शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

Lok Sabha Election 2019; ६७ वर्षांत नागपुरात केवळ १९ महिला उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 15:49 IST

प्रत्येकच पक्षाकडून महिला सबलीकरण व सक्षमीकरणासंदर्भात मोठेमोठे दावे करण्यात येत असले तरी, प्रत्यक्षात राजकारणात महिलांना प्रतिनिधित्व देण्याबाबत सर्वच ठिकाणी उदासीनता आहे.

ठळक मुद्देमहिला उमेदवारांबाबत पक्षांची उदासीनताचमहिलांची टक्केवारी अवघी ६ टक्के

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रत्येकच पक्षाकडून महिला सबलीकरण व सक्षमीकरणासंदर्भात मोठेमोठे दावे करण्यात येत असले तरी, प्रत्यक्षात राजकारणात महिलांना प्रतिनिधित्व देण्याबाबत सर्वच ठिकाणी उदासीनता आहे. मागील ६७ वर्षांत नागपुरात केवळ १९ महिला उमेदवार निवडणुकांच्या रिंगणात उतरल्या. यातही अनसूयाबाई काळे वगळता एकाही महिला उमेदवाराला लोकसभेत पोहोचण्यात यश आले नाही.१९५२ ते २०१४ या कालावधीत नागपूर मतदारसंघात एकूण १६ निवडणुका झाल्या व यात ३०२ उमेदवार उभे राहिले. मात्र यापैकी महिला उमेदवारांची संख्या ही केवळ १९ म्हणजे अगदी ६.२९ टक्के इतकीच होती. १९५२ व १९५७ साली लढण्यात आलेल्या पहिल्या दोन निवडणुकांत काँग्रेसने अनसूयाबाई काळे यांनाच तिकीट दिले होते व मतदारांनीदेखील महिलाशक्तीवर विश्वास टाकला. त्या सलग दोनदा नागपूर मतदारसंघातून निवडून गेल्या होत्या. त्यानंतर पुढील चार निवडणुकांत नागपुरातून एकही महिला निवडणुकीत उभी झाली नाही. त्यानंतर १९८० व १९८४ साली प्रत्येकी एक अपक्ष, १९८९ साली चार अपक्ष महिलांनी भाग्य आजमाविले. १९९६ साली काँग्रेसने कुंदाताई विजयकर यांना उमेदवारी दिली, मात्र त्यांना विजय मिळू शकला नाही. २९.८३ मतांसह त्या दुसऱ्या स्थानी होत्या.१९९८, २००४ साली परत प्रत्येकी एका अपक्ष महिला निवडणुकीच्या रिंगणात होती. २००९ साली बहुजन रिपब्लिकन एकता मंचतर्फे अ‍ॅड.सुलेखा कुंभारे यांनी अर्ज भरला. याशिवाय प्रतिभा खापर्डे यांनी अपक्ष म्हणून आव्हान दिले. मात्र या दोघींनाही अनुक्रमे ०.१३ व ०.१२ टक्के मतेच प्राप्त झाली.२०१४ सालच्या निवडणूकीत ‘आप’च्या अंजली दमानिया यांची चांगलीच हवा निर्माण झाली होती. मात्र ही हवा मतांमध्ये परिवर्तित होऊ शकली नाही. त्यांना ६.३९ टक्के मतांवरच समाधान मानावे लागले. याशिवाय इतर तीन अपक्ष महिलांनादेखील फारच कमी मतं मिळाली.काँग्रेसने दिली महिलांना तीनदा उमेदवारी४१६ निवडणुकांत कॉंग्रेस सोडून इतर प्रस्थापित पक्षांनी महिलांना उमेदवारी देण्यात हात आखडताच घेतल्याचे चित्र दिसून आले. कॉंग्रेसने १९५२,१९५७ व १९९६ साली महिलांना उमेदवारी दिली. ‘आप’ने २०१४ साली महिलेला उमेदवारी दिली. तर बहुजन रिपब्लिकन एकता मंचतर्फे २००९ साली एक महिला उमेदवार उभी झाली. उर्वरित १४ महिलांनी अपक्ष म्हणूनच निवडणूक लढविली. केवळ एक अपवाद वगळता एकाही अपक्ष महिला उमेदवाराला १ टक्क्यांहून अधिक मते मिळविता आली नाही. नोंदणीकृत पक्षांनी महिलांना दिलेल्या उमेदवारीची एकूण उमेदवारांच्या तुलनेतील टक्केवारी ही अवघी १.६६ टक्के ठरली. १९९१ व २०१४ साली सर्वाधिक चार महिला उमेदवार रिंगणात होत्या.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक