शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

Lok Sabha Election 2019; राफेलसोबतच समृद्धी महामार्गाचीही चौकशी करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 11:17 IST

राफेल हा देशातील सर्वात मोठा विमान खरेदी घोटाळा आहे. तब्बल ३६ हजार कोटीचा हा भ्रष्टाचार असून आमचे सरकार आल्यास राफेलसोबतच समृद्धी महामार्गाचीही चौकशी केली जाईल, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी येथे दिला.

ठळक मुद्देपृथ्वीराज चव्हाण यांचा इशाराभाजपचा पंतप्रधान होणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राफेल हा देशातील सर्वात मोठा विमान खरेदी घोटाळा आहे. तब्बल ३६ हजार कोटीचा हा भ्रष्टाचार असून आमचे सरकार आल्यास राफेलसोबतच समृद्धी महामार्गाचीही चौकशी केली जाईल, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी येथे दिला.दक्षिण नागपुरातील तिरंगा चौक येथे रविवारी रात्री काँग्रेसची जाहीर सभा झाली. यावेळी खासदार कुमार केतकर, माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले, माजी आमदार अशोक धवड, माजी खासदार गेव्हा आवारी, पीरिपाचे नेते जयदीप कवाडे, विशाल मुत्तेमवार, अतुल लोंढे प्रामुख्याने उपस्थित होते.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, पंतप्रधान मोदी हे त्यांनी पाच वर्षात काय केले ते सांगत नाहीत. मुद्यांवर किंवा जाहीरनाम्यावर बोलत नाही. विरोधी पक्षातील नेत्यांवर खालच्या पातळीवर वैयक्तिक टीका करीत आहे. नोटबंदी हा अविचारी निर्णय होता. तो देशातील सर्वात मोठा ‘मनिलाँड्रीगचा फ्रॉड’ असल्याचे भाजपचेच नेते अरुण शौरी यांनी सांगितले आहे. जीएसटी चांगला निर्णय होता परंतु तो किचकट करून ठेवला. २३ मे नंतर नरेंद्र मोदी हे देशाच्या पंतप्रधानपदावर दिसणार नाहीत. भाजपचा कुठलाच नेता पंतप्रधान होणार नाही, असा दावाही त्यांनी केला. प्रा. वसंत पुरके यांनीही भाजप सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले, या जगात डिजिटल करप्शन कुणी केले असेल तर ते नरेंद्र मोदी यांनी केले आहे. एक व्यक्ती बिनडोक निर्णय घेते. विज्ञान आणि मोदी यांचा काहीही संबंध नाही. राजीव गांधी यांचा जन्म झाला नसता तर नरेंद्र मोदी यांना कुत्र्यानेही हुंगले नसते, असे आक्षेपार्ह वक्तव्यही त्यांनी केले.

मोदींच्या उधळपट्टींमुळे अर्थव्यवस्था डबघाईस : केतकरनरेंद्र मोदी सरकारने गेल्या पाच वर्षात रिझर्व्ह बँकेशी सातत्याने खोटा व्यवहार केला. त्यांच्यामुळे रघुराम राजन यांना जावे लागले. ऊर्जित पटेल यांनी राजीनामा दिला. पाच वर्षात मोदींनी बेफाम उधळपट्टी केली. स्वत:च्या जाहिरातीवर सर्वाधिक उधळपट्टी केली. त्यामुळेच देशाची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. कर्ज घेतल्याशिवाय या देशाचा व्यवहारच चालू शकणार नाही, अशी परिस्थिती असल्याची टीका खासदार कुमार केतकर यांनी केली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019