शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ, वर्धा जिल्ह्यात साडेतीन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान; शेतकरी कोलमडून पडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2022 11:00 IST

यवतमाळ जिल्ह्यात दी़ड लाख शेतकऱ्यांना फटका, १०४४ गावे बाधित

नागपूर / यवतमाळ / वर्धा : यवतमाळ, वर्धा या दोन जिल्ह्यांमध्ये सुमारे ३.४७ लाख हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. १ ते १९ जुलै या कालावधीत मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीचा यवतमाळ जिल्ह्यातील १०४० गावांना फटका बसला असून, जिल्ह्यातील दीड लाख शेतकऱ्यांच्या सव्वादोन लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे. यात ८७ हजार हेक्टरवरील कापूस पिकांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

जुलै महिन्यातील १९ दिवसांत तब्बल ९५ मंडळात अतिवृष्टी झाल्याने शेतातील उभ्या पिकाचे मोठे नुकसान झाले. नुकसान झालेल्या सव्वादोन लाख हेक्टर क्षेत्रामध्ये सर्वाधिक ८७ हजार २६४ हेक्टर क्षेत्रावरील कापसाचे नुकसान झाले असून, ४८ हजार हेक्टरवरील सोयाबीन, १४ हजार हेक्टरवरील तूर, ३३० हेक्टरवरील ज्वारी आणि २३१ हेक्टरवरील भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्ह्यातील एक हजार ४४ गावांतील पिकांना या अतिपावसाचा फटका बसला आहे.

नागपूर जिल्ह्यात २८,७५१ हेक्टर पिकांचे नुकसान

नैसर्गिक आपत्तीमुळे नागपूर जिल्ह्यात गेल्या १ जून पासून आतापर्यंत जवळपास २८,७५१.८७ हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार १ जूनपासून १८ जुलैपर्यंत जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे एकूण २६ मृत्यू झाले आहेत. २२ व्यक्ती जखमी झाले. १९५ पशुहानी झाली. ५३३ पक्ष्यांचाही मृत्यू झाला. तर १५१९ घरे, गोठे, व झोपड्यांचे नुकसान झाले. २६ पैकी २० मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी ४ लक्ष रुपयाचे अनुदान वाटप झाले आहे. २ देयके कोषागारात सादर झाले. तर ४ प्रकरण. जिल्हाधिकारी बैतुल (मध्यप्रदेश) कडे हस्तांतरित करण्यात आले.

आजपासून सर्वेक्षण

  • जुलै महिन्यातील १९ दिवसांत जिल्ह्यात ४५२ मिमी पाऊस झाला आहे. हा पाऊस मासिक सरासरीच्या २७२ टक्के आहे.
  • कृषी सहायक, तलाठी आणि ग्रामसेवक गुरुवार, २१ जुलैपासून सर्वेक्षण करणार आहेत.
  • पुढील आठ ते दहा दिवसांत हा अहवाल पाठविण्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूचना असल्याचे यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.
टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस