शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

लोकसभा नागपूर १९९१; गड आला पण सिंह गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 10:19 IST

१९९१ च्या लोकसभा निवडणुकांच्या कालावधीत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाल्याने कॉंग्रेससह देशात शोककळा होती. एका प्रकारे ‘गड आला पण सिंह गेला’ अशीच कॉंग्रेसनेत्यांची भावना होती.

 योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: १९९१ च्या लोकसभा निवडणुका या नागपूर मतदारसंघासाठी नाट्यमय पद्धतीच्याच ठरल्या. काँग्रेसचे विद्यमान खासदार भगवान श्रीरामाच्या नावावर ऐन निवडणुकांच्या अगोदर भाजपात येतात काय आणि कधी न अनुभवलेली अस्वस्थता काँग्रेसचे खेम्यातील नेते अनुभवतात काय. मात्र अशा स्थितीतही लोकसभेचा कुठलाही अनुभव नसलेल्या दत्ता मेघे यांच्यावर कॉंग्रेसने विश्वास टाकला आणि ४६ उमेदवारांच्या भाऊगर्दीत त्यांनी यश संपादित करून नागपूरचा किल्ला राखला. मात्र निवडणुकांच्या कालावधीत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाल्याने कॉंग्रेससह देशात शोककळा होती. एका प्रकारे ‘गड आला पण सिंह गेला’ अशीच कॉंग्रेसनेत्यांची भावना होती.१९९१ च्या निवडणुकांच्या अगोदर मंडल आयोगामुळे देशाचे सामाजिक व राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. तर दुसरीकडे रामनामाचा ‘कमंडलू’ हातात घेऊन भाजपानेदेखील हिंदुत्वाच्या नावाखाली वातावरणनिर्मिती करण्यास सुरुवात केली होती. नागपुरातून अनेक हालचाली नियंत्रित होत होत्या. अशा स्थितीत कॉंग्रेसचे विद्यमान खासदार बनवारीलाल पुरोहित यांनी राममंदिराचे समर्थन करत भाजपप्रवेश केला. यामुळे राष्ट्रीय पातळीवर खळबळ उडाली होती. अशा स्थितीत कॉंग्रेससाठी तर नागपूरची जागा जिंकणे प्रतिष्ठेचाच विषय झाला होता. मात्र उमेदवारी द्यायची कुणाला हा मोठा प्रश्न होता. अनेकांची नावे समोर आली. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी पुढाकार घेतला व एकदाही लोकसभेची निवडणूक न लढविलेले दत्ता मेघे यांना पुरोहित यांच्याविरोधात उभे केले. खोरिपातर्फे मो.इकबाल अहमद तर बसपातर्फे सिद्धार्थ पाटील हे रिंगणात उभे होते. याशिवाय जोगेंद्र कवाडे, मोहन कारेमोरे यांच्यासोबत ३६ अपक्षदेखील उभे ठाकले. नागपूरच्या लोकसभा मतदारसंघात ४६ उमेदवारांनी एकमेकांना आव्हान दिले होते. प्रचार एकदम शिगेला पोहोचला होता. विदर्भात भाजपाकडे पारडे झुकले आहे, असा अंदाज राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत होते. २३ मे रोजी नागपुरात मतदान होणार होते.मात्र २० मे रोजी देशाने काळा दिवस अनुभवला. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची तामिळनाडूतील श्रीपेरुम्बुदूर येथे मानवी बॉम्बच्या माध्यमातून निर्घृण हत्या करण्यात आली. यामुळे केवळ कॉंग्रेस पक्षच नव्हे तर संपूर्ण देशाला हादरा बसला. निवडणूक अयोगाने मतदानाच्या तारखा ‘पोस्टपोन’ केल्या. अखेर १२ जून रोजी नागपुरात मतदान झाले. मतदानाची टक्केवारी ही अवघी ४८ टक्क्यांच्या जवळपास होती.राजीव गांधी यांच्या हत्येनंतर जनतेची सहानभूती काँग्रेसला मिळाली व दत्ता मेघे निवडून आले. मेघे यांना ४५.९७ टक्के मतं मिळाली. तर पुरोहित यांच्या पदरी ३३.४५ टक्के मतं आली. मो.इक्बाल अहमद यांना १३.६२ टक्के तर सिद्धार्थ पाटील यांना २.०३ टक्के मतं प्राप्त झाली. कवाडे यांना १.०३ टक्के मतं मिळाली. उर्वरित ४१ मतदारांना मिळून ३.६३ टक्के मतं मिळाली. २७ उमेदवारांना पाचशेहून कमी मतं प्राप्त झाली होती.

‘ती’ राजीव गांधींची अखेरची सभा ठरलीदत्ता मेघे यांच्या प्रचारासाठी ८ मे १९९१ रोजी कस्तूरचंद पार्क येथे राजीव गांधी यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. रात्री ९ च्या सुमारास ते नागपूर विमानतळावर पोहोचले होते व त्यानंतर चक्क खुल्या जीपमधून सर्वांचे स्वागत स्वीकारत ते बाहेर पडले. रस्त्याच्या दुतर्फा लोकांची गर्दी झाली होती. आपल्या भाषणात राजीव गांधी यांनी अतिशय शांतपणे भाजप व जनता दलावर प्रहार केला होता. विदर्भाला वैधानिक विकास मंडळ देऊ, असे आश्वासनदेखील त्यांनी दिले होते. रात्री उशीर झाला होता, मात्र तरीदेखील लोकांमधील उत्साह पाहून ‘मै आपके लिए और पाच मिनट ज्यादा बोलुंगा’ असे ते म्हणाले होते. त्यांच्या सभेनंतरदेखील नागपुरात ‘राजीव’मय वातावरण होते. मात्र हे राजीव गांधी यांचे नागपुरातील अखेरचे भाषण ठरेल याची स्वप्नातदेखील कुणी कल्पना केली नव्हती.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRajiv Gandhiराजीव गांधी