शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

धक्कादायक! प्रेमीयुगलाची एकाच दोरीला गळफास घेऊन आत्महत्या

By जितेंद्र ढवळे | Updated: September 5, 2023 14:36 IST

पारशिवनी तालुक्यातील पेंढरी येथील घटना

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील पेंढरी येथे एका महाविद्यालयीन प्रेमी युगलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. गौरव राजेंद्र बघमारे (१८) आणि जानव्ही जीवन नायले (१८) दोघेही रा.पेंढरी अशी मृतांची नावे आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार गौरव हा सावनेर येथील आयटीआयमध्ये शिक्षण घेत होता तर जानव्ही पारशिवनीच्या हरिहर महाविद्यालयाच्या बारावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी होती. गत वर्षभरापासून दोघांचे प्रेमप्रकरण सुरु होते. पेंढरी गावात एक पडके घर आहे. या घरात मंगळवारी (दि.५) पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास या दोघांचे मृतदेह आढळून आले. या दोघांनी एकाच दोराला गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती पारशिवनी पोलिसांनी दिली. 

प्राथमिक माहितीनुसार या दोघांच्या प्रेमाला कुटुंबियांचा विरोध होता. त्यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे असे सांगितले जात आहे. सोमवारी (दि.४) या दोघांचे मोबाईलवर संभाषण झाल्याची माहिती आहे. दोघांनी मध्यरात्री आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. पारशिवनी पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात रवाना केले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूnagpurनागपूर