शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

महाराष्ट्रातील साहित्यिकांनी यशवंतरावांना न्याय दिला नाही : मधुकर भावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 10:23 PM

१९७४ च्या इचलकरंजी येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पु.ल. देशपांडे यांनी यशवंतराव चव्हाण संमेलनात येऊ नये यासाठी प्रयत्न केला तर पुढल्या वर्षी कराडला झालेल्या संमेलनात अध्यक्ष दुर्गा भागवत यांनी त्यांना व्यासपीठावर बसू दिले नाही. महाराष्ट्र घडविणाऱ्या नेत्याची अशी अवहेलना कुणाच्याही वाट्याला आली नाही. सात संमेलनांचे उद्घाटक व सहा संमेलनांचे स्वागताध्यक्ष राहिलेल्या यशवंतरावांनी अनेक दर्जेदार पुस्तकांचे लिखाणही केले असून ते अशा प्रतिथयश साहित्यिकांपेक्षा काकणभरही कमी नाही. मात्र यशवंतरावांना संमेलनाचा अध्यक्ष बनवावा, असे या साहित्यिकांना वाटले नाही. महाराष्ट्रातील साहित्यिकांनी यशवंतरावांना न्याय दिला नाही, अशी खंत ज्येष्ठ विचारवंत मधुकर भावे यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देयशवंतराव चव्हाण जयंतीनिमित्त व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १९७४ च्या इचलकरंजी येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पु.ल. देशपांडे यांनी यशवंतराव चव्हाण संमेलनात येऊ नये यासाठी प्रयत्न केला तर पुढल्या वर्षी कराडला झालेल्या संमेलनात अध्यक्ष दुर्गा भागवत यांनी त्यांना व्यासपीठावर बसू दिले नाही. महाराष्ट्र घडविणाऱ्या नेत्याची अशी अवहेलना कुणाच्याही वाट्याला आली नाही. सात संमेलनांचे उद्घाटक व सहा संमेलनांचे स्वागताध्यक्ष राहिलेल्या यशवंतरावांनी अनेक दर्जेदार पुस्तकांचे लिखाणही केले असून ते अशा प्रतिथयश साहित्यिकांपेक्षा काकणभरही कमी नाही. मात्र यशवंतरावांना संमेलनाचा अध्यक्ष बनवावा, असे या साहित्यिकांना वाटले नाही. महाराष्ट्रातील साहित्यिकांनी यशवंतरावांना न्याय दिला नाही, अशी खंत ज्येष्ठ विचारवंत मधुकर भावे यांनी व्यक्त केली.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्यावतीने त्यांच्या १०६ व्या जयंतीचे औचित्य साधून ‘यशवंतराव चव्हाण यांचा सांस्कृतिक विचार आणि आजची स्थिती’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन बाबुराव धनवटे सभागृहात करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ता म्हणून भावे बोलत होते. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्रिपद भूषविलेल्या यशवंतरावांनी राज्याची राजकीय आणि सांस्कृतिक जडणघडण केली. गृहमंत्री म्हणून देशाचेही नेतृत्व केले. राजकारणात त्यांचे कर्तृत्व मोठे आहे तसे साहित्य व संस्कृतीच्या क्षेत्रातही आहे. संस्कारी, सांस्कृतिक, विचारवंत, वाचक, साहित्यिक, संगीत प्रेमी अशा सर्व अंगाने त्यांची ओळख करणे महत्त्वाचे आहे. राज्यकर्त्यांच्या दोन डोळ्यांपैकी एक संस्कृतीचा असावा, असे मानणारे ते होते. त्यांनी कृष्णाकाठ, युगांत अशा पुस्तकातून दर्जेदार साहित्य रचले. त्यांनीच साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना केली व एवढेच नाही तर लक्ष्मण जोशी, ना.धो. महानोर, ग.दि. माडगूळकर अशा अनेक दिग्गजांना महत्त्वाच्या पदावर विराजमानही केले. माणस शोधून त्यांना आवश्यक ठिकाणी नियुक्त करून महाराष्ट्र समृद्ध करण्याचे काम त्यांनी केले. असा सांस्कृतिक डोळा आजच्या राज्यकर्त्यांना नाही, असे परखड मत भावे यांनी मांडले.डोक्यावरून मैला वाहुन नेण्यास बंदी घालण्याचे विधेयक मांडणारे महाराष्ट्र पहिले राज्य होते. यातूनच त्यांचा सुसंस्कृतपणा दिसून येतो. तमाशा कलावंत, कुस्तीगिर, साहित्यिक आदींना मानधन देण्याची सुरुवात त्यांनी केली. मुंबईत साहित्यिकांच्या निवासाची व्यवस्था केली. त्यांच्या तोडीचा एकही राजकारणी आज मिळणे शक्य नाही. त्यांच्या सुसंस्कृतपणाचा वारसा राज्यकर्त्यांना जपता आला नाही, याची खंत भावे यांनी व्यक्त केली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीश गांधी यांनीही विचार व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. प्रमोद मुनघाटे, अनिल इंदाणे, प्रेमबाबू लुनावत आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. प्रदीप विटाळकर व संचालन रेखा दंडिगे-घिया यांनी केले. कवी लोकनाथ यशवंत यांनी आभार मानले.

टॅग्स :Yashwantrao Chavhanयशवंतराव चव्हाणliteratureसाहित्य