शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
6
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
7
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
8
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
9
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
10
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
12
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
13
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
14
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
15
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
16
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
17
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
18
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

लॉकडाऊनमुळे लाल मिरचीचे भाव चढेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 10:16 AM

यंदाच्या हंगामात लॉकडाऊनमध्ये मालवाहतूक बंद राहिल्याने कळमन्यात लाल मिरचीची आवक बंद होती. त्यामुळे गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा भाव वाढले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यंदाच्या हंगामात लॉकडाऊनमध्ये मालवाहतूक बंद राहिल्याने कळमन्यात लाल मिरचीची आवक बंद होती. त्यामुळे गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा भाव वाढले आहेत. प्रत्येक राज्यातून आवक आणि दर्जानुसार कळमन्यात भाव १२० ते १५५ तर किरकोळमध्ये १८० ते १९० रुपयांपर्यंत विकली जात आहे. लॉकडाऊनमुळे यंदा लाल मिरचीचे भाव चढेच आहेत.दैनंदिन आहारात तिखटाचे महत्त्व असून स्वयंपाकघरातील महत्त्वपूर्ण भाग आहे. जेवण झणझणीत आणि चविष्ट होण्यासाठी मसाल्यासह तिखटाची गरज असते. महाराष्ट्रात उन्हाळ्यात महिलातर्फे लाल मिरची खरेदी करून वर्षभराचे तिखट तयार करण्याची परंपरा आहे. पण यावर्षी अनेकांनी मिरची खरेदी केलीच नाही. लॉकडाऊनच्या काळात प्लास्टिकबंद तिखट खरेदी करून स्वयंपाकाची गरज भागविली. लॉकडाऊनमुळे सर्व राज्यांच्या सीमा बंद असल्याने प्रारंभीच्या काळात आवक झालीच नाही. लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यानंतर मालवाहतुकीची परवानगी घेऊन आवक सुरू झाली.कळमना बाजाराचे अडतिये आणि व्यापारी संजय वाधवानी म्हणाले, कळमना बाजार आठवड्यात केवळ सोमवारी एक दिवस भरतो. गेल्या सोमवारी बाजारात जवळपास १५ हजार पोत्यांची आवक झाली. प्रत्येक पोते हे ३० ते ४० किलोचे असते. सर्वाधिक आवक आंध्र प्रदेशातून असते. पण यंदा आवक कमीच आहे. येथील शेतकऱ्यांनी मिरची कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवली आहे. या राज्यात जवळपास ६० लाख पोती कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवली आहेत. लॉकडाऊन पूर्णपणे हटल्यानंतर आवक वाढेल, त्यानंतरच भाव कमी होतील. पुढील सोमवारी आवकीनंतरच भाव ठरेल.वाधवानी म्हणाले, कळमन्यात चांगल्या प्रतीच्या मिरचीचे भाव १४० ते १५५ रुपयांदरम्यान आहेत. गेल्यावर्षी भाव १२० ते १३५ रुपयांदरम्यान होते. मध्यंतरी गुंटूर मिरचीचे भाव १६० ते १६५ रुपयांवर पोहोचले होते. पण आता कमी झाले आहेत. महाराष्ट्रातील सिरोंचा मिरचीचे भाव १२० ते १३५, राजुरा मिरची १३० ते १५० रुपये भाव आहेत. किरकोळमध्ये जास्त भावात विक्री होत आहे. गेल्या काही वर्षांपासून कळमन्यात मिरचीची आवक कमी झाली आहे. ८ ते १० वर्षांपूर्वी आठवड्यात ७० ते ८० हजार पोत्यांची आवक व्हायची, पण आता १५ हजार पोत्यांपर्यंत कमी झाली आहे. व्यापाऱ्यांनी राज्याराज्यातून परस्पर खरेदी सुरू केल्याने कळमन्यातील व्यापार कमी झाला आहे. मिरचीची निर्यात मलेशिया, चीन, श्रीलंका, थायलँड, सौदी अरब आणि अन्य देशात होते.लाल मिरचीचे सर्वाधिक उत्पादन आंध्र प्रदेशात तर त्या खालोखाल मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात आणि महाराष्ट्रात घेतले जाते. आंध्र प्रदेशात मिरचीचे कोल्ड स्टोरेज सर्वात जास्त आहेत. प्रत्येक राज्यात उत्पादन होणाऱ्या लाल मिरचीची चव वेगवेगळी आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील मिरचीचा रंग लाल व चमकदार, मध्यम तिखट असते. याशिवाय खम्मम विभागात उत्पादित होणारी तेजा मिरची जगभर प्रसिद्ध आहे. ही मिरची जास्त तिखट असलेली ओळखली जाते. तिखट खाणाऱ्या लोकांची या मिरचीला मागणी असते. कर्नाटकातील बेडगी भागात उत्पादन होणारी मिरचीचा रंग भडक, सौम्य तिखट असते. त्यामुळे या मिरचीला तारांकित हॉटेलमध्ये चांगली मागणी असते.

 

टॅग्स :vegetableभाज्याbusinessव्यवसाय