शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राच्या परदेशी शिष्यवृत्तीत महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना फटका

By निशांत वानखेडे | Updated: July 24, 2024 18:16 IST

राज्यवार काेटा सिस्टीमने दीडशे पात्र, ठरले अपात्र : पहिल्या ५० रॅंकच्या विद्यापीठातील प्रवेशार्थींनाही लाभ नाही

निशांत वानखेडे

नागपूर : केंद्र सरकारने यावर्षीपासून परदेशी शिष्यवृत्ती याेजनेत राज्यवार काेटा प्रणाली लागू केली. या काेटा प्रणालीचा यंदा सर्वाधिक फटका महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना बसला. काेटा सिस्टीममुळे महाराष्ट्रातील पात्र असलेले तब्बल १४९ विद्यार्थी अपात्र ठरले. या यादीत गुजरातच्या केवळ ६ विद्यार्थ्यांना अपात्र ठरविण्यात आले.

परदेशी विद्यापीठात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मागासर्गीय विद्यार्थ्यांसाठी राज्याप्रमाणे केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागातर्फे परदेशी शिष्यवृत्ती याेजना राबविली जाते. याअंतर्गत देशभरातील १२५ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर व पीएचडीच्या अभ्यासक्रमात शिष्यवृत्तीचा लाभ दिला जाताे. यापूर्वी काेटा प्रणाली लागू नव्हती, पण यावर्षीपासून राज्यनिहाय १० टक्के काेटा ठरविण्यात आला. परदेशी विद्यापीठांच्या जागतिक मानांकनानुसार विद्यार्थ्यांना याेजनेचा लाभ दिला जाताे.

यंदा या याेजनेसाठी महाराष्ट्रातून ३०५ विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर व पीएचडी अभ्यासक्रमासाठी अर्ज केले हाेते. त्यातील १७१ विद्यार्थी पात्र ठरले तर इतर विद्यार्थी कागदपत्रांच्या चुकांमुळे अपात्र ठरले. मात्र पात्र ठरलेल्या १७१ पैकी केवळ २२ विद्यार्थ्यांना याेजनेचा लाभ देण्यात आला असून इतर १४९ विद्यार्थी पात्र असूनही काेटा प्रणालीमुळे याेजनेचे लाभार्थी ठरू शकले नाही. विशेष म्हणजे यातील जवळपास १०० विद्यार्थ्यांचे जागतिक मानांकनात पहिल्या ५० मध्ये असलेल्या विद्यापीठात नंबर लागले आहेत. तरी ते याेजनेचे लाभार्थी ठरू शकले नाही. देशभरातून याेजनेसाठी ७५० च्यावर अर्ज प्राप्त झाले हाेते.

महाराष्ट्रातील विद्यार्थी असतात अधिकविशेष म्हणजे केंद्राच्या याेजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थी अधिक असतात. याचे कारण महाराष्ट्र राज्याच्या परदेशी शिष्यवृत्ती याेजनेत केवळ ७५ विद्यार्थ्यांनाच लाभ मिळताे. त्यामुळे ते केंद्र सरकारच्या परदेशी शिष्यवृत्ती याेजनेकडे धाव घेतात.

इतर राज्यांच्या याेजनेत लाभ जास्त

मात्र कर्नाटक राज्यात सर्वाधिक ५०० विद्यार्थी, आंध्र प्रदेशात २००, राजस्थानमध्ये २०० विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ दिला जाताे. केरळ राज्यात तर मागतील तेवढ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पात्रतेनुसार लाभ दिला जाताे. इतरही राज्यात हा आकडा १०० हून अधिकच आहे. महाराष्ट्रातून केवळ ७५ विद्यार्थ्यांना पाठविले जाते.

केंद्र सरकारचाही काेटा कमीचजेव्हा राज्यात १००, २०० विद्यार्थ्यांना लाभ दिला जात असताना केंद्र सरकारद्वारे देशभरातून केवळ १२५ विद्यार्थ्यांची मर्यादा ठरविण्यात आली आहे. त्यातही आता राज्यनिहाय काेटा प्रणाली ठरविण्यात आल्याने त्याचा फटका महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनाच हाेणार आहे, कारण येथेही केवळ ७५ जागांची मर्यादा आहे.

"केंद्र सरकारने परदेशी शिष्यवृत्ती याेजनेसाठी देशभरासाठी १२५ हून अधिक जागा वाढविण्याची गरज आहे. दुसरीकडे महाराष्ट्र सरकारनेही याेजनेच्या जागा वाढविण्याची गरज आहे. कारण ज्या राज्यांच्या जागा जास्त आहेत, तेथील विद्यार्थी केंद्राच्या याेजनेसाठी जास्त अर्ज करीत नाही. तुलनेत महाराष्ट्रातील अर्ज अधिक असतात. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने राज्य स्तरीय शिष्यवृत्ती याेजनेच्या जागा वाढविण्याचा विचार करावा."

- राजीव खाेब्रागडे, सदस्य, द प्लॅटफार्म

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रMaharashtraमहाराष्ट्रnagpurनागपूर