शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
4
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
5
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
6
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
7
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
8
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
9
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
10
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
11
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
12
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
13
४ महिन्यांत ६० रुपयांवरून २५२ वर आला 'हा' शेअर; गुंतवणूकदार मालामाल, तुमच्याकडे आहे का?
14
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
15
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
16
धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन
17
Chaturmas 2025: सुरु होतोय चातुर्मास; या चार महिन्यात कांदा-लसूण खाऊ नये, कारण...
18
तेजस्वीसोबत ब्रेकअप.. तिच्यासाठीच अनुषा दांडेकरला सोडलं? करण कुंद्रा म्हणतो, "पैसे लावा.."
19
रुकेगा भी नहीं और झुकेगा भी नहीं; नोवाक जोकोविचचा पुष्पा अवतार, फोटोची सोशल मीडियावर चर्चा!
20
शेजारी राष्ट्राकडे आलं इलॉन मस्कचं हाय-स्पीड इंटरनेट! एका महिन्याचा खर्च पाहून धक्का बसेल!

महाबोधी महाविहार बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावा

By आनंद डेकाटे | Updated: July 2, 2025 16:02 IST

Nagpur : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिष्टमंडळ भेटले, निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बिहारमधील महाबोधी महाविहार या जगप्रसिद्ध बौद्ध धार्मिक स्थळाचे व्यवस्थापन बौद्ध भिक्खू संघ आणि बौद्ध समाजाच्या मार्गदर्शनाखाली पारदर्शक आणि धर्मनिरपेक्ष पद्धतीने व्हावे, या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बौद्ध समाजाच्यावतीने मुंबई येथे बुधवारी अधिकृत निवेदन सादर करण्यात आले.

महाबोधी महाविहार हे केवळ एक विहार नाही, तर बौद्ध धर्मीयांचे जागतिक श्रद्धास्थान असून युनिस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट असलेले ऐतिहासिक स्थळ आहे. तथापि, आजही या पवित्र स्थळाच्या व्यवस्थापनात बौद्ध समाजाची आणि भिक्खू संघाची सहभागिता अत्यंत मर्यादित आहे. हा केवळ धार्मिक नाही, तर बौद्ध समाजाच्या आत्मसन्मानाचा आणि सांस्कृतिक अस्तित्वाचा प्रश्न आहे. म्हणूनच बौद्ध समाजाच्या भावना लक्षात घेऊन, या स्थळाचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्धांच्या हाती देण्याचा निर्णय शासनाने तात्काळ घ्यावा, ही संपूर्ण बौद्ध धर्मियांची ठाम आणि न्याय्य मागणी आहे असे यावेळी शिष्टमंडळाने सांगितले. बौद्ध धर्माच्या मूलभूत तत्त्वांनुसार - शांती, करुणा आणि समता यांचा प्रसार करणाऱ्या या स्थळाचे व्यवस्थापनदेखील तितक्याच आदर्श मूल्यांच्या आधारे व्हावे, असे समाजाचे मत आहे.

यावेळी माजी मंत्री आ. डॉ नितीन राऊत यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळात अखिल भारतीय भिक्षु संघाचे प्रतिनिधी भदंत विनय रख्खितो, भदंत ज्ञानबोधि महाथेरो, भिक्षुणी धम्मदिन्ना इतर भिक्षुसंघ, अशोक गोडघाटे, बंडोपंत टेंभुर्णे, अनिल नगरारे, सुरेश पाटील, अशोक कोल्हटकर, अमन कांबळे, भीमराव वैद्य, एन. टी. मेश्राम, राजेश लाडे, उमेश बोरकर, तक्षशिला वाघधरे व इतर बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :nagpurनागपूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसDiksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी