शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
6
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
7
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
8
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
9
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
10
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
11
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
12
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
13
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
14
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
15
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
16
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
17
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
18
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
19
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
20
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

संविधान बदलण्यासाठी सरसावणारे हात कलम करू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2018 18:52 IST

मनुवादी विचार देशात डोके वर काढू पाहत आहे. संविधानापेक्षा मनुस्मृती यांना श्रेष्ठ वाटू लागली आहे. भाजपा संविधानाला नख लावू पाहत आहे.मात्र, रक्त सांडले तरी संविधान बचावासाठी आम्ही लढाई लढू. संविधान बदलण्यासाठी सरसावणारे हात कलम करू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

ठळक मुद्देअजित पवार यांचा इशारा : राष्ट्रवादीचा ‘संविधान बचाव, देश बचाव मेळावा’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मनुवादी विचार देशात डोके वर काढू पाहत आहे. संविधानापेक्षा मनुस्मृती यांना श्रेष्ठ वाटू लागली आहे. भाजपा संविधानाला नख लावू पाहत आहे.मात्र, रक्त सांडले तरी संविधान बचावासाठी आम्ही लढाई लढू. संविधान बदलण्यासाठी सरसावणारे हात कलम करू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नागपुरातील देशपांडे सभागृहात ‘संविधान बचाव, देश बचाव मेळावा’ आयोजित करण्यात आला. या प्रसंगी पेटती मशाल उंचावून संविधान रक्षणाची शपथ घेण्यात आली. मेळाव्याला माजी उपमुख्यमंत्री छगन भूजबळ, प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, रमेश बंग, आ. शशिकांत शिंदे, आ. प्रकाश गजभिये, पक्षाच्या महिला राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान, महिला प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ, आ. विद्या चव्हाण, आ.सुमन पाटील, आ. ज्योति कलानी, आ. संध्या कुपेकर, आ. दिपीका चव्हाण, माजी आमदार उषा दराडे, शहर अध्यक्ष अलका कांबळे यांच्यासह विदर्भातील सर्व महिला जिल्हाध्यक्ष उपस्थित होत्या. या वेळी अजित पवार म्हणाले, संतांपेक्षा मनु श्रेष्ठ आहे, असे सांगण्याचे धाडस संभाजी भिडे करतातच कसे. त्यांच्या मागचा मास्टर मार्इंड कोण आहे, असा सवाल करीत कुठल्या दिशेने कारभार सुरू आहे, याचा जाब त्यांनी सरकारला विचारला. कुठल्याही क्षणी लोकसभा निवडणूक लागू शकते, असे सांगत भाजपाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले.जयंत पाटील म्हणाले, भाजपाचे केंद्रीय मंत्री संविधान बदलण्यासाठी आम्ही सत्तेत आल्याचे सांगतात. सरसंघचालक मोहन भागवत आरक्षणाच्या फेरविचारासाठी समिती नेमण्याची शिफारस करतात. भाजपा संविधानाला धक्का पोहचवू पाहत असल्याचे सांगत भाजपचे मनसुबे उधळून लावण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.तुमची नियत साफ नाही : भूजबळमेळाव्यात भूजभळ यांचे फुले पगडी घालून स्वागत करण्यात आले. या वेळी भूजबळ म्हणाले, मनुवादी कायदा हीन होता. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केले. पण आज पुन्हा मनुवादी कार्यक्रम सुरु झाले आहेत. लोकशाहिचे चक्र उलटे फिरवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. विरोधात बोलणाऱ्यांना गोळ्या घातल्या जात आहे. हे खडा फेकून बघतात, पचला तर पुढे जातात. अंधाराने भरलेली मनुस्मृती नकोच असे सांगत संविधानामुळे लोकशाही जिवंत राहिली. देशात वाढलेला हिंसाचार, जातीवाद व मुस्कटदाबी वाढल्यामुळे संविधान बचाव म्हणण्याची वेळ आली आहे. संविधान विरोधी पावले अडविण्यासाठी लोकशाही मागार्ने रस्त्यावर यावे लागेल, असे आवाहन त्यांनी केले. गोरक्षेच्या नावावर माणसे मारता तुम्ही, चांगले कपडे घातले म्हणून दलितांना मारता तुम्ही. अशांवर कारवाई होत नाही. शालेय पुस्तकांच्या ठिकाणी धार्मिक पुस्तके वाटली जात आहेत. तुमची नियत साफ नाही. मुहं मे राम बगल मे छुरी सुरु आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

ईव्हीएम व मनस्मृतीची होळीमेळाव्यानंतर नेत्यांच्या हस्ते ईव्हीएम व मनस्मृतीची होळी करण्यात आली. या वेळी संविधान जिंदाबाद, लोकशाही जिंदाबादचे नारे देण्यात आले.असे झालेत ठराव ; मेळाव्यात एकूण पाच ठराव एकमताने संमत करण्यात आले

  •  संविधान बचाव कार्यक्रम ग्रामस्तरापर्यंत राबविला जाईल.
  • राज्य महिला आयोगास वाढीव अधिकार देऊन प्रत्येक जिल्ह्यात आयोगाचे केंद्र स्थापन करावे.
  •  लोकसभेत ३३ टक्के महिला आरक्षणाचे विधेयक मंजूर करावे.
  •  सातबाराच्या उताऱ्याच्या मागच्या बाजुला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा फोटो छापावा.
  •  शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे. 

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसnagpurनागपूर