शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

महामेट्रोच्या पायडल, ई-सायकल व ई-स्कूटर दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 00:03 IST

स्टेशनवरून उतरल्यानंतर सायकलने डेस्टिनेशनवर जाण्यासाठी महामेट्रोने प्रदूषणमुक्त आणि वाहतुकीला सुलभ अशा देशातील पहिल्या स्मार्ट अर्बन मोबिलिटी सोल्युशनचे उद्घाटन महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांच्या हस्ते गुरुवारी एअरपोर्ट साऊथवर स्टेशनवर करण्यात आले.

ठळक मुद्देसुलभ वाहतूक व्यवस्था : प्रवाशांना स्टेशनवरून डेस्टिनेशनवर जाण्याची सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्टेशनवरून उतरल्यानंतर सायकलने डेस्टिनेशनवर जाण्यासाठी महामेट्रोने प्रदूषणमुक्त आणि वाहतुकीला सुलभ अशा देशातील पहिल्या स्मार्ट अर्बन मोबिलिटी सोल्युशनचे उद्घाटन महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांच्या हस्ते गुरुवारी एअरपोर्ट साऊथवर स्टेशनवर करण्यात आले.स्मार्ट अर्बन मोबिलिटी सोल्युशन बाऊन्स कंपनीच्या सहकार्याने महामेट्रोने ही सेवाआणली आहे. या अंतर्गत पायडल सायकल, ई-सायकल, ई-स्कूटर दाखल केली. प्रवाशांना सायकलकरिता १० मिनिटांसाठी १ रुपया भाडे द्यावे लागेल. अ‍ॅप डाऊनलोड करून क्यूआर कोड लॉकला दाखवायचा आहे. मल्टिमॉडेल इंटिग्रेशन अंतर्गत फर्स्ट टू लास्ट माईल, नॉन मोटराईज्ड ट्रान्सपोर्ट अशी संकल्पना असून याद्वारे प्रत्येक प्रवाशाला स्टेशनवरून वाहतुकीची सुलभ यंत्रणा उपलब्ध होणार आहे. याकरिता मनपा, एनएचएआय आणि पीडब्ल्यूडीसोबत करार करण्यात येणार आहे. ई-रिक्षाने सहभाग नोंदविला आहे. मिहानमध्ये अनेक कंपन्यांनी या सुविधेची मागणी केली आहे. सायकल वा ई-स्कूटर स्टेशनवरून उतरल्यानंतर प्रवाशाला डेस्टिनेशनवर सोडायची आहे. याशिवाय प्रवाशांना स्टेशनवरून कोणत्याही वाहतुकीच्या साधनांचा उपयोग करता येणार आहे. ही यंत्रणा महामेट्रोच्या प्रत्येक स्टेशनवर राहणार आहे.मेट्रोत ‘नारी शक्ती कोच’नागपुरातील महिला संघटनांच्या मागणीनुसार महामेट्रोमध्ये असलेल्या तीन कोचपैकी एक कोच महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. ‘नारी शक्ती कोच’ असे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे महिलांना दिवसरात्र सुरक्षित प्रवास करता येईल. तिकिटावर असलेल्या क्यूआर कोडच्या माध्यमातून प्रवाशांना स्टेशनवर प्रवेश करता येईल.१९ कि़मी. व आठ स्टेशनचे काम फेब्रुवारीअखेर पूर्ण होणारफेब्रुवारीअखेरीस वा मार्चच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महामेट्रोच्या नागपूर प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. या संदर्भात पत्रव्यवहार पंतप्रधान कार्यालयासोबत करण्यात आला आहे. कामाला गती देतानाच रिच-१ मध्ये खापरी ते सीताबर्डीपर्यंत १३ कि़मी. अंतर व सहा स्टेशन आणि रिच-३ मध्ये लोकमान्यनगर ते सुभाषनगरपर्यंत सहा कि़मी. अंतर व दोन स्टेशनचे काम फेब्रुवारीअखेर पूर्ण होणार आहे. रिच-१ मध्ये खापरी, न्यू एअरपोर्ट, एअरपोर्ट साऊथ, एअरपोर्ट, जयप्रकाशनगर, सीताबर्डी आणि रिच-३ मध्ये लोकमान्यनगर आणि सुभाषनगर स्टेशनचा समावेश आहे. मेट्रोच्या एकूण १९ कि़मी. मार्गावर मेट्रो व्यावसायिकरीत्या धावणार आहे. स्टेशनचे बांधकाम करणारी कंपनी आयएल अ‍ॅण्ड एफएसचे दिवाळे निघाल्यानंतर कंपनीचे काम बंद झाले. पण महामेट्रोने २५ कंत्राटदारांच्या माध्यमातून स्टेशनचे बांधकाम करण्यात येत आहे.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर