शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

लोकमतचे प्रथम संपादक पत्रपंडित पद्मश्री पां.वा. गाडगीळ व म.य. दळवी स्मृती लोकमत पत्रकारिता पुरस्कारांचे आज वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 08:00 IST

लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या गेलेल्या पत्रकारितेतील विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या पत्रकारांचा गौरव करण्यासाठी १९८८ साली लोकमतने सुरू केलेल्या पत्रकारिता पुरस्कार स्पर्धेला यंदा २८ वर्षे पूर्ण होत आहेत.

ठळक मुद्दे२८ वर्षांपासून सुरू आहे पत्रकारिता पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या गेलेल्या पत्रकारितेतील विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या पत्रकारांचा गौरव करण्यासाठी १९८८ साली लोकमतने सुरू केलेल्या पत्रकारिता पुरस्कार स्पर्धेला यंदा २८ वर्षे पूर्ण होत आहेत. केवळ राज्यच नव्हे तर संपूर्ण देशात विखुरलेल्या मराठी पत्रकारांचा गौरव करण्याचा घेतलेला वसा लोकमतने निष्ठेने पाळला आहे. नागपूरमध्ये या पुरस्कारांचे आज संध्याकाळी वितरण केले जाणार आहे. या कार्यक्रमास ज्येष्ठ संपादक कुमार केतकर व ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या पुरस्कारांच्या निमित्ताने ज्यांच्या नावे हा पुरस्कार दिला जातो आहे, त्या पां.वा. गाडगीळ व म.य. दळवी या दोन ज्येष्ठ संपादकांचा अल्प परिचय देत आहोत.लोकमतचे प्रथम संपादक पां.वा. गाडगीळएक व्यासंगी संपादक म्हणून पां.वा. गाडगीळ यांची ओळख साऱ्या महाराष्ट्राला आहे. त्यांचे पूर्ण नाव पांडुरंग वासुदेव गाडगीळ. पण ते पां.वा. गाडगीळ म्हणूनच ख्यातनाम होते. त्यांचा जन्म कुरुंदवाड येथे ३ एप्रिल १८९९ मध्ये झाला. लोकमान्य टिळकांवर त्यांची अपार श्रद्धा होती. त्यांच्या प्रेरणेने त्यांनी सत्याग्रहात भाग घेऊन तुरुंगवासही भोगला होता. १९२० केसरीमध्ये मुद्रण शोधकाच्या कामापासून गाडगीळांनी सुरुवात केली. तात्यासाहेब केळकर यांच्या सानिध्यात त्यांनी पत्रकारितेचे धडे गिरविले. पुढील काळात ते महाराष्ट्रातील एक ख्यातनाम संपादक आणि विचारवंत म्हणून परिचित झाले. लोकमान्य, लोकमित्र, नवशक्ती या दैनिकांचे संपादक म्हणून त्यांची कारकीर्द अत्यंत गाजली. नागपूरला १५ डिसेंबर १९७१ मध्ये लोकमत सुरू झाल्यानंतर लोकमतच्या संपादकीयपदाची धुरा गाडगीळ यांनी आपल्या शिरावर घेतली. लोकमतचे संपादक म्हणून त्यांनी विदर्भाच्या वृत्तपत्रसृष्टीत जे कार्य केले ते केवळ बेजोड म्हणावे लागेल. ते मार्क्सवादाचे गाढे अभ्यासक होते. नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वाचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांचे १८ एप्रिल १९८७ रोजी वयाच्या ८८ व्या वर्षी मुंबईत निधन झाले.लोकमतचे द्वितीय संपादक म. य. दळवी उपाख्य बाबा दळवीपां.वा. गाडगीळ यांच्यानंतर लोकमतची धुरा यशस्वीपणे वाहून नेण्याचे मोलाचे कार्य पार पाडलेले मधुकर यशवंत दळवी उपाख्य बाबा हे लोकमतचे द्वितीय संपादक होते. नागपुरात लोकमतचे काम सात वर्षे सांभाळल्यानंतर औरंगाबाद येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या लोकमतच्या औरंगाबाद आवृत्तीची जडणघडण करण्यात बाबा दळवींचा सिंहाचा वाटा होता. कार्यकारी संपादक पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी मानद संपादक म्हणून अखेरपर्यंत काम केले.महाराष्ट्रातील समाजवादी चळवळीत वाढलेले बाबा दळवी हे आदर्श पत्रकारितेचा नमुना होते. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या वृत्तीने ते आयुष्यभर वागले. आताच्या रायगड जिल्ह्यात असलेल्या जंजिरा मुरूड या संस्थानात त्यांचा जन्म झाला होता. मुंबईच्या नवशक्ती व लोकसत्तामध्ये अनेक वर्ष उपसंपादक, मुख्य उपसंपादक अशा पदांवर काम केल्यानंतर १९७५ साली नागपुरातील लोकमतच्या दैनिकाचे कार्यकारी संपादक म्हणून बाबा दळवी यांनी सूत्रे हाती घेतली. महाराष्ट्रात त्यांच्या शिबिरातून तयार झालेले अनेक पत्रकार आजही आहेत. वयाच्या ७९ व्या वर्षी २७ मार्च १९९६ मध्ये त्यांचे औरंगाबाद येथे निधन झाले.या दोन थोर संपादकांच्या स्मृतीत लोकमतने पां.वा. गाडगीळ सामाजिक लेखन व म.य. दळवी शोधपत्रकारिता हे दोन पुरस्कार सुरू केले आहेत. 

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंट