शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

महाज्योतीतर्फे तेलबियांचे ५० क्लस्टर होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2022 20:22 IST

Nagpur News करडई तेलबियांचे ५० क्लस्टर तयार करण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री व महाज्योतीचे अध्यक्ष विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी येथे पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देओबीसी विद्यार्थ्यांसह शेतकऱ्यांचे आर्थिक उत्थानही महाज्योतीचा उद्देश

नागपूर : ओबीसी विद्यार्थ्यांसह शेतकऱ्यांचे आर्थिक उत्थान हा सुद्धा महाज्योतीचा मुख्य उद्देश आहे. त्या उद्देशाने करडई तेलबियांचे ५० क्लस्टर तयार करण्यात येणार आहे. यात ओबीसी समाजातील बेरोजगारांना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री व महाज्योतीचे अध्यक्ष विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी येथे पत्रपरिषदेत दिली.

महाज्योतीतर्फे वाशीम, बुलडाणा, अकोला, वर्धा, नागपूर, चंद्रपूर व गडचिरोली या सात जिल्ह्यात करडई या तेलबिया पिकांचे उत्पादन करण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या सात जिल्ह्यातील ६,९४९ शेतकऱ्यांना १६,१६२ एकर क्षेत्राकरिता प्रति एकर ४ किलोप्रमाणे एकूण ६४६.६० क्विंटल बियाणे मोफत वाटण्यात आले आहे. या व्यवहारात ५ कोटी ११ लाख रुपये इतका नफा अपेक्षित आहे. या प्रकल्पातून तेलाचा ब्रांड तयार होईल. तसेच शेतकऱ्याला रब्बी हंगामाकरिता हमखास उत्पन्नाची सोय नेहमीकरिता प्राप्त होईल.

महाज्योतीचा निधी दुसरीकडे वळविला जात असल्याचा आरोप काही जण करताहेत पण हे चुकीचे आहे. मुळात ओबीसी व भटक्या विमुक्त समाजातील बेरोजगारांना येथे रोजगार उपलब्ध होईल. एकूण ५० क्लस्टर तयार करण्यात येणार असून यापैकी १० क्लस्टर मी माझ्या मतदार संघात तयार केले तर काय चुकले? असा प्रतिप्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

महाज्योतीला केवळ सव्वा वर्ष झाले असून या सव्वा वर्षात मोठी मजल आम्ही मारली आहे. इतर योजनांमध्येही महाज्योती चांगले काम करीत असल्याचा पाढाच त्यांनी यावेळी वाचून दाखविला. पत्रपरिषदेला महाज्योती संचालक मंडळाचे सदस्य दिवाकर गमे व डॉ. बबनराव तायवाडे उपस्थित हाेते.

-उमरेड रोडवर होणार भव्य प्रशिक्षण केंद्र

शासनाने उमरेड रोडवर अडीज एकर जागा देऊ केली आहे. परंतु आम्ही २० एकर जागा मागितली आहे. या जागेवर महाज्योतीचे वसतिगृह व भव्य प्रशिक्षण केंद्र तयार केले जाईल. तसेच महाज्योतीच्या मुख्यालयासाठी सिव्हिल लाईन्स येथे ५ एकर जागा मागण्यात आली आहे. त्यासंदर्भातही लवकरच निर्णय होईल. यासोबतच पुढील शैक्षणिक सत्रात ७२ वसतिगृहे सुरू होतील, असा विश्वासही वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार