावरील मूलबंध कायम असतात, हे सिद्ध होत असल्याचे डॉ. मदन कुळकर्णी यांनी स्पष्ट केले. मूलभूत साधनांचे एकत्रीकरण व त्यांचा उपयोग करून ललित साहित्याची निर्मिती या सूत्रातून लोकसाहित्याचे जतन करणे सोपे जाणार असल्याचेही कुळकर्णी म्हणाले.

टॅग्स :Aruna Dhereअरुणा ढेरेmarathiमराठीResearchसंशोधनliteratureसाहित्यnagpurनागपूर