शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
2
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
3
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
4
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
5
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
6
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
7
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
8
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
9
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
10
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
11
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
12
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
13
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
14
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
15
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
16
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
17
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
18
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
19
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
20
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश

Maharashtra Assembly Election 2019 : ईडी-सीडीचा आधार घेऊन भाजपाकडून मुस्कटदाबी : उदित राज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 11:35 PM

विरोधकांचे तोंड दाबण्यासाठी या देशात सीडी आणि ईडीचा वापर भाजपाने सुरू केला आहे. त्याचा आधार घेऊन हे सरकार आजही राजकारण करीत आहे, असा आरोप काँग्रेसचे माजी खासदार उदित राज यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेतून केला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विरोधकांचे तोंड दाबण्यासाठी या देशात सीडी आणि ईडीचा वापर भाजपाने सुरू केला आहे. त्याचा आधार घेऊन हे सरकार आजही राजकारण करीत आहे, असा आरोप काँग्रेसचे माजी खासदार उदित राज यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेतून केला. उदित राज म्हणाले, सध्या देशाची आर्थिक स्थिती सर्वच क्षेत्रात प्रचंड खालावली आहे. ईडी, सीडी, भारत-पाकिस्तान संबंधांच्या चर्चेवरच भाजपा निवडणुकीत उतरली आहे. पी. चिदंबरम यांना अटक करून कारागृहात टाकण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात फक्त एक मौखिक आरोप आहे. त्याव्यतिरिक्त काहीच नाही. विपक्षातील सर्व नेत्यांच्या विरोधात ईडी आणि सीडीचा वापर होत आहे. मध्य प्रदेशात संपूर्ण नेटवर्क उघड झाले,ज्यात आमदार सरकारच्या विरोधात असतील त्यांना फसविण्याचा डाव होता. एकप्रकारे हे ब्लॅकमेलिंगच आहे.सावरकर यांना भारतरत्न देण्याची चर्चा सुरू आहे. हे सरकार त्यांना भारतरत्न देईलही. मात्र याच सावरकरांनी १३ ते १४ वेळा इंग्रजांकडे माफी मागितली होती, याचाही विचार व्हावा. इंग्रजांकडे माफी मागणाऱ्यांना भारतरत्न देण्याचा आग्रह होत असेल तर असा आग्रह करणारे खरे देशभक्त आहेत का, याचाही विचार व्हावा. भाजपाची मंडळी गांधींचे नाव घ्यायला लागली आहेत. मात्र त्यांना गोडसेही तेवढाच प्रिय आहे. ही दुहेरी नीती जनतेने ओळखावी, असे आवाहन त्यांनी केले. देशातील परिस्थितीबद्दल ते म्हणाले, आदिवासी आणि दलितांना मुख्य प्रवाहापासून दूर ठेवणे, या सरकारने सुरू केले आहे. आज देशात मोठ्या प्रमाणावर बेकारी वाढत आहे. सरकारी कंपन्या विकायला काढल्या आहेत. आरक्षण संपविण्याची तयारी सुरू आहे. दलितांना खासकरून प्रभावित केले जात आहे. खासगीकरण वाढविले जात आहे. रेल्वेसारखा विभाग विकायला काढला आहे. जी संसाधने काँग्रेसने उभी करून देश बळकट केला ती विकून भाजप हा देश चालवायला निघाली आहे. विकून असे किती दिवस काम चालविणार? भारताची अर्थव्यवस्था रसातळाला चालली आहे. कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसा नाही. जीओ आणून बीएसएनएलची परिस्थिती घसरविली, असाही आरोप त्यांनी केला. यावेळी माजी आमदार भगवतीप्रसाद चौधरी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ता संजय दुबे उपस्थित होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Mediaमाध्यमे