शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

Lok Sabha Election 2019; रामटेक गडावर पहिला झेंडा काँग्रेसचाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2019 11:03 AM

रामटेकच्या गडावर सध्या भगवा असला तरी या मतदार संघातील मतदारांनी काँग्रेसवर भरपूर प्रेम केले आहे. आजवर या मतदार संघात झालेल्या १७ निवडणुकीत १२ वेळा काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे.

ठळक मुद्देआतापर्यंत १२ खासदार

जितेंद्र ढवळे।लोकमत न्यूज नेटवर्करामटेक : रामटेकच्या गडावर सध्या भगवा असला तरी या मतदार संघातील मतदारांनी काँग्रेसवर भरपूर प्रेम केले आहे. आजवर या मतदार संघात झालेल्या १७ निवडणुकीत १२ वेळा काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे. गडावर विजयाचा पहिला झेंडा रोवण्याचा मानही काँग्रेसलाच जातो. विशेषत: देशातील राजकीय परिस्थिती विचारात घेता या मतदार संघातील मतदारांनी कौल दिल्याचे आजवरच्या निकालावरून स्पष्ट होते. १९७४ मध्ये काँग्रेसला रामटेकमध्ये पहिला धक्का बसला मात्र त्यानंतर पुन्हा सावरले.स्वतंत्र मतदार संघ म्हणून अस्तित्वात आलेल्या रामटेकमध्ये पहिली निवडणूक १९५७ मध्ये झाली. या निवडणुकीत तीन उमेदवार रिंगणात होते. यात काँग्रेसचे कृष्णराव देशमुख यांनी बाजी मारली. त्यांचा सामना अपक्ष उमेदवार कृष्णराव यावलकर यांच्यासोबत होता. देशमुख यांना १ लाख ६६ हजार १२३ तर यावलकर यांना १ लाख २ हजार ४५० मते मिळाली. १९६२ मध्ये माधवराव पाटील यांच्यावर काँग्रेसची धुरा होती. पाटील १ लाख ४६ हजार ७०६ मते घेत विजयी झाले. त्यांनी शेकापचे बी. टी. भोसले यांचा ४१ हजार ३०२ मतांनी पराभव केला. भोेसले यांना १ लाख ५ हजार ४०४ मते मिळाली.१९६७ च्या निवडणुकीत काँग्रेसचे अमृत सोनार १ लाख ५ हजार ३४९ मतांनी विजयी झाले. सोनार यांना १ लाख ८३ हजार २५८ तर त्यांचे प्रतिस्पर्धी आर.एन.पाटील यांना ७७ हजार ९०९ मते मिळाली.१९७१ काँग्रेससाठी देशात धोक्याचे वर्ष होते. याही वेळी सोनार यांना कॉँग्रेसने संधी दिली. सोनार यांनी २ लाख ३१ हजार ७४२ मतांनी विजयी होत रेकॉर्ड ब्रेक केला. या निवडणुकीत सोनार यांना २ लाख ८० हजार ५४ तर प्रतिस्पर्धी एफबीएलचे आनंदराव कळमकर यांना ४८ हजार ३१२ मते मिळाली.आणीबाणीनंतर १९७४ मध्ये रामटेकमध्ये निवडणूक झाली. नाग विदर्भ समितीचे उमेदवार राम हेडाऊ विजयी झाले. हेडाऊ यांना २,१९,८६० तर काँग्रेसचे आनंदराव कळमकर यांना ८८,७३२ मते मिळाली. यानंतर १९७७ च्या निवडणुकीत जतिराम बर्वे यांनी काँग्रेसचा गड पुन्हा ताब्यात घेतला. बर्वे यांनी अपक्ष उमेदवार राम हेडाऊ यांचा ४२ हजार ९४९ मतांनी पराभव केला. बर्वे यांना १ लाख ९६ हजार ९७७ तर हेडाऊ यांना १ लाख ५४ हजार २८ मते मिळाली. १९८० मध्ये बर्वे पुन्हा एकदा २ लाख १४ हजार ७६३ इतक्या विक्रमी मतांनी विजयी झाले. त्यांनी जनता पक्षाचे राजेंद्रबाबू देशमुख यांचा पराभव केला. देशमुख यांना ५९ हजार १९४ तर बर्वे यांना २ लाख ७३ हजार ९५७ मते मिळाली.काँग्रेस उमेदवारांचा सतत विजय. लाखांची आघाडी. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने राष्ट्रीय नेते पी.व्ही.नरसिंहराव यांना १९८५ मध्ये रामटेकच्या मैदानात उतरविले. राव यांनाही रामटेकच्या मतदारांनी डोक्यावर घेत १ लाख ८५ हजार ९७२ मतांनी विजयी केले. राव यांची टक्कर समाजवादी काँग्रेसचे शंकरराव गेडाम यांच्याशी झाली. गेडाम यांना १ लाख ४ हजार ९३३ तर राव यांना २ लाख ९० हजार ९०५ मते मिळाली. १९८९ मध्येही राव पुन्हा काँग्रेसचा झेंडा घेऊन गडावर स्वार होण्यासाठी निघाले. यावेळी त्यांच्या वाटेत काटे होते. त्यांची जनता दलाचे पांडुरंग हजारे यांच्याशी लढत झाली. राव ३४ हजार ४७० मतांनी जिंकले. हजारे यांना २ लाख २३ हजार ३३० तर राव यांना २ लाख ५७ हजार ८०० मते मिळाली. १९९१ मध्ये राव परत गेल्यानंतर काँग्रेसने तेजसिंहराव भोसले यांना उमेदवारी दिली. भोसले यांनी भाजपचे पांडुरंग हजारे यांचा १ लाख ३७ हजार ९५४ मतांनी पराभव केला. भोसले यांना २ लाख ४० हजार ४३७ तर हजारे यांना १ लाख २ हजार ४८३ मते मिळाली. १९९६ मध्ये दत्ता मेघे रामटेकमध्ये आले. मेघे यांनी मतदार संघ बदलल्याने त्यांची राजकीय कोंडी करण्यासाठी ३७ उमेदवारांनी दंड थोपटले होते. मेघे यांनी हा चक्रव्यूह भेदत गडावर काँग्रेसचा झेंडा फडकविला. त्यांनी सेनेचे प्रकाश जाधव यांचा पराभव केला. जाधव यांना १ लाख ८१ हजार ४६६ तर मेघे यांना २ लाख ७ हजार १८८ मते मिळाली.१९९८ मध्ये राणी चित्रलेखा भोसले यांनी सेनेचे अशोक गुजर यांचा पराभव केला. चित्रलेखा यांना ३ लाख २५ हजार ८८५ तर गुजर यांना २ लाख ५८ हजार ८४७ मते मिळाली. मात्र १९९९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे पानिपत झाले. काँग्रेसचे बनवारीलाल पुरोहित यांचा सेनेचे सुबोध मोहिते यांनी ११ हजार ६८९ मतांनी पराभव केला. मोहिते यांना २ लाख ४२ हजार ४५४ तर पुरोहित यांना २ लाख ३० हजार ७६५ मते मिळाली.मोहिते यांची कोंडी करण्यासाठी २००४ मध्ये कॉँग्रेसने श्रीकांत जिचकार यांना उमेदवारी दिली. मात्र यात ते यशस्वी होऊ शकले नाही. जिचकार यांना २ लाख ६२ हजार ५५० तर मोहिते यांना २ लाख ७६ हजार ५९८ मते मिळाली. मोहिते यांना रामटेकमध्ये दुसरी टर्म मिळाली. मात्र दोन वर्षात राज्याच्या राजकारणात नारायण राणे यांनी भूकंप केला. मोहिते राणेसोबत काँग्रेसमध्ये आले. रामटेकमध्ये २००७ मध्ये पोटनिवडणूक झाली. यावेळी मोहिते काँग्रेसचे तर प्रकाश जाधव सेनेचे उमेदवार होते. जाधव यांनी ३२ हजार ५७२ मतांनी मोहिते यांचा पराभव केला. जाधव यांना २ लाख ३१ हजार २४१ तर मोहिते यांना १ लाख ९८ हजार ६६९ मते मिळाली. गडावर भगवामय वातावरण असताना २००९ मध्ये काँग्रेसने मुकुल वासनिक यांना रामटेकमधून लढविले. वासनिक सेनेचे कृपाल तुमाने यांना टक्कर देत विजयी झाले. वासनिक यांना ३ लाख ११ हजार ६१४ तर तुमाने यांना २ लाख ९४ हजार ९१३ मते मिळाली.२०१४ मध्ये काँग्रेसने पुन्हा एकदा वासनिक यांच्यावर विश्वास टाकला. मात्र मोदी लाटेत वासनिक हरले. सेनेचे कृपाल तुमाने यांनी वासनिक यांचा १ लाख ७५ हजार ७९१ मतांनी पराभव केला. तुमाने यांना ५ लाख १९ हजार ८९२ तर वासनिक यांना ३ लाख ४४ हजार १०१ मतावर समाधान मानावे लागले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकramtek-pcरामटेक