शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान

By योगेश पांडे | Updated: November 14, 2024 22:52 IST

मविआ म्हणजे ठकबंधन, देशाचे विभाजन करण्याचा डाव

नागपूर : महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला देश व राज्याचे जातीपातींमध्ये विभाजन करायचे आहे. त्यांचा विकास व जनतेच्या हिताच्या योजनांना विरोध आहे. ही आघाडी म्हणजे कुठलेही चांगले गठबंधन नसून खऱ्या अर्थाने ठगबंधन आहे, या शब्दांत केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी टीकास्त्र सोडले. नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात भाजपचे उमेदवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारासाठी जयताळ्याजवळ आयोजित सभेदरम्यान ते गुरुवारी बोलत होते.

मी मध्य प्रदेशातील मुलांप्रमाणे महाराष्ट्रातील मुलांचादेखील मामा आहे. लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातदेखील लागू केल्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या पोटात दुखायला लागले आहे. पण, ही निवडणुकीची योजना नसून बहिणींच्या स्वाभीमानाची आणि त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाची योजना आहे. मध्य प्रदेशात आम्ही ही योजना सुरू केल्यावरदेखील कॉंग्रेसने टीकाच केली होती. आता काँग्रेसवाले देखील ३ हजार रुपये देऊ असे सांगत आहेत. मग आजवर त्यांनी यासाठी पुढाकार का घेतला नाही. तसेच योजनेच्या विरोधात ते न्यायालयात का गेले असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

उद्धव ठाकरे यांची अवस्था तर इकडचेही नाही आणि तिकडचेही नाही, अशी झाली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना स्वर्गात त्रास देण्याचे काम ते करताहेत, अशी टीकाही त्यांनी केली. देवेंद्र फडणवीस हे केवळ वर्तमानच नाही, तर भारतीय राजकारणाचे भविष्य देखील आहेत. राज्याच्या आणि नागपूरच्या विकासाला साथ देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे हात बळकट करा. साऱ्या देशात फडणवीस यांच्या विजयाची चर्चा होईल, अशा पद्धतीने त्यांना जिंकून आणा, असे आवाहन चौहान यांनी केले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४vidarbha regionविदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४nagpurनागपूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस