शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
3
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
4
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
5
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
6
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
7
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
8
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
9
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
10
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
11
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
12
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
13
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
14
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
15
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
16
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
17
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
18
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
19
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
20
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला

Maharashtra Government: ''मध्यावधी निवडणुका नाही, पाच वर्षे स्थिर सरकार देऊ''

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 06:29 IST

राज्यात कुठल्याही परिस्थितीत मध्यावधी निवडणुका होणार नाहीत.

नागपूर : राज्यात कुठल्याही परिस्थितीत मध्यावधी निवडणुका होणार नाहीत. पाच वर्षे स्थिर सरकार देण्याचाच आमचा प्रयत्न असेल व येणारे सरकार तकलादू नसेल, असे राष्ट्र वादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार स्पष्ट केले. मुस्लीम आरक्षण लागू करण्यासंदर्भात सरकार स्थापन झाल्यानंतर सर्व पक्ष मिळून एकत्रित भूमिका ठरवतील. धर्मनिरपक्षेतेशी तडजोड करणार नाही, असेही त्यांनी सांगितले.विदर्भ दौऱ्यावर असलेले शरद पवार यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात सरकार कधी स्थापन होईल हे आता सांगता येते नाही. काँग्रेसने प्रतिनिधी नेमले आहेत व राष्ट्रवादीच्या नेत्यांशी त्यांची चर्चा सुरू आहे. काँग्रेस व शिवसेना वगळता कुणाशीही आमची चर्चा सुरू नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री कोण असेल, असे विचारले असता, आताच कशाला ‘कार्ड’ खुले करू, एवढेच त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई मिळावी व सरसकट कर्जमाफी मिळावी, यासाठी प्रयत्न राहणार आहे. केंद्र या स्थितीबाबत किती गंभीर आहे ते माहिती नाही, पण शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी कृषी व वित्त मंत्रालयाशी चर्चा करू. तेथून दिलासा मिळाला नाही, तर थेट पंतप्रधान मोदींची भेट घेऊन, असे पवार यांनी सांगितले.सरसकट पंचनामे व्हावेतअवकाळी पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. ३३ टक्क्यांहून जास्त नुकसान झालेल्या पीकजमिनींचे पंचनामे करण्यात येत आहेत. मात्र, हे मापदंड योग्य नसून यात बदल करण्याची गरज असून सरसकट पंचनामे झाले पाहिजे, अशी मागणी पवार यांनी केली.महिला मुख्यमंत्र्यांसंदर्भात विचार नाहीराष्ट्रवादी काँग्रेसचा अडीच वर्षे मुख्यमंत्री झाला, तर सुप्रिया सुळे यांचे नाव समोर येऊ शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे, परंतु पवार यांनी अशी शक्यता खोडून काढली आहे. महिला मुख्यमंत्री झाली, तर आनंदच आहे. मात्र, या संदर्भात कुठलीही चर्चा किंवा प्रस्ताव नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवाय, शिवसेना-आघाडी सरकारचा मुख्यमंत्री कोण होणार, यावरही त्यांनी भाष्य टाळले.>शरद पवार म्हणाले, ‘मी पुन्हा येईन’तीन पक्षांचे सरकार टिकणार नाही व राज्यात भाजपचेच परत सरकार येईल, असा दावा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात येत आहे. यावर ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ इतकेच माझ्या डोक्यात असल्याचा चिमटा पवार यांनी काढला. फडणवीसांविषयी जेवढी माहिती आहे, त्यात ते ज्योतिषशास्त्राचेही अभ्यासक आहेत हे माहीत नव्हते, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस