शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

लोकमतचे प्रथम संपादक पत्रपंडित पद्मश्री पां.वा. गाडगीळ व म.य. दळवी स्मृती लोकमत पत्रकारिता पुरस्कारांचे आज वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 08:00 IST

लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या गेलेल्या पत्रकारितेतील विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या पत्रकारांचा गौरव करण्यासाठी १९८८ साली लोकमतने सुरू केलेल्या पत्रकारिता पुरस्कार स्पर्धेला यंदा २८ वर्षे पूर्ण होत आहेत.

ठळक मुद्दे२८ वर्षांपासून सुरू आहे पत्रकारिता पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या गेलेल्या पत्रकारितेतील विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या पत्रकारांचा गौरव करण्यासाठी १९८८ साली लोकमतने सुरू केलेल्या पत्रकारिता पुरस्कार स्पर्धेला यंदा २८ वर्षे पूर्ण होत आहेत. केवळ राज्यच नव्हे तर संपूर्ण देशात विखुरलेल्या मराठी पत्रकारांचा गौरव करण्याचा घेतलेला वसा लोकमतने निष्ठेने पाळला आहे. नागपूरमध्ये या पुरस्कारांचे आज संध्याकाळी वितरण केले जाणार आहे. या कार्यक्रमास ज्येष्ठ संपादक कुमार केतकर व ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या पुरस्कारांच्या निमित्ताने ज्यांच्या नावे हा पुरस्कार दिला जातो आहे, त्या पां.वा. गाडगीळ व म.य. दळवी या दोन ज्येष्ठ संपादकांचा अल्प परिचय देत आहोत.लोकमतचे प्रथम संपादक पां.वा. गाडगीळएक व्यासंगी संपादक म्हणून पां.वा. गाडगीळ यांची ओळख साऱ्या महाराष्ट्राला आहे. त्यांचे पूर्ण नाव पांडुरंग वासुदेव गाडगीळ. पण ते पां.वा. गाडगीळ म्हणूनच ख्यातनाम होते. त्यांचा जन्म कुरुंदवाड येथे ३ एप्रिल १८९९ मध्ये झाला. लोकमान्य टिळकांवर त्यांची अपार श्रद्धा होती. त्यांच्या प्रेरणेने त्यांनी सत्याग्रहात भाग घेऊन तुरुंगवासही भोगला होता. १९२० केसरीमध्ये मुद्रण शोधकाच्या कामापासून गाडगीळांनी सुरुवात केली. तात्यासाहेब केळकर यांच्या सानिध्यात त्यांनी पत्रकारितेचे धडे गिरविले. पुढील काळात ते महाराष्ट्रातील एक ख्यातनाम संपादक आणि विचारवंत म्हणून परिचित झाले. लोकमान्य, लोकमित्र, नवशक्ती या दैनिकांचे संपादक म्हणून त्यांची कारकीर्द अत्यंत गाजली. नागपूरला १५ डिसेंबर १९७१ मध्ये लोकमत सुरू झाल्यानंतर लोकमतच्या संपादकीयपदाची धुरा गाडगीळ यांनी आपल्या शिरावर घेतली. लोकमतचे संपादक म्हणून त्यांनी विदर्भाच्या वृत्तपत्रसृष्टीत जे कार्य केले ते केवळ बेजोड म्हणावे लागेल. ते मार्क्सवादाचे गाढे अभ्यासक होते. नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वाचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांचे १८ एप्रिल १९८७ रोजी वयाच्या ८८ व्या वर्षी मुंबईत निधन झाले.लोकमतचे द्वितीय संपादक म. य. दळवी उपाख्य बाबा दळवीपां.वा. गाडगीळ यांच्यानंतर लोकमतची धुरा यशस्वीपणे वाहून नेण्याचे मोलाचे कार्य पार पाडलेले मधुकर यशवंत दळवी उपाख्य बाबा हे लोकमतचे द्वितीय संपादक होते. नागपुरात लोकमतचे काम सात वर्षे सांभाळल्यानंतर औरंगाबाद येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या लोकमतच्या औरंगाबाद आवृत्तीची जडणघडण करण्यात बाबा दळवींचा सिंहाचा वाटा होता. कार्यकारी संपादक पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी मानद संपादक म्हणून अखेरपर्यंत काम केले.महाराष्ट्रातील समाजवादी चळवळीत वाढलेले बाबा दळवी हे आदर्श पत्रकारितेचा नमुना होते. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या वृत्तीने ते आयुष्यभर वागले. आताच्या रायगड जिल्ह्यात असलेल्या जंजिरा मुरूड या संस्थानात त्यांचा जन्म झाला होता. मुंबईच्या नवशक्ती व लोकसत्तामध्ये अनेक वर्ष उपसंपादक, मुख्य उपसंपादक अशा पदांवर काम केल्यानंतर १९७५ साली नागपुरातील लोकमतच्या दैनिकाचे कार्यकारी संपादक म्हणून बाबा दळवी यांनी सूत्रे हाती घेतली. महाराष्ट्रात त्यांच्या शिबिरातून तयार झालेले अनेक पत्रकार आजही आहेत. वयाच्या ७९ व्या वर्षी २७ मार्च १९९६ मध्ये त्यांचे औरंगाबाद येथे निधन झाले.या दोन थोर संपादकांच्या स्मृतीत लोकमतने पां.वा. गाडगीळ सामाजिक लेखन व म.य. दळवी शोधपत्रकारिता हे दोन पुरस्कार सुरू केले आहेत. 

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंट