शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

सिकलसेल व थॅलेसेमिया मुक्त भारत करू या : राज्यपाल पुरोहित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 23:39 IST

वधू-वर दोघेही थॅलेसेमियाचे वाहक असतील, तर त्यांची अपत्येही 'थॅलेसेमियाग्रस्त' जन्मतात. त्यामुळे लग्नापूर्वी कुंडल्या पाहण्यासोबतच थॅलेसेमियाची तपासणी करा, जेणेकरून हा आजार पुढील पिढीत संक्रमित होणार नाही.

ठळक मुद्दे‘बोनमॅरो ट्रान्सप्लांट एचएलए मॅचिंग’ शिबिराचे उद्घाटन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : वधू-वर दोघेही थॅलेसेमियाचे वाहक असतील, तर त्यांची अपत्येही 'थॅलेसेमियाग्रस्त' जन्मतात. त्यामुळे लग्नापूर्वी कुंडल्या पाहण्यासोबतच थॅलेसेमियाची तपासणी करा, जेणेकरून हा आजार पुढील पिढीत संक्रमित होणार नाही. तसेच सिकलसेलबाबतही आहे. यामुळे या आजाराविषयी जनजागृतीचे आंदोलन हाती घेऊ या, सिकलसेल व थॅलेसेमिया मुक्त भारत करू या, असे आवाहन तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी येथे केले.थॅलेसेमिया व सिकलसेल सेंटर, जरीपटकाच्यावतीने बोनमॅरो ट्रान्सप्लांटसाठी आवश्यक ‘एचएलए मॅचिंग’ शिबिराचे उद्घाटन गुरुवारी झाले. यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. मंचावर महापौर संदीप जोशी, मनपाचे आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा, सेंटरचे संचालक डॉ.विंकी रुघवानी, प्रकाश मोटवानी, आय.पी. केशवानी व एच.आर. बाखरु उपस्थित होते.राज्यपाल पुरोहित म्हणाले, डॉ. विंकी रुघवानी हे निस्वार्थ भावनेने सिकलसेल व थॅलेसेमिया रुग्णांची सेवा करीत आहेत. सोबतच त्यांनी दोन्ही आजाराच्या जनजागृतीतून लोकांचे डोळे उघडण्याचे कामही हाती घेतले आहे. या जनजागृती आंदोलनात प्रत्येक जण सहभागी होणे आवश्यक आहे. असे झाल्यास, जसे आपण पोलिओ मुक्त भारत केले तसेच सिकलसेल व थॅलेसेमिया मुक्त भारत करता येईल. या दोन्ही आजाराच्या रुग्णांच्या मदतीसाठी प्रत्येकाने समोर येणेही आवश्यक आहे. जास्तीतजास्त थॅलेसेमिया व सिकलसेलच्या मुलांचे ‘बोनमॅरो ट्रान्सप्लांट’ कसे होईल याबाबत प्रयत्न व्हायला हवे, असेही ते म्हणाले.सिकलसेल व थॅलेसेमियाचा आजारावर प्रतिबंध घालता येऊ शकतो. यासाठी जनजागृतीची गरज आहे. महानगरपालिका यात पुढाकार घेईल, अशी ग्वाही महापौर जोशी यांनी यावेळी दिली. प्रास्ताविक डॉ. रुघवानी यांनी केले. ते म्हणाले, सिकलसेल व थॅलेसेमिया या गंभीर आजारावर ‘बोन मॅरो प्रत्यारोपण’ हा स्थायी उपचार आहे. संबंधित रुग्णास त्याच्याशी जुळणारा स्टेमसेल दाता उपलब्ध झाल्यास त्याला नवे आयुष्य मिळू शकते. यासाठी रुग्णाचे भावंड,पालकांचे ‘एचएलए मॅचिंग’ करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ही प्रक्रिया महागडी आहे. यामुळे नि:शुल्क शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या दोन्ही आजाराच्या जनजागृतीची मोहीम चालवायला हवी, असेही ते म्हणाले. संचालन अ‍ॅड. वैशाली बगाडे यांनी केले तर आभार दिगोंतो दास यांनी मानले. यावेळी तन्वी बगाडे, तेजस्विनी उमाळे, जस्टीन एक्का व अनिषा अतकर या मुलांचा विशेष सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Healthआरोग्यnagpurनागपूर