शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

यवतमाळ, वर्धा जिल्ह्यात साडेतीन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान; शेतकरी कोलमडून पडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2022 11:00 IST

यवतमाळ जिल्ह्यात दी़ड लाख शेतकऱ्यांना फटका, १०४४ गावे बाधित

नागपूर / यवतमाळ / वर्धा : यवतमाळ, वर्धा या दोन जिल्ह्यांमध्ये सुमारे ३.४७ लाख हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. १ ते १९ जुलै या कालावधीत मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीचा यवतमाळ जिल्ह्यातील १०४० गावांना फटका बसला असून, जिल्ह्यातील दीड लाख शेतकऱ्यांच्या सव्वादोन लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे. यात ८७ हजार हेक्टरवरील कापूस पिकांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

जुलै महिन्यातील १९ दिवसांत तब्बल ९५ मंडळात अतिवृष्टी झाल्याने शेतातील उभ्या पिकाचे मोठे नुकसान झाले. नुकसान झालेल्या सव्वादोन लाख हेक्टर क्षेत्रामध्ये सर्वाधिक ८७ हजार २६४ हेक्टर क्षेत्रावरील कापसाचे नुकसान झाले असून, ४८ हजार हेक्टरवरील सोयाबीन, १४ हजार हेक्टरवरील तूर, ३३० हेक्टरवरील ज्वारी आणि २३१ हेक्टरवरील भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्ह्यातील एक हजार ४४ गावांतील पिकांना या अतिपावसाचा फटका बसला आहे.

नागपूर जिल्ह्यात २८,७५१ हेक्टर पिकांचे नुकसान

नैसर्गिक आपत्तीमुळे नागपूर जिल्ह्यात गेल्या १ जून पासून आतापर्यंत जवळपास २८,७५१.८७ हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार १ जूनपासून १८ जुलैपर्यंत जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे एकूण २६ मृत्यू झाले आहेत. २२ व्यक्ती जखमी झाले. १९५ पशुहानी झाली. ५३३ पक्ष्यांचाही मृत्यू झाला. तर १५१९ घरे, गोठे, व झोपड्यांचे नुकसान झाले. २६ पैकी २० मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी ४ लक्ष रुपयाचे अनुदान वाटप झाले आहे. २ देयके कोषागारात सादर झाले. तर ४ प्रकरण. जिल्हाधिकारी बैतुल (मध्यप्रदेश) कडे हस्तांतरित करण्यात आले.

आजपासून सर्वेक्षण

  • जुलै महिन्यातील १९ दिवसांत जिल्ह्यात ४५२ मिमी पाऊस झाला आहे. हा पाऊस मासिक सरासरीच्या २७२ टक्के आहे.
  • कृषी सहायक, तलाठी आणि ग्रामसेवक गुरुवार, २१ जुलैपासून सर्वेक्षण करणार आहेत.
  • पुढील आठ ते दहा दिवसांत हा अहवाल पाठविण्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूचना असल्याचे यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.
टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस