शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
5
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
8
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
9
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
10
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
11
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
12
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
13
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
14
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
15
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
16
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
17
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
18
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
19
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
20
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 

सिकलसेल व थॅलेसेमिया मुक्त भारत करू या : राज्यपाल पुरोहित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 23:39 IST

वधू-वर दोघेही थॅलेसेमियाचे वाहक असतील, तर त्यांची अपत्येही 'थॅलेसेमियाग्रस्त' जन्मतात. त्यामुळे लग्नापूर्वी कुंडल्या पाहण्यासोबतच थॅलेसेमियाची तपासणी करा, जेणेकरून हा आजार पुढील पिढीत संक्रमित होणार नाही.

ठळक मुद्दे‘बोनमॅरो ट्रान्सप्लांट एचएलए मॅचिंग’ शिबिराचे उद्घाटन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : वधू-वर दोघेही थॅलेसेमियाचे वाहक असतील, तर त्यांची अपत्येही 'थॅलेसेमियाग्रस्त' जन्मतात. त्यामुळे लग्नापूर्वी कुंडल्या पाहण्यासोबतच थॅलेसेमियाची तपासणी करा, जेणेकरून हा आजार पुढील पिढीत संक्रमित होणार नाही. तसेच सिकलसेलबाबतही आहे. यामुळे या आजाराविषयी जनजागृतीचे आंदोलन हाती घेऊ या, सिकलसेल व थॅलेसेमिया मुक्त भारत करू या, असे आवाहन तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी येथे केले.थॅलेसेमिया व सिकलसेल सेंटर, जरीपटकाच्यावतीने बोनमॅरो ट्रान्सप्लांटसाठी आवश्यक ‘एचएलए मॅचिंग’ शिबिराचे उद्घाटन गुरुवारी झाले. यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. मंचावर महापौर संदीप जोशी, मनपाचे आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा, सेंटरचे संचालक डॉ.विंकी रुघवानी, प्रकाश मोटवानी, आय.पी. केशवानी व एच.आर. बाखरु उपस्थित होते.राज्यपाल पुरोहित म्हणाले, डॉ. विंकी रुघवानी हे निस्वार्थ भावनेने सिकलसेल व थॅलेसेमिया रुग्णांची सेवा करीत आहेत. सोबतच त्यांनी दोन्ही आजाराच्या जनजागृतीतून लोकांचे डोळे उघडण्याचे कामही हाती घेतले आहे. या जनजागृती आंदोलनात प्रत्येक जण सहभागी होणे आवश्यक आहे. असे झाल्यास, जसे आपण पोलिओ मुक्त भारत केले तसेच सिकलसेल व थॅलेसेमिया मुक्त भारत करता येईल. या दोन्ही आजाराच्या रुग्णांच्या मदतीसाठी प्रत्येकाने समोर येणेही आवश्यक आहे. जास्तीतजास्त थॅलेसेमिया व सिकलसेलच्या मुलांचे ‘बोनमॅरो ट्रान्सप्लांट’ कसे होईल याबाबत प्रयत्न व्हायला हवे, असेही ते म्हणाले.सिकलसेल व थॅलेसेमियाचा आजारावर प्रतिबंध घालता येऊ शकतो. यासाठी जनजागृतीची गरज आहे. महानगरपालिका यात पुढाकार घेईल, अशी ग्वाही महापौर जोशी यांनी यावेळी दिली. प्रास्ताविक डॉ. रुघवानी यांनी केले. ते म्हणाले, सिकलसेल व थॅलेसेमिया या गंभीर आजारावर ‘बोन मॅरो प्रत्यारोपण’ हा स्थायी उपचार आहे. संबंधित रुग्णास त्याच्याशी जुळणारा स्टेमसेल दाता उपलब्ध झाल्यास त्याला नवे आयुष्य मिळू शकते. यासाठी रुग्णाचे भावंड,पालकांचे ‘एचएलए मॅचिंग’ करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ही प्रक्रिया महागडी आहे. यामुळे नि:शुल्क शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या दोन्ही आजाराच्या जनजागृतीची मोहीम चालवायला हवी, असेही ते म्हणाले. संचालन अ‍ॅड. वैशाली बगाडे यांनी केले तर आभार दिगोंतो दास यांनी मानले. यावेळी तन्वी बगाडे, तेजस्विनी उमाळे, जस्टीन एक्का व अनिषा अतकर या मुलांचा विशेष सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Healthआरोग्यnagpurनागपूर