शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

यवतमाळ, वर्धा जिल्ह्यात साडेतीन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान; शेतकरी कोलमडून पडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2022 11:00 IST

यवतमाळ जिल्ह्यात दी़ड लाख शेतकऱ्यांना फटका, १०४४ गावे बाधित

नागपूर / यवतमाळ / वर्धा : यवतमाळ, वर्धा या दोन जिल्ह्यांमध्ये सुमारे ३.४७ लाख हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. १ ते १९ जुलै या कालावधीत मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीचा यवतमाळ जिल्ह्यातील १०४० गावांना फटका बसला असून, जिल्ह्यातील दीड लाख शेतकऱ्यांच्या सव्वादोन लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे. यात ८७ हजार हेक्टरवरील कापूस पिकांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

जुलै महिन्यातील १९ दिवसांत तब्बल ९५ मंडळात अतिवृष्टी झाल्याने शेतातील उभ्या पिकाचे मोठे नुकसान झाले. नुकसान झालेल्या सव्वादोन लाख हेक्टर क्षेत्रामध्ये सर्वाधिक ८७ हजार २६४ हेक्टर क्षेत्रावरील कापसाचे नुकसान झाले असून, ४८ हजार हेक्टरवरील सोयाबीन, १४ हजार हेक्टरवरील तूर, ३३० हेक्टरवरील ज्वारी आणि २३१ हेक्टरवरील भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्ह्यातील एक हजार ४४ गावांतील पिकांना या अतिपावसाचा फटका बसला आहे.

नागपूर जिल्ह्यात २८,७५१ हेक्टर पिकांचे नुकसान

नैसर्गिक आपत्तीमुळे नागपूर जिल्ह्यात गेल्या १ जून पासून आतापर्यंत जवळपास २८,७५१.८७ हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार १ जूनपासून १८ जुलैपर्यंत जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे एकूण २६ मृत्यू झाले आहेत. २२ व्यक्ती जखमी झाले. १९५ पशुहानी झाली. ५३३ पक्ष्यांचाही मृत्यू झाला. तर १५१९ घरे, गोठे, व झोपड्यांचे नुकसान झाले. २६ पैकी २० मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी ४ लक्ष रुपयाचे अनुदान वाटप झाले आहे. २ देयके कोषागारात सादर झाले. तर ४ प्रकरण. जिल्हाधिकारी बैतुल (मध्यप्रदेश) कडे हस्तांतरित करण्यात आले.

आजपासून सर्वेक्षण

  • जुलै महिन्यातील १९ दिवसांत जिल्ह्यात ४५२ मिमी पाऊस झाला आहे. हा पाऊस मासिक सरासरीच्या २७२ टक्के आहे.
  • कृषी सहायक, तलाठी आणि ग्रामसेवक गुरुवार, २१ जुलैपासून सर्वेक्षण करणार आहेत.
  • पुढील आठ ते दहा दिवसांत हा अहवाल पाठविण्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूचना असल्याचे यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.
टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस