शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Maharashtra Winter Session : आम्हाला त्याचं काय देणंघेणं?; टोमणे अन् चिमट्यांवरून अजित पवार कडाडले, एकनाथ शिंदेना म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 17:36 IST

नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा आहे, पहिल्या दिवसापासूनच हे अधिवेशन वादळी सुरू आहे. विरोधकांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप करत मंत्रीपदाचा राजीनामा मागितला.

नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा आहे, पहिल्या दिवसापासूनच हे अधिवेशन वादळी सुरू आहे. विरोधकांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप करत मंत्रीपदाचा राजीनामा मागितला. तर कर्नाटक विरोधी प्रस्ताव संमत करण्याची मागणी केली. आज अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर खोचक टोले लगावले. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. मागच्या पाच महिन्यापूर्वी शिवसेनेत बंड का झाले याची आठवण मुख्यमंत्री शिंदे यांनी करुन दिली. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर देत पुलोद सरकारची आठवण करुन दिली. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणात शिवसेनेत झालेल्या फुटीचे कारण सांगत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर देत आम्हाला सर्वांना या फुटीचे माहित आहे, आम्हाला त्याच काही देणंघेणं नाही, असा टोला अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला. 

'शरद पवार यांनीही ७८ साली पुलोद स्थापन केलं होतं. हशु अडवाणी, उत्तमराव पाटील त्या मंत्रिमंडळात होते. त्यावेळी कधीही मुख्यमंत्र्यांची भाषणं राजकीय होत नव्हती. एखाद दुसरा चिमटा काढला तर आम्ही समजू शकतो. 

बाहेर ज्यांना सोडून आला, त्यांच्या वृत्तपत्रात काही बातम्या येणार, ते तुम्ही मनाला लावून घेणार आणि ते तुम्ही इथे सांगणार, याच आम्हाला काय देणंघेणं आहे, असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.  

'आपला महाराष्ट्र आहे, शाहू-फुले-आंबेडकर, युगपुरूष शिवाजी महाराजांचं आपण नाव घेतो. यशवंतराव चव्हाणांची शिकवण काय बघा, आचार्य अत्रे किती टीका करायचे माहीत आहे, या टीकेला यशवंतराव चव्हाण दिलदारपणे घ्यायचे, असंही अजित पवार म्हणाले.

'मुख्यमंत्री महोदय, तुम्ही याच्यातून बाहेर या. तुम्हाला बहुमत मिळालं आहे. तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री झाला आहात. असल्या छोट्या छोट्या गोष्टीत तुम्ही तुमचं मन जास्त रमवू नका. हे राज्यातल्या जनतेला अजिबात आवडणार नाही. मला काम कसं मिळेल, बेरोजगारी कशी कमी होणार आहे, शेतकऱ्यांसंदर्भात काय भूमिका घेतली जाणार, याकडे त्यांचं लक्ष आहे, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला. 

'तुम्ही तुमच्या मुलाच्या वयाच्या लोकांनाच जास्त टार्गेट करताय, जाऊ द्या मुलं आहेत म्हणून सोडून द्या. दुसऱ्या कार्यकर्त्यांना प्रवक्ते म्हणून बोलायला सांगा. तुम्ही तुमचं भाषण परत बघा. आम्हालाही वाटतं ज्यांनी त्या खुर्चीवर बसावं त्यांनी राज्याचं हित डोळ्यासमोर ठेवावं, असंही अजित पवार म्हणाले. 

Assembly Winter Session: "आम्ही रेशीमबागेत गेलो होतो गोविंदबागेत नाही", मुख्यमंत्र्यांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

'नरेंद्र मोदी, अमित शाहांशी तुमचे चांगले संबंध झाले आहेत. तिकडनं राज्याच्या भल्याकरिता काय आणता येईल, कर्नाटकच्या भूमिकेबद्दल एकी करण्याचा प्रयत्न करा, असा सल्लाही अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरे