शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

टोळधाडीवर मिळू शकते नियंत्रण : शेतात रात्री किंवा पहाटे फवारणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 12:44 AM

जिल्ह्यात काही भागातील पिकावर टोळधाडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. टोळधाडीचा धोका लक्षात घेता शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. टोळ उशिरा रात्री किंवा पहाटे विश्रांतीसाठी मोठ्या संख्येने झाडाझुडपांवर जमा झाले असतात. या कालावधीत शेतकऱ्यांनी फवारणी केल्यास नियंत्रण मिळवता येणे शक्य असल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाची शेतकऱ्यांना सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यात काही भागातील पिकावर टोळधाडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. टोळधाडीचा धोका लक्षात घेता शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. टोळ उशिरा रात्री किंवा पहाटे विश्रांतीसाठी मोठ्या संख्येने झाडाझुडपांवर जमा झाले असतात. या कालावधीत शेतकऱ्यांनी फवारणी केल्यास नियंत्रण मिळवता येणे शक्य असल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले आहे.टोळधाड मार्गातील सर्वप्रकारच्या हिरव्या पानांवर हल्ला करून संपवून टाकते. या कीटकांच्या थव्याची व्याप्ती १० किलोमीटर लांब व २ किलोमीटर रुंद इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे. या किडीचे थवे ताशी १२ ते १६ किलोमीटर इतक्या वेगाने उडतात. ही टोळधाड दिवसभर हवेच्या दिशेने उडत जाते. शेतकऱ्यांनी शेतात धूर करणे, ड्रम वाजवून आवाज करणे, फवारणी करणे अशी पावले उचलावीत, असे कृषी विभागाने सांगितले आहे.काटोलमध्ये ८० लिटर कीटकनाशकाची फवारणीसदर किडीच्या सामूहिक नियंत्रणासाठी ‘ट्रॅक्टर ऑपरेटेड स्प्रेयर’ व अग्निशमन दलाच्या बंबांनी ‘क्लारोपायरीफॉस’ या ८० लिटर कीटकनाशकाची फवारणी काटोल परिसरात करण्यात आली.हे उपाय कराशेताच्या आजूबाजूला मोठे चर खोदणेवाद्य वाजवून मोठ्याने आवाज करणेधोका असलेल्या शेतामध्ये मशाली पेटवून तसेच टायर जाळून धूर करणेफवारणी करणेअशी करा फवारणीटोळधाडीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निंबोळी आधारित कीटकनाशक ‘अझाडिरेक्टिन’ १५०० पीपीएम ३० मिली किंवा ५ टक्के निंबोळी अर्काची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. २० किलो गहू किंवा भाताच्या तुसामध्ये ‘फिप्रोनिल ५ एससी’ ३ मिली मिसळावे व त्याला शेतात ठिकठिकाणी ठेवावे. याकडे टोळ आकर्षित होतात व ते मरतात.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी