शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

लोकमतचे प्रथम संपादक पत्रपंडित पद्मश्री पां.वा. गाडगीळ व म.य. दळवी स्मृती लोकमत पत्रकारिता पुरस्कारांचे आज वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 08:00 IST

लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या गेलेल्या पत्रकारितेतील विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या पत्रकारांचा गौरव करण्यासाठी १९८८ साली लोकमतने सुरू केलेल्या पत्रकारिता पुरस्कार स्पर्धेला यंदा २८ वर्षे पूर्ण होत आहेत.

ठळक मुद्दे२८ वर्षांपासून सुरू आहे पत्रकारिता पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या गेलेल्या पत्रकारितेतील विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या पत्रकारांचा गौरव करण्यासाठी १९८८ साली लोकमतने सुरू केलेल्या पत्रकारिता पुरस्कार स्पर्धेला यंदा २८ वर्षे पूर्ण होत आहेत. केवळ राज्यच नव्हे तर संपूर्ण देशात विखुरलेल्या मराठी पत्रकारांचा गौरव करण्याचा घेतलेला वसा लोकमतने निष्ठेने पाळला आहे. नागपूरमध्ये या पुरस्कारांचे आज संध्याकाळी वितरण केले जाणार आहे. या कार्यक्रमास ज्येष्ठ संपादक कुमार केतकर व ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या पुरस्कारांच्या निमित्ताने ज्यांच्या नावे हा पुरस्कार दिला जातो आहे, त्या पां.वा. गाडगीळ व म.य. दळवी या दोन ज्येष्ठ संपादकांचा अल्प परिचय देत आहोत.लोकमतचे प्रथम संपादक पां.वा. गाडगीळएक व्यासंगी संपादक म्हणून पां.वा. गाडगीळ यांची ओळख साऱ्या महाराष्ट्राला आहे. त्यांचे पूर्ण नाव पांडुरंग वासुदेव गाडगीळ. पण ते पां.वा. गाडगीळ म्हणूनच ख्यातनाम होते. त्यांचा जन्म कुरुंदवाड येथे ३ एप्रिल १८९९ मध्ये झाला. लोकमान्य टिळकांवर त्यांची अपार श्रद्धा होती. त्यांच्या प्रेरणेने त्यांनी सत्याग्रहात भाग घेऊन तुरुंगवासही भोगला होता. १९२० केसरीमध्ये मुद्रण शोधकाच्या कामापासून गाडगीळांनी सुरुवात केली. तात्यासाहेब केळकर यांच्या सानिध्यात त्यांनी पत्रकारितेचे धडे गिरविले. पुढील काळात ते महाराष्ट्रातील एक ख्यातनाम संपादक आणि विचारवंत म्हणून परिचित झाले. लोकमान्य, लोकमित्र, नवशक्ती या दैनिकांचे संपादक म्हणून त्यांची कारकीर्द अत्यंत गाजली. नागपूरला १५ डिसेंबर १९७१ मध्ये लोकमत सुरू झाल्यानंतर लोकमतच्या संपादकीयपदाची धुरा गाडगीळ यांनी आपल्या शिरावर घेतली. लोकमतचे संपादक म्हणून त्यांनी विदर्भाच्या वृत्तपत्रसृष्टीत जे कार्य केले ते केवळ बेजोड म्हणावे लागेल. ते मार्क्सवादाचे गाढे अभ्यासक होते. नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वाचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांचे १८ एप्रिल १९८७ रोजी वयाच्या ८८ व्या वर्षी मुंबईत निधन झाले.लोकमतचे द्वितीय संपादक म. य. दळवी उपाख्य बाबा दळवीपां.वा. गाडगीळ यांच्यानंतर लोकमतची धुरा यशस्वीपणे वाहून नेण्याचे मोलाचे कार्य पार पाडलेले मधुकर यशवंत दळवी उपाख्य बाबा हे लोकमतचे द्वितीय संपादक होते. नागपुरात लोकमतचे काम सात वर्षे सांभाळल्यानंतर औरंगाबाद येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या लोकमतच्या औरंगाबाद आवृत्तीची जडणघडण करण्यात बाबा दळवींचा सिंहाचा वाटा होता. कार्यकारी संपादक पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी मानद संपादक म्हणून अखेरपर्यंत काम केले.महाराष्ट्रातील समाजवादी चळवळीत वाढलेले बाबा दळवी हे आदर्श पत्रकारितेचा नमुना होते. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या वृत्तीने ते आयुष्यभर वागले. आताच्या रायगड जिल्ह्यात असलेल्या जंजिरा मुरूड या संस्थानात त्यांचा जन्म झाला होता. मुंबईच्या नवशक्ती व लोकसत्तामध्ये अनेक वर्ष उपसंपादक, मुख्य उपसंपादक अशा पदांवर काम केल्यानंतर १९७५ साली नागपुरातील लोकमतच्या दैनिकाचे कार्यकारी संपादक म्हणून बाबा दळवी यांनी सूत्रे हाती घेतली. महाराष्ट्रात त्यांच्या शिबिरातून तयार झालेले अनेक पत्रकार आजही आहेत. वयाच्या ७९ व्या वर्षी २७ मार्च १९९६ मध्ये त्यांचे औरंगाबाद येथे निधन झाले.या दोन थोर संपादकांच्या स्मृतीत लोकमतने पां.वा. गाडगीळ सामाजिक लेखन व म.य. दळवी शोधपत्रकारिता हे दोन पुरस्कार सुरू केले आहेत. 

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंट