शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

Lok Sabha Election 2019; ६७ वर्षांत नागपुरात केवळ १९ महिला उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 15:49 IST

प्रत्येकच पक्षाकडून महिला सबलीकरण व सक्षमीकरणासंदर्भात मोठेमोठे दावे करण्यात येत असले तरी, प्रत्यक्षात राजकारणात महिलांना प्रतिनिधित्व देण्याबाबत सर्वच ठिकाणी उदासीनता आहे.

ठळक मुद्देमहिला उमेदवारांबाबत पक्षांची उदासीनताचमहिलांची टक्केवारी अवघी ६ टक्के

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रत्येकच पक्षाकडून महिला सबलीकरण व सक्षमीकरणासंदर्भात मोठेमोठे दावे करण्यात येत असले तरी, प्रत्यक्षात राजकारणात महिलांना प्रतिनिधित्व देण्याबाबत सर्वच ठिकाणी उदासीनता आहे. मागील ६७ वर्षांत नागपुरात केवळ १९ महिला उमेदवार निवडणुकांच्या रिंगणात उतरल्या. यातही अनसूयाबाई काळे वगळता एकाही महिला उमेदवाराला लोकसभेत पोहोचण्यात यश आले नाही.१९५२ ते २०१४ या कालावधीत नागपूर मतदारसंघात एकूण १६ निवडणुका झाल्या व यात ३०२ उमेदवार उभे राहिले. मात्र यापैकी महिला उमेदवारांची संख्या ही केवळ १९ म्हणजे अगदी ६.२९ टक्के इतकीच होती. १९५२ व १९५७ साली लढण्यात आलेल्या पहिल्या दोन निवडणुकांत काँग्रेसने अनसूयाबाई काळे यांनाच तिकीट दिले होते व मतदारांनीदेखील महिलाशक्तीवर विश्वास टाकला. त्या सलग दोनदा नागपूर मतदारसंघातून निवडून गेल्या होत्या. त्यानंतर पुढील चार निवडणुकांत नागपुरातून एकही महिला निवडणुकीत उभी झाली नाही. त्यानंतर १९८० व १९८४ साली प्रत्येकी एक अपक्ष, १९८९ साली चार अपक्ष महिलांनी भाग्य आजमाविले. १९९६ साली काँग्रेसने कुंदाताई विजयकर यांना उमेदवारी दिली, मात्र त्यांना विजय मिळू शकला नाही. २९.८३ मतांसह त्या दुसऱ्या स्थानी होत्या.१९९८, २००४ साली परत प्रत्येकी एका अपक्ष महिला निवडणुकीच्या रिंगणात होती. २००९ साली बहुजन रिपब्लिकन एकता मंचतर्फे अ‍ॅड.सुलेखा कुंभारे यांनी अर्ज भरला. याशिवाय प्रतिभा खापर्डे यांनी अपक्ष म्हणून आव्हान दिले. मात्र या दोघींनाही अनुक्रमे ०.१३ व ०.१२ टक्के मतेच प्राप्त झाली.२०१४ सालच्या निवडणूकीत ‘आप’च्या अंजली दमानिया यांची चांगलीच हवा निर्माण झाली होती. मात्र ही हवा मतांमध्ये परिवर्तित होऊ शकली नाही. त्यांना ६.३९ टक्के मतांवरच समाधान मानावे लागले. याशिवाय इतर तीन अपक्ष महिलांनादेखील फारच कमी मतं मिळाली.काँग्रेसने दिली महिलांना तीनदा उमेदवारी४१६ निवडणुकांत कॉंग्रेस सोडून इतर प्रस्थापित पक्षांनी महिलांना उमेदवारी देण्यात हात आखडताच घेतल्याचे चित्र दिसून आले. कॉंग्रेसने १९५२,१९५७ व १९९६ साली महिलांना उमेदवारी दिली. ‘आप’ने २०१४ साली महिलेला उमेदवारी दिली. तर बहुजन रिपब्लिकन एकता मंचतर्फे २००९ साली एक महिला उमेदवार उभी झाली. उर्वरित १४ महिलांनी अपक्ष म्हणूनच निवडणूक लढविली. केवळ एक अपवाद वगळता एकाही अपक्ष महिला उमेदवाराला १ टक्क्यांहून अधिक मते मिळविता आली नाही. नोंदणीकृत पक्षांनी महिलांना दिलेल्या उमेदवारीची एकूण उमेदवारांच्या तुलनेतील टक्केवारी ही अवघी १.६६ टक्के ठरली. १९९१ व २०१४ साली सर्वाधिक चार महिला उमेदवार रिंगणात होत्या.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक