शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

गाडी बुला रही हैं... लोकवाहिनीतून वर्षभरात तब्बल ६४८ कोटी नागरिकांचा प्रवास

By नरेश डोंगरे | Updated: March 19, 2024 20:16 IST

गतवर्षीच्या तुलनेत ५२ कोटी प्रवाशांची भर

नरेश डोंगरे, नागपूर : देशाची लोकवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय रेल्वेने यंदा प्रवासी वाहतूकीचा नवा रेकॉर्ड केला आहे. अमिर-गरिब अशा सर्वच जणांना सामावून घेणाऱ्या रेल्वेने यंदा ६४८ कोटी प्रवाशांना देशभरातील विविध ठिकाणी प्रवास घडवून आणला आहे.

श्रीमंत - गरिब असा कलाही भेदभाव न करता भारतीय रेल्वे प्रत्येकाला त्याच्या ईच्छेनुसार पाहिजे त्या ठिकाणी प्रवास घडविते. प्रत्येकाच्या आर्थिक स्तरानुसार जनरलपासून एसीपर्यंत प्रवासाची व्यवस्था असल्याने श्रीमंत, अतिश्रीमंत आणि गरिबातील गरिब व्यक्ती एकाच वेळी एकाच रेल्वेगाडीतून प्रवास करताना दिसतात. म्हणूनच रेल्वेला भारताची लोकवाहिनी म्हणून ओळखले जाते. कोरोना काळात लोकहित डोळ्यासमोर ठेवून अनेक रेल्वेगाड्या बंद करण्यात आल्या होत्या. मात्र, कोरोनाचा संसर्गाचा धोका संपताच रेल्वेने पुन्हा नव्या दमाने भारतीय प्रवाशांना सेवा देणे सुरू केले आहे. नागरिकही प्रवासाची पहिली पसंती रेल्वेलाच देत आहेत. वर्ष २०२२-२३ ला भारताच्या कानाकोपऱ्यातून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमधून ५९६ कोटी प्रवाशांनी प्रवास केला होता. आता यंदाच्या २०२३-२४ या वर्षांत १५ मार्चपर्यंत एकूण ६४८ कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. अर्थात गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रवाशांचा हा आकडा ५२ कोटींनी जास्त आहे. यावरून रेल्वेच्या प्रवासाला नागरिक कशी पसंती दर्शवितात, त्याचा प्रत्यय यावा.

नागपूर विभागातून ४.४०कोटी प्रवासी

नागपूर विभागातून वर्षभरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ४ कोटी, ४० लाख, एवढी आहे. मध्य रेल्वेचा नागपूर विभाग मध्यप्रदेशातील शिवनी , पांढुर्णा पर्यंत विस्तारला आहे. या विभागातून रोज सरासरी १ लाख, ३१ हजार प्रवासी रेल्वेने प्रवास करतात.

नागपुरातून २.१७ कोटी प्रवाशीनागपूर हे देशाचे हृदयस्थळ आहे. येथून देशाच्या चारही दिशांना रेल्वेगाड्या जातात आणि येतात. अशा या नागपूर स्थानकावरून एप्रिल २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या ११ महिन्यात २ कोटी, १७ लाख, ३७ हजार, ५५२ प्रवाशांनी प्रवास केला आहे. यावर्षीच्या एकट्या फेब्रुवारी महिन्यात १८ लाख, ९९ हजार, ८९७ नागरिकांनी प्रवास केला. नागपूरला मुख्य रेल्वेस्थानक आणि अजनी रेल्वे स्थानक ही दोन मोठी रेल्वे स्थानकं आहेत. या दोन्ही स्थानकांवरून दररोज सरासरी ६५,५०० प्रवासी प्रवास करतात.

टॅग्स :nagpurनागपूरrailwayरेल्वेpassengerप्रवासी